शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

शेतकऱ्यांनी रोजगारक्षम शेती करुन ‘स्मार्ट उदयोजक’ बनावे - जिल्हाधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2018 18:47 IST

अकोला : शेतकरी हा खऱ्या अथार्ने पोषणकर्ता आहे. जिल्हयातील शेतकºयांना स्मार्ट उद्योजक बनविण्याकरीता जिल्हा प्रशासनाचा प्रयत्न आहे. यासाठी शासनाच्या विविध ...

अकोला : शेतकरी हा खऱ्या अथार्ने पोषणकर्ता आहे. जिल्हयातील शेतकºयांना स्मार्ट उद्योजक बनविण्याकरीता जिल्हा प्रशासनाचा प्रयत्न आहे. यासाठी शासनाच्या विविध योजना त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यासोबतच या योजनांबददल त्यांना अधिकाऱ्यां मार्फत सविस्तर मार्गदर्शन करणे. प्रगतीशील शेतकºयांचे अनुभव त्यांच्यापर्यंत पोहोचविणे तसेच शेतकरी आणि संबधित विभागांचे अधिकारी यांच्यामध्ये सुसंवाद घडवून आणण्यासाठी एक दिवस शेतकऱ्यां सोबत असा प्रशासनाचा मानस असून दर बुधवारी शेतकऱ्यां करीता याबाबतची कार्यशाळा नियोजन भवनात राहणार आहे, याचा शेतकऱ्यां नी लाभ घेऊन स्वत: रोजगारक्षम शेती करुन स्मार्ट उदयोजक बनावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी बुधवारी केले.रोजगारक्षम शेती व्यवसाय या अंतर्गत ‘शेतकरी हा स्मार्ट उदयोजक’ हा उपक्रम जिल्हा प्रशासनाने आजपासून राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या उपक्रमाचा शुभारंभ आज जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन भवनात झाला. यावेळी अपर जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर, उपजिल्हाधिकारी (रोहयो) अशोक अमानकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र निकम, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक अलोक तराणिया, उपविभागीय कृषी अधिकारी अजय कुलकर्णी, नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक शरद वाळके, कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक डॉ. ठाकरे, रेशीम अधिकारी श्री. मानकर यांच्यासह कृषी अधिकारी, शेतकरी उत्पादक कंपन्यांच प्रतिनिधी, शेतकरी उपस्थित होते.शेतकºयांच्या हितासाठी शासनाच्या विविध यंत्रणा कार्यान्वित आहेत. विविध योजनांच्या माध्यमातून शेतीसोबत शेतकऱ्यां ची प्रगती व्हावी, यासाठी शासन प्रयत्नशील असते, असे सांगून जिल्हाधिकारी म्हणाले की, रोजगारक्षम शेती व्यवसाय या सदराखाली जिल्हयातील शेतकºयांना आता स्मार्ट उद्योजक बनविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने शेतकऱ्यां करीता साप्ताहिक मुक्त कार्यशाळेचे आयोजन केले आहे. शेतकरी स्वत:च स्वयंभू झाला पाहिजे, हा या मागील उदेश आहे. या कार्यशाळेत कृषी, बँक, नाबार्डचे अधिकारी तसेच प्रगतीशील शेतकरी यांचे मार्गदर्शन शेतकºयांना मिळणार आहे. दर बुधवारी ही कार्यशाळा नियोजन सभागृहात राहणार असून शेतकऱ्यां मध्ये एक सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्याबरोबरच शेतकºयांना उदयोजक बनविण्याचा या मागे हेतू आहे. या कार्यशाळेत मुक्त संवादाच्या माध्यमातून शेतकरी आपल्या अडचणी मांडू शकतात.मृदा आरोग्य पत्रिकांचे वितरणप्रारंभी जमीन आरोग्य पत्रिकांचे प्रातिनिधीक स्वरुपात शेतकºयांना मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले. यामध्ये प्रकाश घोडस्कर, सूर्यभान इंगळे, गजानन घोंगे, मनोहर बाबर, विष्णु सोनाग्रे, गणेश घोडस्कर, जनार्दन नांदुरकर, वसंत सोनाग्रे यांचा समावेश होता. जागतिक मृदा दिनानिमित्त पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी दिलेल्या शुभेच्छा संदेशाचे वाचन निकम यांनी यावेळी केले. याप्रसंगी अप्पर जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर, उपजिल्हाधिकारी अशोक अमानकर यांच्यासह तराणिया, कुलकर्णी, वाळके यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक मृदा चाचणी अधिकारी मिनल म्हस्के, यांनी केले. सूत्रसंचालन कृषी पर्यवेक्षक नंदू वानखेडे व मंडळ अधिकारी बोडखे यांनी केले तर निकम यांनी आभार मानले.

 

टॅग्स :AkolaअकोलाAastik Kumar Pandeyआस्तिककुमार पांडेयFarmerशेतकरी