शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

शेतकरी अडचणीत; रब्बी पेरणीचा खर्च भागविणार कसा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2019 12:05 IST

पिकांचे उत्पादन अवकाळी पावसात बुडाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.

- संतोष येलकर लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: अवकाळी पावसाच्या तडाख्यात राज्यात हाता-तोंडाशी आलेल्या पिकांचे उत्पादन बुडाले. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला असून, जवळ पैसा नसल्याने, रब्बी पीक पेरणीचा खर्च भागविणार कसा, याबाबतची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे.यावर्षीचा पावसाळा संपल्यानंतर गत महिनाभराच्या कालावधीत अवकाळी पावसाच्या तडाख्यात विदर्भ-मराठवाड्यासह राज्यभरात कापणीला आलेल्या आणि कापणी झालेल्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले. सोयाबीन सडले असून, ज्वारीला कोंब फुटले आहेत. वेचणीला आलेला कापूस भिजला असून, कपाशीच्या बोंड्या सडल्या आहेत. तसेच भात, भाजीपाला आणि फळ पिकांचेही प्रचंड नुकसान झाले आहे. हाता-तोंडाशी आलेल्या पिकांचे उत्पादन बुडाल्याने, पिकांच्या लागवडीवर केलेला खर्चही निघणार नाही. जवळ असलेला पैसा पीक लागवडीवर खर्च केला आणि त्यानंतर हाताशी आलेल्या पिकांचे उत्पादन अवकाळी पावसात बुडाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. जवळ पैसा नसल्याच्या स्थितीत रब्बी हंगामातील पिकांची पेरणी, पेरणीसाठी लागणारे बियाणे, खते व कीटकनाशकांचा खर्च भागविणार कसा, याबाबतची चिंता आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना सतावत आहे.नुकसान भरपाईच्या मदतीचाही पत्ता नाही!अवकाळी पावसाच्या तडाख्यात राज्यातील पीक नुकसानाचे पंचनामे तयार करण्याचे काम आटोपण्याच्या मार्गावर असताना, पीक नुकसान भरपाईची मदत अद्याप शासनामार्फत जाहीर करण्यात आली नाही. तसेच पीक नुकसान भरपाईचा शासन निर्णयदेखील काढण्यात आला नाही. त्यामुळे संकटात सापडलेल्या शेतकºयांना दिलासा देण्यासाठी सरकारी मदतीचा अद्याप पत्ता नसल्याने, पीक नुकसान भरपाईची मदत मिळणार तरी केव्हा, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाagricultureशेतीFarmerशेतकरी