शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

शेतकरी रांगेत अन् बॅगा संपल्या; महाबीजच्या बियाण्यांसाठी उडाला गोंधळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 10:53 IST

Akola News : दोन-तीन तासांपासून रांगेत असलेल्या शेतकऱ्यांना ऐन वेळेवर बियाणे संपल्याचे सांगण्यात आल्याने गोंधळ उडाला.

ठळक मुद्देकृषी सेवा केंद्रांवर रांगाच रांगा शेतकरी संतप्त; पोलिसांना करावे लागले पाचारण

अकोला : काही दिवसांवर खरीप हंगाम आला आहे. त्यामुळे शहरातील कृषी सेवा केंद्रांवर महाबीजच्या बियाणांसाठी शेतकऱ्यांची गर्दी होत आहे. शनिवारी टिळक रोडवरील महाबीज वितरकाकडे शेतकऱ्यांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या. दोन-तीन तासांपासून रांगेत असलेल्या शेतकऱ्यांना ऐन वेळेवर बियाणे संपल्याचे सांगण्यात आल्याने गोंधळ उडाला. यावेळी शेतकऱ्यांचे उग्र रूप पाहून पोलिसांना पाचारण करावे लागले. शेवटी सोमवारी बियाणे देण्यात येईल, असे सांगून शेतकऱ्यांना परत पाठविण्यात आले. यावर्षी सोयाबीनची पेरणी वाढण्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. त्यानुसार कृषी विभागाने बियाणांचे नियोजन केले आहे; मात्र यावर्षी सोयाबीनच्या बियाणांचा भाव जास्त असल्याने महाबीजच्या बियाणांसाठी कृषी सेवा केंद्रांवर शेतकऱ्यांची गर्दी होत आहे. या बियाणांसाठी मोठ्या रांगा लागत आहे. शहरातील कृषी सेवा केंद्रांवर शनिवारीसुद्धा ही स्थिती कायम होती. टिळक रोडवरील महाबीज वितरकाकडे सकाळपासून शेतकऱ्यांच्या रांगा लागल्या होत्या; परंतु दुपारी अचानक बियाणे संपल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे उन्हात ताटकळत उभ्या असलेल्या शेतकऱ्यांचा पारा चढला व मोठा गोंधळ उडाला होता. पोलिसांनी शेतकऱ्यांना शांत करीत सोमवारी बियाणे आल्यावर घेऊन जावे, असे सांगितले आहे.

 

दोन-तीन तासांपासून उन्हात ताटकळत

महाबीजचे बियाणे खरेदीसाठी शेतकरी दोन-तीन तासांपासून उन्हामध्ये ताटकळत उभे होते. या ठिकाणी सावलीसाठी कुठलीही व्यवस्था करण्यात आली नव्हती. त्यामुळे शेतकऱ्यांना उन्हाच्या तडाख्याचा सामना करावा लागत आहे.

 

सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

बियाणांसाठी आलेल्या शेतकऱ्यांनी सोशल डिस्टन्सिंग ठेवून उभे राहावे, अशा कुठल्याही सूचना व व्यवस्था करण्यात आली नव्हती. दहा फुटांमध्ये २५-३० शेतकरी उभे होते. त्यामुळे येथे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे दिसून आले. हीच स्थिती इतर कृषी सेवा केंद्रांवरदेखील होती.

 

१४० क्विंटल बियाणे वाटप

शनिवारी सकाळपासून शेतकऱ्यांना महाबीजचे बियाणे वाटप सुरू होते. टिळक रोडवरील एका कृषी सेवा केंद्रांवर बियाणांची कमतरता असल्याने केवळ १४० क्विंटल बियाणे वाटप करण्यात आले.

 

१०० कुपन वाटप

बियाणे वितरकाकडे गोंधळ उडाल्याने यावेळी शेतकऱ्यांना कुपन वाटप करण्यात आले. या शेतकऱ्यांना सोमवारी येण्याचे सांगण्यात आले आहे. जवळपास १०० कुपन वाटप झाले आहे. शेतकऱ्यांनीही प्रत्येकी तीन बॅगा देण्यात याव्या, अशी मागणी केली.

 

बियाणे विक्रेते म्हणतात...

उपलब्ध बियाणांचे वाटप करण्यात आले. उद्या काही बियाणे माल येणार आहे. शेतकऱ्यांना सोमवारी यावे असे सांगितले. ज्या शेतकऱ्यांकडे कुपन आहे अशांना सोमवारी बियाणे वाटप करण्यात येणार आहे.

- सुभाष सावजी, बियाणे विक्रेता

 

शेतकरी म्हणतात...

सकाळपासून महाबीजच्या बियाणांसाठी रांगेत उभे आहोत; परंतु येथे बियाणे वाटपाबाबत कुठलेही नियोजन नाही. ऐन वेळेवर बियाणे संपल्याचे सांगितले. आता सोमवारी पुन्हा यावे लागणार आहे. ग्रामीण भागात राहत असल्याने येणे-जाणे अडचणीचे ठरत आहे.

- नारायण सावळे, शेतकरी, देऊळगाव

 

कोरोनाच्या काळात ग्रामीण भागातून शहरात येणे धोकादायक आहे. तरी कडक उन्हामध्ये बियाणांसाठी उभे होतो. आधीच बियाणे नसल्याचे सांगितले असते तर विनाकारण रांगेत उभे राहण्याची वेळ आली नसती. परत परत चकरा माराव्या लागत आहे.

- रामा अघडते, शेतकरी, दहिगाव गावंडे

 

महाबीजचे बियाणे मिळाले नाही. आता कुपन दिले आणि सोमवारी या असे सांगितले आहे. लवकर येऊन रांग लावावी लागत आहे. सावलीची कुठलीही व्यवस्था नाही. खरीप हंगाम जवळ असल्याने शेतकऱ्यांचे हाल होत आहे.

- बालकिशन बरदीया, शेतकरी, सांगळूद

टॅग्स :AkolaअकोलाFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्रMahabeejमहाबीज