शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

विषबाधेच्या घटना टाळण्यासाठी गावा-गावांत शेतकऱ्यांच्या बैठका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2019 11:22 IST

प्रबोधन करण्याचा अभिनव उपक्रम कृषी विभागामार्फत राबविण्यात येत आहे.

- संतोष येलकरअकोला : कीटकनाशकाच्या फवारणीतून शेतकरी व शेतमजुरांना होणाºया विषबाधेच्या घटना टाळण्यासाठी अकोला जिल्ह्यात गावा-गावांमध्ये शेतकऱ्यांच्या बैठका घेऊन, फवारणी करताना काळजी घेण्यासंदर्भात शेतकºयांचे प्रबोधन करण्याचा अभिनव उपक्रम कृषी विभागामार्फत राबविण्यात येत आहे.सतत ढगाळ वातावरण आणि पाऊस सुरू असल्याने अकोला जिल्ह्यात कपाशी, सोयाबीन या पिकांवर मोठ्या प्रमाणात कीड व रोगांचा प्रादुर्भाव वाढला असून, कीड व रोगांच्या प्रादुर्भाव नियंत्रणासाठी शेतकºयांकडून पिकांवर कीटकनाशकांची फवारणी करण्यात येत आहे; परंतु गत दोन महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यात कीटकनाशकांच्या फवारणीतून शेतकरी व शेतमजुरांना विषबाधा होण्याच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे कीटकनाशकांच्या फवारणीतून शेतकरी-शेतमजुरांना होणाºया विषबाधेच्या घटना रोखण्यासाठी जिल्हा परिषद कृषी विभाग, जिल्हा कृषी विभागामार्फत जिल्ह्यातील ७२४ गावांमध्ये शेतकºयांच्या जनजागृती बैठका घेण्यात येत आहेत. गत १५ दिवसांपासून गावा-गावांत शेतकºयांच्या बैठका घेऊन, कीटकनाशकाची फवारणी करताना व फवारणी केल्यानंतर घ्यावयाची काळजी, यासंदर्भात शेतकºयांचे प्रबोधन करण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे. शेतकºयांच्या बैठकांमध्ये कृषी विभागाचे अधिकारी, कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षकांसह कीटकनाशके, बियाणे व खते कंपन्यांच्या संबंधित प्रतिनिधींकडून फवारणी करताना आणि फवारणीनंतर घ्यावयाची काळजी, यासंदर्भात शेतकºयांना मार्गदर्शन करण्यात येत आहे.१४१ मोठ्या, ५८३ लहान गावांमध्ये बैठका!कीटकनाशक फवारणीसंदर्भात शेतकºयांचे प्रबोधन करण्यासाठी जिल्ह्यातील १४१ मोठ्या आणि ५८३ लहान गावांत अशा एकूण ७२४ गावांमध्ये शेतकºयांच्या बैठका कृषी विभागामार्फत घेण्यात येत आहेत.असे केले जात आहे शेतकºयांचे प्रबोधन!शेतकºयांच्या बैठकांमध्ये कीटकनाशक फवारणीसंदर्भात प्रबोधन करण्यात येत आहे. त्यामध्ये फवारणी करताना व फवारणी केल्यानंतर घ्यावयाची काळजी, यासंदर्भात ‘एलसीडी प्रोजेक्टर’द्वारे माहितीचे सादरीकरण शेतकरी व शेतमजुरांसमोर करण्यात येत आहे. तसेच सुरक्षा किट परिधान करून फवारणीचे प्रात्यक्षिकही शेतकरी-शेतमजुरांसमोर करण्यात येत आहे.कीटकनाशक फवारणीतून शेतकरी-शेतमजुरांना होणाºया विषबाधेच्या घटना नियंत्रणासाठी जिल्ह्यातील ७२४ गावांमध्ये शेतकºयांच्या बैठका घेऊन जागृती करण्यात येत आहे. या बैठकांमधून फवारणी करताना व फवारणीनंतर घ्यावयाची काळजी, यासंदर्भात शेतकरी-शेतमजुरांचे प्रबोधन करण्यात येत आहे.-डॉ. मुरली इंगळे,कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद, अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाagricultureशेतीFarmerशेतकरी