शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
3
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
4
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
5
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
6
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
7
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
8
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
9
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
10
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
11
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
12
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
13
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
14
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल
15
भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा
16
गाझातील रुग्णालयावर इस्त्रायलचा हल्ला, ४ पत्रकारांसह १४ लोक ठार; जगभरातून होतोय निषेध 
17
पाकिस्तान हेरगिरी प्रकरणी यूट्यूबर ज्योती मल्होत्राला केलं कोर्टात हजर; ९५ दिवसांनी तुरुंगाबाहेर!
18
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
19
Shakib Al Hasan World Record : ५०० विकेट्स अन् ७००० धावा! पठ्ठ्यानं वर्ल्ड रेकॉर्डसह केली हवा
20
Farrhana Bhatt : वडील सोडून गेले, चारित्र्यावर झाली चिखलफेक, जीवे मारण्याच्या धमक्या; अभिनेत्रीने केला संघर्ष

अकोला जिल्ह्यातील कापूस केंद्रावर शेतकऱ्यांची थट्टा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2020 10:06 IST

लॉकडाउनमुळे व्यापारीही कापूस खरेदी करीत नसल्याने कापसाचे काय करावे, असा प्रश्न शेतकºयांना आहे.

- प्रशांत विखे लोकमत न्यूज नेटवर्कतेल्हारा: भाववाढीच्या उद्देशाने घरात कापूस ठेवलेल्या शेतकऱ्यांना सीसीआयची कापूस खरेदी सुरू झाल्याने दिलासा मिळाला होता; मात्र तेल्हारा येथील कापूस खरेदी केंद्रावर शेतकºयांची थट्टा सुरू असल्याचे चित्र आहे. कापूस खरेदीसाठी लावलेले निकष शेतकºयांच्या मानगुटीवर बसले आहेत. दर्जेदार नसल्याचे कारण समोर अनेक शेतकºयांचा कापूस परत करण्यात येत आहे. लॉकडाउनमुळे व्यापारीही कापूस खरेदी करीत नसल्याने कापसाचे काय करावे, असा प्रश्न शेतकºयांना आहे.सीसीआय केंद्रावर राज्य शासन राज्य पणन महासंघ (फेडरेशन) मार्फत कापूस खरेदी करीत आहे. कापूस उत्पादक शेतकºयांची संख्या तीन हजाराच्यावर आहे. अगोदरच उशिरा सुरू झालेली खरेदी व त्यात लॉकडाउन सुरू असल्याने सुरुवातीला १५ व नंतर ३० शेतकºयांना केंद्र्रावर कापूस विक्रीकरिता बोलावत आहे. अनेक दिवसांपासून घरात पडलेला कापूस काही प्रमाणात डागी झाला किंवा थोड्याफार प्रमाणात मागील वेचणीचा कापूस ट्रॅक्टर-ट्रॉलीमध्ये आला तर केंद्रावरून पूर्ण ट्रॉली परत पाठविण्यात येत आहे. शेतकºयांनी आपआपल्या परीने घरात किंवा गोडावूनमध्ये कापूस भरून ठेवला असताना केंद्रावर आणलेला कापूस केंद्रप्रमुख या ना त्या कारणाने परत पाठवित आहेत. असाच प्रकार शेतकºयांसोबत शुक्रवारी घडला. शेतकºयांचा आक्रोश बघता तालुका कृषी अधिकारी, गटविकास अधिकारी, बाजार समितीचे सभापती, संचालक, सहायक निबंधकचे कर्मचारी खरेदी केंद्रावर पोहोचले होते. १४ मेपर्यंत केवळ ३११ शेतकºयांचा कापूस मोजला गेल्याची माहिती मिळाली असून, ३ हजाराच्यावर किंवा जवळपास असलेल्या शेतकºयांचा कापूस केव्हा मोजल्या जाईल व त्याचे पैसे केव्हा मिळतील,असा प्रश्न आहे. प्रतीक्षा करूनही जर कापूस खरेदी केला नाही तर काय करायचे, असा प्रश्न शेतकºयांना पडला आहे. कापसाची अवस्था बघता शासनाची ही खरेदी जगू देत नाही अन् मरू पण देत नाही, अशा अवस्थेत शेतकरी आहे. त्यामुळे यावर्षी शेतकरी कापसाचा पेरा करणार नसल्याचे चित्र आहे.शेतकºयांचे नियोजन बिघडले कापूस विकून शेतकरी खरिपाचे नियोजन करतात. यावर्षी सीसीआय केंद्रावर कापूस खरेदीस मोठ्या प्रमाणात विलंब होत आहे. तसेच व्यापारीही कापूस खरेदी करीत नसल्याने शेतकºयांचे नियोजन बिघडले आहे. खरीप हंगाम काही आठवड्यावर आला असल्याने कापूस खरेदीचा वेग वाढविण्याची मागणी शेतकºयांनी केली आहे.

मी कापूस खरेदी ही शासनाच्या निकषानुसार करीत आहे. निकषात बसत नसलेला कापूस नाइलाजास्तव परत पाठविल्या जात आहे.-जगन्नाथ बोंडे,ग्रेडर, तेल्हारा.

 

टॅग्स :Telharaतेल्हाराAkolaअकोलाFarmerशेतकरी