शहरं
Join us  
Trending Stories
1
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
2
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
3
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
4
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
5
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
6
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
7
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
8
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
9
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
10
टेक इंडस्ट्री हादरली! AI मुळे २०२५ मध्ये १.२० लाख नोकऱ्या संपुष्टात; कर्मचारी कपातीत कोणती कंपनी पुढे?
11
डाव्यांच्या गडाला हादरे! माजी आयपीएस आर. श्रीलेखा तिरुवनंतपुरमच्या महापौर होण्याची शक्यता, केरळमध्ये भाजपला मोठे यश  
12
इंडिगोचे संकट वाढले! ८२९ प्रवासी सामुहिक खटला दाखल करणार, एअरलाईन्सवर नामुष्की...
13
मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे यांचे संघस्थानी नमन, अजित पवार गटासह काही आमदार-मंत्र्यांची मात्र दांडी
14
हवा बिघडली अन् वारे फिरले; धुराने कोंडला मुंबईकरांचा श्वास! धूळ, धुके, धुराच्या संयुक्त मिश्रणाने प्रदूषणात वाढ
15
'१९ डिसेंबरला देशात सर्वात मोठा राजकीय भूकंप होणार, भारताचा पंतप्रधान मराठी माणूस बनणार', पृथ्वीराज चव्हाणांचे भाकीत!
16
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
17
काँग्रेसचं पुनरागमन, भाजपाचा चंचुप्रवेश आणि डाव्यांना धक्का, केरळमधील राजकीय हवा बदलतेय?
18
'या' छोट्या देशाचा चीन-भारतासारख्या बलाढ्या देशांना धोबीपछाड! फंड उभारण्यात आशियात १ नंबरला
19
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे द्रुष्टचक्र सुरूच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2020 23:45 IST

शेतकºयांच्या गळ्याभोवती लागलेला आत्महत्येचा फास सुटता सुटत नाही.

अकोला: दुष्काळ, नैसर्गिक आपत्ती यामुळे वाढलेले सावकारांचे कर्ज, मुला-मुलींचे शिक्षण, लग्न आदींमुळे शेतकऱ्यांच्या संघर्षावर नैराश्य मात करीत आहे. जगावं कसं, या विवंचनेमुळे सुरू झालेले शेतकरी आत्महत्यांचे चक्र सुरूच आहे. या द्रुष्टचक्रातून शेतकºयांना मुक्त करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने विविध उपाययोजना केल्या, कर्जमाफीच्याही योजना दिल्या; मात्र शेतकºयांच्या गळ्याभोवती लागलेला आत्महत्येचा फास सुटता सुटत नाही.राज्यात सत्तारूढ झालेल्या महाविकास आघाडी सरकारने दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी योजना जाहीर केली. मागील सरकारने कर्जमाफीसाठी घातलेल्या अटी, शर्ती वगळून ही कर्जमाफी योजना असली तरीही शेतकºयांमध्ये विश्वास निर्माण होऊ शकला नाही व आत्महत्येचे सत्र थांबले नाही. कर्जमाफी जाहीर झाल्यानंतरही विदर्भात शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच आहे. २०२० या नवीन वर्षात विदर्भातील सहा जिल्ह्यांत शंभरावर शेतकºयांनी आपले जीवन संपविले. दिवसांचाच हिशेब केला तर दर दिवसाला एक आत्महत्या, हे दुर्दैवी चित्र आहे.आर्थिक विवंचना, दुष्काळ, नापिकी, कर्जबाजारीपणा या प्रमुख कारणांमुळे शेतकरी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत आहेत.२००५ पासून शासन मदतीत वाढ नाही!कर्जबाजारी, कर्ज वसुलीचा तगादा व सातबाराधारक शेतकरी असल्यास २००५ च्या शासन आदेशानुसार ३० हजार रुपये रोख व ७० हजारांची मुदती ठेव तीदेखील तहसीलदार व संबंधित मृताचा वारस यांच्या संयुक्त नावे, असे मदतीचे स्वरूप आहे. यामध्ये १४ वर्षांत बदल झालेला नाही. विशेष म्हणजे, ज्या कर्जासाठी शेतकºयाने आत्महत्या केली, ते कर्ज त्यांच्या सातबारावर कायम राहते व निरंतर वाढत राहते. त्यामुळे मृत शेतकºयाचा वारस बँकेचा थकबाकीदार असल्याने त्याला कर्ज मिळत नाही व अन्य लाभांपासून तो वंचित राहत असल्याचे वास्तव आहे.अकोल्यातील आत्महत्येचे वास्तव2015-1952016-1552017-1672018-1422019-1269 मार्च 2020-32एकूण-1312

तब्बल १०२६ शेतकरी आत्महत्या मदतीस अपात्रजिल्ह्यात आतापर्यंत २ हजार ३८८ शेतकरी आत्महत्या झालेल्या आहेत. यामध्ये जाचक निकषामुळे फक्त १ हजार ३१२ प्रकरणे शासन मदतीसाठी पात्र ठरली आहेत. १ हजार २६ प्रकरणे अपात्र तर ५० प्रकरणे अद्यापही चौकशीसाठी प्रलंबित आहेत.२०१७ मध्ये साहेबराव करपे यांचे गाव चिल-गव्हाण (यवतमाळ) येथून उपवासाची सुरुवात झाली. दुसºया वर्र्षी ज्या दत्तपूरला त्यांनी आत्महत्या केली, तेथे उपोषण केले. गतवर्षी दिल्लीत म. गांधींच्या समाधीचे दर्शन घेऊन राजघाट येथे केले. यावर्षी पुण्यात म. फुले यांच्या वाड्याला भेट देऊन राणी लक्ष्मीबाई यांच्या पुतळ्यासमोर उपोषण करणार आहोत.- अमर हबीब

 

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याAkolaअकोला