शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

शेतकरी महिलेची व शेतमजुराची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 20:02 IST

तेल्हारा येथील शेतकरी  महिलेने नापिकी व कर्जबाजारीपणास कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना १४ नोव्हेंबरच्या सकाळी उघडकीस  आली. त्याचप्रमाणे नजीकच्या भांबेरी येथे राहणार्‍या गजानन तायडे या शेतमजुराने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना १४ नोव्हेंबरला  उघडकीस आली.

ठळक मुद्देतेल्हारा व भांबेरीतील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कतेल्हारा : तेल्हारा येथील जिजामाता नगरात राहणार्‍या पुष्पा घ्यार या शेतकरी  महिलेने नापिकी व कर्जबाजारीपणास कंटाळून तिच्या राहत्या घरात नाटेला  गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना १४ नोव्हेंबरच्या सकाळी उघडकीस  आली. त्याचप्रमाणे नजीकच्या भांबेरी येथे राहणार्‍या गजानन तायडे या शेतमजुराने  घरात दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटनादेखील १४ नोव्हेंबरला  उघडकीस आली.तेल्हारा शहराच्या जिजामाता नगरातील रहिवासी पुष्पा नथ्थूजी घ्यार या ५0 वर्षीय  शेतकरी महिलेने सततची नापिकी व थकीत कर्जास कंटाळून तिच्या राहत्या घरात  १४ नोव्हेंबरच्या सकाळपुर्वी कधीतरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या  शेजारी असणारे मंगेश लाहोडे यांनी १४ नोव्हेंबर रोजी सकाळी बराच वेळ होऊनही  पुष्पाबाईने घराचे दार न उघडल्याने त्यांच्या घराच्या दरवाजामधून आत बघितले,  तेव्हा त्यांना पुष्पाबाईने घरात नाटेला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे  आढळून आले. या घटनेबाबत हरिदास इंगोले यांनी तेल्हारा पोलिसांत फिर्याद दिली.  त्याची तातडीने दखल घेऊन ठाणेदार सचिंद्र शिंदे, उपनिरीक्षक नागोराव भांगे यांनी  घटनास्थळी पोहोचून चौकशी केली व पंचनामा केला. सदर महिलेच्या नावाने तीन  एकर शेती असून, तिच्या अंगावर १५ हजार रुपयांचे जिल्हा मध्यवर्ती सहकारी  बँकेच्या तेल्हारा शाखेचे कर्ज आहे. तसेच काही हजारांचे खासगी कर्जदेखील  आहे. सदर महिलेचे पती हे शेतमजुरी करतात. मृतक शेतकरी महिलेच्या पश्‍चात प ती, एक मुलगा व दोन मुली असा आप्त परिवार आहे.  तेल्हारा पोलीस स्टेशनांतर्गत भांबेरी येथील गजानन रामराव तायडे या ३५ वर्षीय  शेतमजुराने राहत्या घरात दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची १४ नोव्हेंबर  रोजी उघडकीस आली. या घटनेबाबतची फिर्याद देवीदास किसन तायडे यांनी १४  नोव्हेंबर रोजी तेल्हारा पोलीस स्टेशनमध्ये दिली. त्यावरून तेल्हारा पोलिसांनी  आकस्मिक मृत्यूची नोंद करून घटनास्थळाचा पंचनामा केला. मृतकाच्या पश्‍चात  पत्नी व एक मुलगी असा आप्त परिवार आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक  जानराव सोळंके करीत आहेत. 

टॅग्स :FarmerशेतकरीDeathमृत्यू