शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
3
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
4
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
5
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
6
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
7
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
8
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
9
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
10
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
11
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
12
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
13
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
14
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
15
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
16
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
17
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
18
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
19
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
20
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय

शेतकरी अडचणीत; रब्बी पेरणीचा खर्च भागविणार कसा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2019 12:05 IST

पिकांचे उत्पादन अवकाळी पावसात बुडाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.

- संतोष येलकर लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: अवकाळी पावसाच्या तडाख्यात राज्यात हाता-तोंडाशी आलेल्या पिकांचे उत्पादन बुडाले. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला असून, जवळ पैसा नसल्याने, रब्बी पीक पेरणीचा खर्च भागविणार कसा, याबाबतची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे.यावर्षीचा पावसाळा संपल्यानंतर गत महिनाभराच्या कालावधीत अवकाळी पावसाच्या तडाख्यात विदर्भ-मराठवाड्यासह राज्यभरात कापणीला आलेल्या आणि कापणी झालेल्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले. सोयाबीन सडले असून, ज्वारीला कोंब फुटले आहेत. वेचणीला आलेला कापूस भिजला असून, कपाशीच्या बोंड्या सडल्या आहेत. तसेच भात, भाजीपाला आणि फळ पिकांचेही प्रचंड नुकसान झाले आहे. हाता-तोंडाशी आलेल्या पिकांचे उत्पादन बुडाल्याने, पिकांच्या लागवडीवर केलेला खर्चही निघणार नाही. जवळ असलेला पैसा पीक लागवडीवर खर्च केला आणि त्यानंतर हाताशी आलेल्या पिकांचे उत्पादन अवकाळी पावसात बुडाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. जवळ पैसा नसल्याच्या स्थितीत रब्बी हंगामातील पिकांची पेरणी, पेरणीसाठी लागणारे बियाणे, खते व कीटकनाशकांचा खर्च भागविणार कसा, याबाबतची चिंता आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना सतावत आहे.नुकसान भरपाईच्या मदतीचाही पत्ता नाही!अवकाळी पावसाच्या तडाख्यात राज्यातील पीक नुकसानाचे पंचनामे तयार करण्याचे काम आटोपण्याच्या मार्गावर असताना, पीक नुकसान भरपाईची मदत अद्याप शासनामार्फत जाहीर करण्यात आली नाही. तसेच पीक नुकसान भरपाईचा शासन निर्णयदेखील काढण्यात आला नाही. त्यामुळे संकटात सापडलेल्या शेतकºयांना दिलासा देण्यासाठी सरकारी मदतीचा अद्याप पत्ता नसल्याने, पीक नुकसान भरपाईची मदत मिळणार तरी केव्हा, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाagricultureशेतीFarmerशेतकरी