शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे द्रुष्टचक्र सुरूच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2020 23:45 IST

शेतकºयांच्या गळ्याभोवती लागलेला आत्महत्येचा फास सुटता सुटत नाही.

अकोला: दुष्काळ, नैसर्गिक आपत्ती यामुळे वाढलेले सावकारांचे कर्ज, मुला-मुलींचे शिक्षण, लग्न आदींमुळे शेतकऱ्यांच्या संघर्षावर नैराश्य मात करीत आहे. जगावं कसं, या विवंचनेमुळे सुरू झालेले शेतकरी आत्महत्यांचे चक्र सुरूच आहे. या द्रुष्टचक्रातून शेतकºयांना मुक्त करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने विविध उपाययोजना केल्या, कर्जमाफीच्याही योजना दिल्या; मात्र शेतकºयांच्या गळ्याभोवती लागलेला आत्महत्येचा फास सुटता सुटत नाही.राज्यात सत्तारूढ झालेल्या महाविकास आघाडी सरकारने दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी योजना जाहीर केली. मागील सरकारने कर्जमाफीसाठी घातलेल्या अटी, शर्ती वगळून ही कर्जमाफी योजना असली तरीही शेतकºयांमध्ये विश्वास निर्माण होऊ शकला नाही व आत्महत्येचे सत्र थांबले नाही. कर्जमाफी जाहीर झाल्यानंतरही विदर्भात शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच आहे. २०२० या नवीन वर्षात विदर्भातील सहा जिल्ह्यांत शंभरावर शेतकºयांनी आपले जीवन संपविले. दिवसांचाच हिशेब केला तर दर दिवसाला एक आत्महत्या, हे दुर्दैवी चित्र आहे.आर्थिक विवंचना, दुष्काळ, नापिकी, कर्जबाजारीपणा या प्रमुख कारणांमुळे शेतकरी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत आहेत.२००५ पासून शासन मदतीत वाढ नाही!कर्जबाजारी, कर्ज वसुलीचा तगादा व सातबाराधारक शेतकरी असल्यास २००५ च्या शासन आदेशानुसार ३० हजार रुपये रोख व ७० हजारांची मुदती ठेव तीदेखील तहसीलदार व संबंधित मृताचा वारस यांच्या संयुक्त नावे, असे मदतीचे स्वरूप आहे. यामध्ये १४ वर्षांत बदल झालेला नाही. विशेष म्हणजे, ज्या कर्जासाठी शेतकºयाने आत्महत्या केली, ते कर्ज त्यांच्या सातबारावर कायम राहते व निरंतर वाढत राहते. त्यामुळे मृत शेतकºयाचा वारस बँकेचा थकबाकीदार असल्याने त्याला कर्ज मिळत नाही व अन्य लाभांपासून तो वंचित राहत असल्याचे वास्तव आहे.अकोल्यातील आत्महत्येचे वास्तव2015-1952016-1552017-1672018-1422019-1269 मार्च 2020-32एकूण-1312

तब्बल १०२६ शेतकरी आत्महत्या मदतीस अपात्रजिल्ह्यात आतापर्यंत २ हजार ३८८ शेतकरी आत्महत्या झालेल्या आहेत. यामध्ये जाचक निकषामुळे फक्त १ हजार ३१२ प्रकरणे शासन मदतीसाठी पात्र ठरली आहेत. १ हजार २६ प्रकरणे अपात्र तर ५० प्रकरणे अद्यापही चौकशीसाठी प्रलंबित आहेत.२०१७ मध्ये साहेबराव करपे यांचे गाव चिल-गव्हाण (यवतमाळ) येथून उपवासाची सुरुवात झाली. दुसºया वर्र्षी ज्या दत्तपूरला त्यांनी आत्महत्या केली, तेथे उपोषण केले. गतवर्षी दिल्लीत म. गांधींच्या समाधीचे दर्शन घेऊन राजघाट येथे केले. यावर्षी पुण्यात म. फुले यांच्या वाड्याला भेट देऊन राणी लक्ष्मीबाई यांच्या पुतळ्यासमोर उपोषण करणार आहोत.- अमर हबीब

 

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याAkolaअकोला