शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी प्रस्ताव!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2020 13:57 IST

राज्यातील शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी एकात्मिक उपाययोजनांच्या कार्यक्रमाचा प्रस्ताव ६ जानेवारी रोजी सादर केला.

- संतोष येलकर लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी एकात्मिक उपाययोजनांचा प्रस्ताव वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी ६ जानेवारी रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व मुख्य सचिव अजोय मेहता यांच्याकडे सादर केला आहे.गत महिन्यात राज्यात ३०० शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या. या पृष्ठभूमीवर वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व मुख्य सचिव अजोय मेहता यांची भेट घेऊन, राज्यातील शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी एकात्मिक उपाययोजनांच्या कार्यक्रमाचा प्रस्ताव ६ जानेवारी रोजी सादर केला.पतपुरवठा धोरण नियंत्रण, लागवडीचा खर्च व शेतीमालाचे भाव स्थिर ठेवण्यासाठी निधीचे व्यवस्थापन, जलसंपत्तीचे समान वाटप व जमिनीखालील जलसंपत्तीचे नियंत्रण, पीक पद्धतीचे नियोजन, सक्षम विपदा प्रबंधन प्रणालीचे संचालन व नियंत्रण, शेतीमाल संरक्षण व शेतीमाल साठवण प्रक्रिया व्यवस्थेचे नियोजन इत्यादी क्षेत्रात शेतकºयांचे भूअधिकार अबाधित ठेवून मूलभूत परिवर्तन करण्याची पद्धत आणि प्रशासकीय आराखड्यामध्ये सुधारणा करून एकात्मिक उपाययोजना करण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्री व मुख्य सचिवांकडे सादर करण्यात आला आहे.राज्यातील शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी एकात्मिक उपाययोजनांच्या या प्रस्तावासंदर्भात राज्य सरकार काय निर्णय घेणार, याकडे आता लक्ष लागले आहे.शेतकरी अधिकार आयोगाची स्थापना करा!मानवाधिकार आयोगाच्या धर्तीवर राज्यात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली शेतकरी अधिकार आयोगाची स्थापना करण्यात यावी, अशी मागणीही वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सादर केलेल्या शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी एकात्मिक उपाययोजनांच्या प्रस्तावात केली आहे.

टॅग्स :Akolaअकोलाfarmer suicideशेतकरी आत्महत्या