शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

‘कोरोना’च्या संकटातही शेतकऱ्यांनी विकला आठ कोटींचा भाजीपाला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2020 14:55 IST

६९ शेतकरी गटांच्या माध्यमातून ५१४ मेट्रिक टन भाजीपाल्याची विक्री करीत शेतकºयांनी ७ कोटी ७१ लाख रुपयांची उलाढाल केली. 

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या संचारबंदीमुळे भाजीपाला, फळ उत्पादक शेतकºयांसमोर संकट उभे झाले होते; परंतु या संकटातही शेतकºयांनी मार्ग शोधत गट तयार करून ग्राहकांना घरपोच भाजीपाला, फळांची विक्री केली. ६९ शेतकरी गटांच्या माध्यमातून ५१४ मेट्रिक टन भाजीपाल्याची विक्री करीत शेतकºयांनी ७ कोटी ७१ लाख रुपयांची उलाढाल केली. अकोला जिल्ह्यात आत्मामार्फत शेतकरी गट विकसित करण्यात आले आहेत. गटातील शेतकºयांनी शहरातील नागरिकांना ताजा व स्वच्छ भाजीपाला घरपोच देण्यासाठी पुढाकार घेतला. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मोहन वाघ यांच्या नेतृत्वात भाजीपाला उत्पादक शेतकºयांचे ६९ गट तयार करण्यात आले. या शेतकºयांनी जिल्ह्यात व जिल्ह्याबाहेर, परराज्यातही भाजीपाला पाठविला. जिल्ह्यात विशेषत: नागरी भागात ९३ ठिकाणी थेट विक्री केंद्र सुरू केले. गटातील शेतकºयांनी आपल्या विक्री केंद्रामार्फत मोबाइलवर आॅर्डर मागविण्यास सुरुवात केली. त्यावर प्राप्त आॅर्डरनुसार, मालाचे पॅकिंग करून ग्राहकांना घरपोच माल पोहोचण्याचे काम हे शेतकरी करीत आहेत. यासाठी अर्थातच किमान अंतर राखणे, सॅनिटायझर वापरणे, शक्यतो आॅनलाइन पेमेंट स्वीकारणे यासारख्या उपायांचा वापर करण्यात येत आहे. तसेच गावात वा शहरातही मोक्याच्या जागी हे शेतकरी आपला माल घेऊन उभे राहतात. तेथे रीतसर माल मोजून ग्राहकांना दिला जातो. थेट ग्राहक विक्रीतून शेतकºयांची व्यापारी, अडते, वाहतूकदार, कमिशन एजंट यांच्या कचाट्यातून मुक्तता झाली. ग्राहकांना स्वस्त दरात भाजीपाला विकून शेतकरी गटांना नफाच झाला. थेट ग्राहकापर्यंत भाजीपाल्याची विक्री होत असल्याने, शेतकºयांचा वाहतूक खर्चही वाचला. संचारबंदीच्या काळात या शेतकºयांनी ७ कोटी ७१ लाख रुपयांची उलाढाल केली आहे. विभागीय तुलना केल्यास अकोला जिल्हा हा अमरावती विभागात सर्वाधिक उलाढाल करणारा जिल्हा ठरला आहे.  

तालुकानिहाय शेतकरी गटांनी केलेली विक्रीअकोला तालुक्यात ५३ शेतकरी गटांनी २६ विक्री केंद्रांमधून ९२.२० मेट्रिक टन माल विक्री केला. मूर्तिजापूर तालुक्यात ४१ गटांनी १० केंद्रांमधून ७८.५० मे. टन माल विक्री केला. बार्शीटाकळी तालुक्यात ४३ गटांनी १४ विक्री केंद्रांमधून ६३.२० मे. टन माल विक्री केला. अकोट तालुक्यात ३७  गट १५ विक्री केंद्रांमधून ७५.६० मे. टन मालाची विक्री करू शकले. तेल्हारा तालुक्यात ३६ गटांनी १४ केंद्रांवर आपला ६९.८५ मे., टन माल विक्री केला. पातूर तालुक्यात ४० गटांनी ११ विक्री केंद्रांवर ६९.६० मे. टन माल विक्री केला. बाळापूर तालुक्यात ३८ गटांनी १४ केंद्रांवर ६४.८५ मे. टन मालाची विक्री केली.

टॅग्स :AkolaअकोलाFarmerशेतकरीcorona virusकोरोना वायरस बातम्या