शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

शासन निर्णयाअभावी थकबाकीदार शेतकरी संभ्रमात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 15:28 IST

अकोला : कर्जमाफी योजनेत ३० जून २०१७ पर्यंत थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्याची घोषणा गत महिन्यात शासनामार्फत करण्यात आली; मात्र यासंदर्भात शासन निर्णय अद्याप काढण्यात आला नाही. त्यामुळे कर्जमाफीचा लाभ मिळणार की नाही, याबाबत थकबाकीदार शेतकºयांमध्ये संभ्रमाचे वातावरण पसरले आहे.

ठळक मुद्देथकबाकीदार शेतकऱ्यांसाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना’ जाहीर करण्यात आली. ३० जून २०१७ पर्यंत थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात येणार असल्याची घोषणा गत महिन्यात शासनामार्फत करण्यात आली. मात्र यासंदर्भात शासनाचा निर्णय अद्याप जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) कार्यालयांना प्राप्त झाला नाही.

संतोष येलकर

अकोला : कर्जमाफी योजनेत ३० जून २०१७ पर्यंत थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्याची घोषणा गत महिन्यात शासनामार्फत करण्यात आली; मात्र यासंदर्भात शासन निर्णय अद्याप काढण्यात आला नाही. त्यामुळे कर्जमाफीचा लाभ मिळणार की नाही, याबाबत थकबाकीदार शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण पसरले आहे.

गत २८ जून २०१७ रोजीच्या शासन निर्णयानुसार राज्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना’ जाहीर करण्यात आली. या योजनेंतर्गत ३० जून २०१६ पर्यंत थकबाकीदार शेतकऱ्यांना दीड लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी जाहीर करण्यात आली. कर्जमाफीसाठी गत २४ जुलै ते २२ सप्टेंबर या कालावधीत थकबाकीदार शेतकºयांकडून ‘आॅनलाइन’ अर्ज स्वीकारण्यात आले. त्यामध्ये कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना प्रत्यक्ष कर्जमाफीचा लाभ देण्याची प्रक्रिया गत आॅक्टोबरपासून सुरू करण्यात आली. त्यानंतर ३० जून २०१७ पर्यंत थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात येणार असल्याची घोषणा गत महिन्यात शासनामार्फत करण्यात आली; मात्र यासंदर्भात शासनाचा निर्णय अद्याप जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) कार्यालयांना प्राप्त झाला नाही. शासन निर्णय अद्याप काढण्यात आला नसल्याने, कर्जमाफी योजनेंतर्गत ३० जून २०१६ नंतर ३० जून २०१७ पर्यंत कर्ज घेतलेल्या थकबाकीदार शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ मिळणार की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.खरीप हंगामासाठी पीक कर्ज काढण्याचा पेच!येत्या खरीप हंगामासाठी पीक कर्ज काढण्याकरिता गतवर्षी (२०१७) पीक बँकांकडून घेतलेल्या पीक कर्जाची परतफेड करणे आवश्यक आहे. ३० जून २०१७ पर्यंत थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्याबाबत शासन निर्णय अद्याप काढण्यात आला नाही. तसेच नवीन कर्जासाठी गतवर्षीच्या पीक कर्जाची परतफेड केल्यास, कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे येत्या खरीप हंगामासाठी पीक कर्ज काढण्याचा पेच ३० जून २०१७ पर्यंतच्या थकबाकीदार शेतकऱ्यां समोर निर्माण झाला आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाFarmerशेतकरीgovernment schemeसरकारी योजना