शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीन बियाणे टंचाईवर मात करण्यासाठी शेतक-यांची तयारी

By admin | Updated: May 18, 2015 01:28 IST

अकोला जिल्ह्यात शेतक-यांकडे ८६ हजार क्विंटल बियाणे उपलब्ध.

अकोला : येत्या खरीप हंगामात जिल्ह्यात मागणीच्या तुलनेत सोयाबीन बियाणे कमी पडणार आहे. त्यामुळे निर्माण होणार्‍या सोयाबीन बियाण्याच्या टंचाईवर मात करण्यासाठी जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी तयारी केली आहे. शेतकर्‍यांकडे ८६ हजार ३६२ क्विंटल सोयाबीन बियाणे उपलब्ध असल्याचा दावा जिल्हा परिषद कृषी विभागामार्फत करण्यात आला आहे. गत पावसाळ्यात अत्यल्प पाऊस झाल्याने निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीत पिके हातून गेली. पिकांचे उत्पादन बुडाल्यासोबतच बिजोत्पादनावर परिणाम झाला. त्यामुळे यावर्षीच्या खरीप हंगामात पेरणीसाठी सोयाबीन बियाणे मागणीच्या तुलनेत कमी उपलब्ध होणार आहे. येत्या खरीप हंगामाच्या पृष्ठभूमीवर जिल्हा परिषद कृषी विभागामार्फत करण्यात आलेल्या नियोजनानुसार,जिल्ह्यातील सातही तालुक्यांत २ लाख ३५ हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन पिकाची पेरणी अपेक्षित आहे. त्यासाठी सोयाबीन पेरणीकरिता एकूण १ लाख ७६ हजार २५0 क्विंटल बियाणे लागणार आहे. त्या तुलनेत प्रत्यक्षात जिल्ह्यात ८९ हजार ८८८ क्विंटल बियाणे विक्रेत्यांकडे उपलब्ध होणार आहे. उर्वरित ८६ हजार ३६२ क्विंटल सोयाबीन बियाणे कमी पडणार आहे. त्यामुळे निर्माण होणार्‍या सोयाबीन बियाणे टंचाईवर मात करण्यासाठी जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी तयारी केली आहे. या तयारीमध्ये घरी तयार केलेले ८६ हजार ३६२ क्विंटल सोयाबीन बियाणे शेतकर्‍यांकडे उपलब्ध असल्याचा दावा जिल्हा परिषद कृषी विभागामार्फत करण्यात आला आहे. जिल्ह्यातील शेतकर्‍यांकडे ८६ हजार क्विंटलवर सोयाबीनचे बियाणे उपलब्ध असल्याने, बाजारात बियाणे कमी उपलब्ध होणार असले तरी कमी पडणारे बियाणे शेतकर्‍यांकडे उपलब्ध आहे. त्यामुळे सोयाबीन बियाण्याच्या निर्माण होणार्‍या टंचाईचा सामना करण्यासाठी शेतकर्‍यांनीच तयारी केल्याचे चित्र आहे.