शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

पेरणी उलटण्याच्या विवंचनेत दोनवाडा येथील शेतकऱ्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2019 14:00 IST

श्रीहरी तुकाराम झटाले (६०) असे या शेतकºयाचे नाव असून, त्यांनी सकाळी स्वत:च्या राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली.

ठळक मुद्देझटाले यांच्याकडे तीन एकर शेती आहे. नुकतीच त्यांनी पेरणी केली होती.पावसाने दडी मारल्यामुळे पिकाचे काय होईल, याची चिंता त्यांना लागलेली होती. श्रीहरी झटाले यांनी शुक्रवारी सकाळी कुटुंबिय घरात नसल्याचे पाहून गळफास लावून आत्महत्या केली.

म्हातोडी (अकोला) : आधीच डोक्यावर कर्जाचा डोंगर व त्यातच पावसाने दडी मारल्याने पेरलेल्या पिकाचे काय होणार, या विवंचनेत असलेल्या अकोला तालुक्यातील दोनवाडा येथील अल्पभूधारक शेतकºयाने आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली. श्रीहरी तुकाराम झटाले (६०) असे या शेतकºयाचे नाव असून, त्यांनी सकाळी स्वत:च्या राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली.दहीहांडा पोलिस ठाण्याअंतर्गत येत असलेल्या दोनवाडा येथील शेतकरी श्रीहरी झटाले यांच्याकडे तीन एकर शेती आहे. नुकतीच त्यांनी पेरणी केली होती. दरम्यान, पावसाने दडी मारल्यामुळे पिकाचे काय होईल, याची चिंता त्यांना लागलेली होती. तसेच त्यांच्यावर जिल्हा मध्यवर्ती बँक व खासगी फायनान्स कंपनीचेही कर्ज असल्याची माहिती आहे. या विवंचनेत असताना श्रीहरी झटाले यांनी शुक्रवारी सकाळी कुटुंबिय घरात नसल्याचे पाहून गळफास लावून आत्महत्या केली. त्यांचा मुलगा विजय बाहेरून आल्यानंतर त्याच्या लक्षात ही बाब आली. घटनेची माहिती मिळताच दहिहांडा पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात पाठविला. श्रीहरी झटाले यांच्या पश्चात एक मुलगा, सुन व नातवंड असा परिवार आहे.

 

टॅग्स :Akolaअकोलाfarmer suicideशेतकरी आत्महत्याagricultureशेती