शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
2
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
3
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
4
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
5
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
6
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
7
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
8
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
9
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
10
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
11
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
12
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
13
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
14
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
15
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
16
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
17
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
18
मीरा- भाईंदर ते गायमुख उन्नत, भुयारी मार्गासाठी एल अँड टी कंपनीकडून अंदाजपत्रक नाहीच 
19
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
20
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल

शेतकरी अडचणीत; रब्बी पेरणीचा खर्च भागविणार कसा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2019 12:05 IST

पिकांचे उत्पादन अवकाळी पावसात बुडाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.

- संतोष येलकर लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: अवकाळी पावसाच्या तडाख्यात राज्यात हाता-तोंडाशी आलेल्या पिकांचे उत्पादन बुडाले. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला असून, जवळ पैसा नसल्याने, रब्बी पीक पेरणीचा खर्च भागविणार कसा, याबाबतची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे.यावर्षीचा पावसाळा संपल्यानंतर गत महिनाभराच्या कालावधीत अवकाळी पावसाच्या तडाख्यात विदर्भ-मराठवाड्यासह राज्यभरात कापणीला आलेल्या आणि कापणी झालेल्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले. सोयाबीन सडले असून, ज्वारीला कोंब फुटले आहेत. वेचणीला आलेला कापूस भिजला असून, कपाशीच्या बोंड्या सडल्या आहेत. तसेच भात, भाजीपाला आणि फळ पिकांचेही प्रचंड नुकसान झाले आहे. हाता-तोंडाशी आलेल्या पिकांचे उत्पादन बुडाल्याने, पिकांच्या लागवडीवर केलेला खर्चही निघणार नाही. जवळ असलेला पैसा पीक लागवडीवर खर्च केला आणि त्यानंतर हाताशी आलेल्या पिकांचे उत्पादन अवकाळी पावसात बुडाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. जवळ पैसा नसल्याच्या स्थितीत रब्बी हंगामातील पिकांची पेरणी, पेरणीसाठी लागणारे बियाणे, खते व कीटकनाशकांचा खर्च भागविणार कसा, याबाबतची चिंता आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना सतावत आहे.नुकसान भरपाईच्या मदतीचाही पत्ता नाही!अवकाळी पावसाच्या तडाख्यात राज्यातील पीक नुकसानाचे पंचनामे तयार करण्याचे काम आटोपण्याच्या मार्गावर असताना, पीक नुकसान भरपाईची मदत अद्याप शासनामार्फत जाहीर करण्यात आली नाही. तसेच पीक नुकसान भरपाईचा शासन निर्णयदेखील काढण्यात आला नाही. त्यामुळे संकटात सापडलेल्या शेतकºयांना दिलासा देण्यासाठी सरकारी मदतीचा अद्याप पत्ता नसल्याने, पीक नुकसान भरपाईची मदत मिळणार तरी केव्हा, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाagricultureशेतीFarmerशेतकरी