शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

‘कोरोना’च्या संकटातही शेतकऱ्यांनी विकला आठ कोटींचा भाजीपाला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2020 14:55 IST

६९ शेतकरी गटांच्या माध्यमातून ५१४ मेट्रिक टन भाजीपाल्याची विक्री करीत शेतकºयांनी ७ कोटी ७१ लाख रुपयांची उलाढाल केली. 

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या संचारबंदीमुळे भाजीपाला, फळ उत्पादक शेतकºयांसमोर संकट उभे झाले होते; परंतु या संकटातही शेतकºयांनी मार्ग शोधत गट तयार करून ग्राहकांना घरपोच भाजीपाला, फळांची विक्री केली. ६९ शेतकरी गटांच्या माध्यमातून ५१४ मेट्रिक टन भाजीपाल्याची विक्री करीत शेतकºयांनी ७ कोटी ७१ लाख रुपयांची उलाढाल केली. अकोला जिल्ह्यात आत्मामार्फत शेतकरी गट विकसित करण्यात आले आहेत. गटातील शेतकºयांनी शहरातील नागरिकांना ताजा व स्वच्छ भाजीपाला घरपोच देण्यासाठी पुढाकार घेतला. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मोहन वाघ यांच्या नेतृत्वात भाजीपाला उत्पादक शेतकºयांचे ६९ गट तयार करण्यात आले. या शेतकºयांनी जिल्ह्यात व जिल्ह्याबाहेर, परराज्यातही भाजीपाला पाठविला. जिल्ह्यात विशेषत: नागरी भागात ९३ ठिकाणी थेट विक्री केंद्र सुरू केले. गटातील शेतकºयांनी आपल्या विक्री केंद्रामार्फत मोबाइलवर आॅर्डर मागविण्यास सुरुवात केली. त्यावर प्राप्त आॅर्डरनुसार, मालाचे पॅकिंग करून ग्राहकांना घरपोच माल पोहोचण्याचे काम हे शेतकरी करीत आहेत. यासाठी अर्थातच किमान अंतर राखणे, सॅनिटायझर वापरणे, शक्यतो आॅनलाइन पेमेंट स्वीकारणे यासारख्या उपायांचा वापर करण्यात येत आहे. तसेच गावात वा शहरातही मोक्याच्या जागी हे शेतकरी आपला माल घेऊन उभे राहतात. तेथे रीतसर माल मोजून ग्राहकांना दिला जातो. थेट ग्राहक विक्रीतून शेतकºयांची व्यापारी, अडते, वाहतूकदार, कमिशन एजंट यांच्या कचाट्यातून मुक्तता झाली. ग्राहकांना स्वस्त दरात भाजीपाला विकून शेतकरी गटांना नफाच झाला. थेट ग्राहकापर्यंत भाजीपाल्याची विक्री होत असल्याने, शेतकºयांचा वाहतूक खर्चही वाचला. संचारबंदीच्या काळात या शेतकºयांनी ७ कोटी ७१ लाख रुपयांची उलाढाल केली आहे. विभागीय तुलना केल्यास अकोला जिल्हा हा अमरावती विभागात सर्वाधिक उलाढाल करणारा जिल्हा ठरला आहे.  

तालुकानिहाय शेतकरी गटांनी केलेली विक्रीअकोला तालुक्यात ५३ शेतकरी गटांनी २६ विक्री केंद्रांमधून ९२.२० मेट्रिक टन माल विक्री केला. मूर्तिजापूर तालुक्यात ४१ गटांनी १० केंद्रांमधून ७८.५० मे. टन माल विक्री केला. बार्शीटाकळी तालुक्यात ४३ गटांनी १४ विक्री केंद्रांमधून ६३.२० मे. टन माल विक्री केला. अकोट तालुक्यात ३७  गट १५ विक्री केंद्रांमधून ७५.६० मे. टन मालाची विक्री करू शकले. तेल्हारा तालुक्यात ३६ गटांनी १४ केंद्रांवर आपला ६९.८५ मे., टन माल विक्री केला. पातूर तालुक्यात ४० गटांनी ११ विक्री केंद्रांवर ६९.६० मे. टन माल विक्री केला. बाळापूर तालुक्यात ३८ गटांनी १४ केंद्रांवर ६४.८५ मे. टन मालाची विक्री केली.

टॅग्स :AkolaअकोलाFarmerशेतकरीcorona virusकोरोना वायरस बातम्या