शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

शेतकरी महिलेची व शेतमजुराची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 20:02 IST

तेल्हारा येथील शेतकरी  महिलेने नापिकी व कर्जबाजारीपणास कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना १४ नोव्हेंबरच्या सकाळी उघडकीस  आली. त्याचप्रमाणे नजीकच्या भांबेरी येथे राहणार्‍या गजानन तायडे या शेतमजुराने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना १४ नोव्हेंबरला  उघडकीस आली.

ठळक मुद्देतेल्हारा व भांबेरीतील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कतेल्हारा : तेल्हारा येथील जिजामाता नगरात राहणार्‍या पुष्पा घ्यार या शेतकरी  महिलेने नापिकी व कर्जबाजारीपणास कंटाळून तिच्या राहत्या घरात नाटेला  गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना १४ नोव्हेंबरच्या सकाळी उघडकीस  आली. त्याचप्रमाणे नजीकच्या भांबेरी येथे राहणार्‍या गजानन तायडे या शेतमजुराने  घरात दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटनादेखील १४ नोव्हेंबरला  उघडकीस आली.तेल्हारा शहराच्या जिजामाता नगरातील रहिवासी पुष्पा नथ्थूजी घ्यार या ५0 वर्षीय  शेतकरी महिलेने सततची नापिकी व थकीत कर्जास कंटाळून तिच्या राहत्या घरात  १४ नोव्हेंबरच्या सकाळपुर्वी कधीतरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या  शेजारी असणारे मंगेश लाहोडे यांनी १४ नोव्हेंबर रोजी सकाळी बराच वेळ होऊनही  पुष्पाबाईने घराचे दार न उघडल्याने त्यांच्या घराच्या दरवाजामधून आत बघितले,  तेव्हा त्यांना पुष्पाबाईने घरात नाटेला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे  आढळून आले. या घटनेबाबत हरिदास इंगोले यांनी तेल्हारा पोलिसांत फिर्याद दिली.  त्याची तातडीने दखल घेऊन ठाणेदार सचिंद्र शिंदे, उपनिरीक्षक नागोराव भांगे यांनी  घटनास्थळी पोहोचून चौकशी केली व पंचनामा केला. सदर महिलेच्या नावाने तीन  एकर शेती असून, तिच्या अंगावर १५ हजार रुपयांचे जिल्हा मध्यवर्ती सहकारी  बँकेच्या तेल्हारा शाखेचे कर्ज आहे. तसेच काही हजारांचे खासगी कर्जदेखील  आहे. सदर महिलेचे पती हे शेतमजुरी करतात. मृतक शेतकरी महिलेच्या पश्‍चात प ती, एक मुलगा व दोन मुली असा आप्त परिवार आहे.  तेल्हारा पोलीस स्टेशनांतर्गत भांबेरी येथील गजानन रामराव तायडे या ३५ वर्षीय  शेतमजुराने राहत्या घरात दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची १४ नोव्हेंबर  रोजी उघडकीस आली. या घटनेबाबतची फिर्याद देवीदास किसन तायडे यांनी १४  नोव्हेंबर रोजी तेल्हारा पोलीस स्टेशनमध्ये दिली. त्यावरून तेल्हारा पोलिसांनी  आकस्मिक मृत्यूची नोंद करून घटनास्थळाचा पंचनामा केला. मृतकाच्या पश्‍चात  पत्नी व एक मुलगी असा आप्त परिवार आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक  जानराव सोळंके करीत आहेत. 

टॅग्स :FarmerशेतकरीDeathमृत्यू