शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

शेतकऱ्यांना दोन वर्षांपासून कृषिपंप जोडणीची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 12:35 IST

Washim News : किनखेडा येथील शेतकऱ्यांना महावितरणकडून अद्यापही कृषिपंप जोडणी मिळाली नाही

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : सिंचन करून आपली आर्थिक स्थिती सुधारावी या उद्देशाने गतवर्षाच्या सुरुवातीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन योजनेंतर्गत रीतसर अर्ज करून आणि कोटेशनचे पैसे भरूनही वाशिम तालुक्यातील किनखेडा येथील शेतकऱ्यांना महावितरणकडून अद्यापही कृषिपंप जोडणी मिळाली नाही. हे शेतकरी महावितरण वाशिम कार्यालयाच्या येरझाऱ्या घालून थकले असून, याची दखल वरिष्ठांनी घेण्याची मागणी त्यांनी १७ सप्टेंबर रोजी अधीक्षक अभियंत्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. वाशिम तालुक्यातील किनखेडा येथील शेतकरी शरद राजाराम भगत या शेतकऱ्यासह इंदू महादेव डाखोरे या महिला शेतकऱ्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर याेजनेंतर्गत कृषिपंप जोडणीसाठी महावितरणकडे अर्ज केले आहेत. त्यात इंदू महादेव डाखोरे या आदिवासी महिला शेतकऱ्याने १८ जानेवारी २०२० रोजी महावितरण वाशिमकडे अर्ज करून कोटेशनसाठी ६९७५ रुपये रक्कम भरली, तर शरह राजाराम भगत या शेतकऱ्याने २१ फेब्रुवारी रोजी अर्ज करून कोटेशनचे ८४२५ रुपये भरले आहेत. त्यामुळे या शेतकऱ्यांना किमान तीन, चार महिन्यांत कृषिपंप जोडणी मिळणे अपेक्षित होते; परंतु दोन वर्षे उलटत आली तरी या शेतकऱ्यांना कृषिपंप जोडणी देण्याची तसदी वाशिम तालुका महावितरणकडून घेण्यात आली नाही. त्यामुळे हे दोन्ही शेतकरी सतत महावितरण कार्यालयाच्या येरझाऱ्या घालत आहेत. 

वाशिम उपविभागांतर्गत प्रलंबित कृषिपंप जोडणीची माहिती संबंधितांकडून घेऊ व त्याची कारणेही विचारून संबंधित शेतकऱ्यांना तातडीने कृषिपंप जोडणी देण्याच्या सूचना करू.-रत्नदीप तायडे,कार्यकारी अभियंता महावितरण वाशिम,

टॅग्स :mahavitaranमहावितरणwashimवाशिम