शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान: क्वेट्टा येथे लष्करी मुख्यालयाजवळ आत्मघाती हल्ला; १० ठार, ३२ हून अधिक जखमी
2
टाटा, बाय बाय...! आशिया कपमध्ये हरले, बिल या खेळाडूवर फाडले; दक्षिण आफ्रिकेविरोधातील मालिकेसाठी संघातून बाहेर काढले...
3
गेमचेंजर! भारतात सापडला 'व्हाइट गोल्ड'चा खजिना; चीनवरील निर्भरता संपणार, नवी क्रांती घडणार
4
"मी आजपर्यंत एकाही कंत्राटदाराकडून कधी..."; भ्रष्टाचार, इथेनॉलच्या आरोपांवर गडकरींनी सोडलं मौन
5
Asia Cup 2025: मोहसिन नक्वींच्या हकालपट्टीची मागणी; पाकिस्तानातच जोर धरू लागली...
6
MP Accident: देवदर्शनावरून येताना टूरिस्ट बसनं उडवलं, तिघांचा मृत्यू; सणासुदीच्या दिवशी कुटुंबावर शोककळा
7
TCS Layoffs: 'स्वतःहून राजीनामा द्या किंवा टर्मिनेट व्हा'; टीसीएसमध्ये ३० हजार कर्मचाऱ्यांची कपात? TATA समूहाच्या आयटी कंपनीत भीतीचं वातावारण
8
सूत जुळलं! १२वीच्या विद्यार्थिनीचं शिक्षकावर प्रेम जडलं, लग्न केलं अन् आता पतीसाठी मागतेय सुरक्षा
9
दीपिकाला अनफॉलो केलं? चर्चांवर अखेर फराह खानने सोडलं मौन, म्हणाली, "आम्ही दोघींनी..."
10
टाटाच्या शेअरनं घेतलाय रॉकेट स्पीड, आता होणार स्प्लीट; १०००% हून अधिक परतावा देत लोकांना केलंय मालामाल!
11
GST कपातीचा फायदा ग्राहकांना नाही! कंपन्या फसवणूक करत असल्याच्या ३००० हून अधिक तक्रारी दाखल
12
Video: भारताविरोधातील पराभव सहन झाला नाही; पाकिस्तानी खेळाडूने रडत रडत बनवला व्हिडिओ अन्...
13
इंजिनियरचं धक्कादायक कृत्य, आधी पत्नीची हत्या केली, त्यानंतर मित्राला केला व्हिडीओ कॉल आणि ...
14
IndiGo Bomb Threat: इंडिगोच्या विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, दिल्ली विमानतळावर 'इमर्जन्सी'!
15
जेव्हा पाकिस्तान सरकारनं आपल्याच क्रिकेटर्सना चुना लावला; दिलेले चेकच बाऊन्स झाले; किती होती रक्कम? 
16
१ ऑक्टोबरपासून बदलणार इंट्राडे ट्रेडिंगचे नियम, गुंतवणूकदारांवर काय परिणाम होणार?
17
जीएसटी: २.२९ लाख रुपयांना लाँच झालेली ही बाईक, आता मिळतेय १.५५ लाख रुपयांना...
18
प्रेम विवाह: लग्नानंतर तुमची जोडी यशस्वी ठरेल की नाही? कुंडलीतील 'या' योगावरून मिळते उत्तर!
19
"आम्ही १५ वर्षांपासून वेगळे राहतोय...", गोविंदाच्या पत्नीचा मोठा खुलासा, सुनिता अहुजा म्हणाली...
20
संरक्षण, इन्फ्रा ते फायनान्स! 'हे' ५ शेअर्स करणार श्रीमंत! तुमच्या पोर्टफोलिओसाठी उत्तम पर्याय, टार्गेट प्राईस जाहीर

सरकार बनविण्याच्या लगबगीत शेतकऱ्यांच्या मदतीचा पेच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2019 12:25 IST

पीक नुकसानाची मदत मिळणार तरी केव्हा, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

- संतोष येलकर

अकोला: विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होऊन १५ दिवसांचा कालावधी उलटून जात असला तरी, नवे सरकार अद्याप सत्तारूढ झाले नाही. सरकार बनविण्यासाठी सुरू असलेल्या लगबगीत राज्यात अवकाळी पावसाच्या तडाख्यात हाता-तोंडाशी आलेली पिके उद्ध्वस्त झाल्याने, संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना पीक नुकसान भरपाईची मदत जाहीर करण्याचा पेच कायमच आहे. त्यामुळे पीक नुकसानाची मदत मिळणार तरी केव्हा, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.पावसाळा संपल्यानंतर महिनाभराचा कालवधी उलटून गेला; मात्र अवकाळी पावसाचा कहर सुरूच असल्याने, विदर्भ-मराठवाड्यासह राज्यभरात काढणीला आलेल्या आणि कापणी झालेल्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले. अवकाळी पावसाच्या तडाख्यात सोयाबीन सडले असून, ज्वारीला कोंब फुटले आहेत. वेचणीला आलेला कापूस भिजला असून, कपाशीच्या बोंड्या सडल्या आहेत. तसेच भात, भाजीपाला आणि फळपिकांचेही प्रचंड नुकसान झाले आहे. हाता-तोंडाशी आलेल्या पिकांचे उत्पादन बुडाल्याने, शेतकरी हवालदिल झाला आहे. पीक नुकसानाच्या पंचनामे करण्याचे काम राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये जिल्हा प्रशासनामार्फत सुरू आहे. संकटात सापडलेल्या शेतकºयांना दिलासा देण्यासाठी पीक नुकसान भरपाईची मदत मात्र अद्याप सरकारकडून जाहीर करण्यात आली नाही. विधानसभा निवडणुकीचे निकाल २४ आॅक्टोबर रोजी जाहीर करण्यात आले. पंधरा दिवसांचा कालावधी उलटून जात असला तरी; नवे सरकार स्थापन करण्याचा गुंता सुटला नाही. सरकार स्थापनेसाठी मुंबईत राजकारण्यांची लगबग सुरूच असल्याने, अवकाळी पावसाच्या तडाख्यात पीक नुकसानामुळे संकटात सापडलेल्या शेतकºयांना मदत देण्याचा निर्णय अद्याप होऊ शकला नाही. त्यानुषंगाने नवे सरकार केव्हा सत्तारूढ होणार आणि शेतकºयांना पीक नुकसान भरपाईची मदत केव्हा मिळणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.पिकांचे उत्पादन बुडाले; पण मदत किती मिळणार?महिनाभरापासून राज्यात सुरू असलेल्या अवकाळी पावसाच्या तडाख्यात शेतातील कापणीला आलेल्या आणि कापणी झालेल्या पिकांचे अतोनात नुकसान झाले. सर्वच पिकांचे उत्पादन पाण्यात बुडाले असून, पिकांच्या लागवडीवर केलेला खर्चही निघणार नसल्याने, शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे येत्या रब्बी हंगामात पेरणीचा खर्च कसा भागविणार, असा पेच शेतकºयांसमोर उभा राहिला आहे. ‘अवकाळी’च्या तडाख्यात पिकांचे उत्पादन बुडाले असले तरी, पीक नुकसान भरपाईची मदत अद्याप सरकारकडून जाहीर करण्यात आली नाही. त्यामुळे पीक नुकसान भरपाईपोटी हेक्टरी किती मदत मिळणार, असा प्रश्न शेतकºयांकडून उपस्थित होत आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाFarmerशेतकरी