शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे सरकार फक्त श्रीमंतांचे', महाराष्ट्रातील ७६७ शेतकऱ्यांच्या आत्महत्येवरुन राहुल गांधींचा हल्लाबोल
2
पुन्हा एक सोनम! आत्याच्या नवऱ्यासोबतच १५ वर्षांपासून प्रेमसंबंध; तरुणीने लग्न होताच पतीचा काढला काटा
3
Video: साप... साप... Live सामन्यात घडला विचित्र प्रकार, भरमैदानात उडाला गोंधळ अन् मग...
4
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धविराम कुणी केला? अखेर एस. जयशंकर यांचं वॉशिंग्टनमधून मोठं विधान, म्हणाले...
5
इन्स्टाग्रामवर चूक केली, माफीही मागितली; तरी राजा रघुवंशीची बहीण मोठ्या अडचणीत सापडली! पोलिसांनी केली कारवाई
6
भीषण वास्तव! डोक्यावर दप्तर...; शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांची धडपड, करतात जीवघेणा प्रवास
7
"कामासाठी कॉम्प्रोमाइज केलंस का?", 'ठरलं तर मग' फेम अभिनेत्याला चाहत्याचा प्रश्न, म्हणाला- "हो, पण..."
8
बुडालेल्या बँकांवर डाव लावला, एकीने नशीब फळफळवले; आता हजारो कोटींमध्ये खेळतोय शेतकऱ्याचा मुलगा
9
वायफाय बसवायला आलेला, एनआरआयची बायकोच आवडली; तिला मैत्रीसाठी विचारले, पुढे जे घडले...
10
आधी मुलाला नववधूसारखं सजवलं, भरपूर फोटो काढले, शेवटी संपूर्ण कुटुंबाने टाकीत उडी मारून जीवन संपवले
11
"सार्वजनिक आरोग्य विभागाने कॅन्सरचं निदान करण्यासाठी घेतलेल्या व्हॅन खरेदीत घोटाळा’’, विजय वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप  
12
दुहेरी हत्याकांड: आईचा मृतदेह बेडरुममध्ये, तर मुलाचा वॉशरुमध्ये; नोकरानेच केली हत्या, कारण...
13
४ महिन्यांत ६० रुपयांवरून २५२ वर आला 'हा' शेअर; गुंतवणूकदार मालामाल, तुमच्याकडे आहे का?
14
गोव्याहून पुण्याला निघालेले स्पाईसजेटचे विमान, हवेत असताना खिडकीच बाहेर आली...
15
अल कायदाच्या दहशतवाद्यांनी केलं तीन भारतीयांचं अपहरण, या देशात घडली धक्कादायक घटना
16
धक्कादायक! टीव्ही अभिनेत्रीच्या एकुलत्या एक मुलाची आत्महत्या, ५७व्या मजल्यावरुन उडी मारून संपवलं जीवन
17
Chaturmas 2025: सुरु होतोय चातुर्मास; या चार महिन्यात कांदा-लसूण खाऊ नये, कारण...
18
तेजस्वीसोबत ब्रेकअप.. तिच्यासाठीच अनुषा दांडेकरला सोडलं? करण कुंद्रा म्हणतो, "पैसे लावा.."
19
रुकेगा भी नहीं और झुकेगा भी नहीं; नोवाक जोकोविचचा पुष्पा अवतार, फोटोची सोशल मीडियावर चर्चा!
20
शेजारी राष्ट्राकडे आलं इलॉन मस्कचं हाय-स्पीड इंटरनेट! एका महिन्याचा खर्च पाहून धक्का बसेल!

शेतकरी आत्महत्यांची केवळ १३ प्रकरणे पात्र

By admin | Updated: June 4, 2014 22:03 IST

अकोला जिल्हास्तरीय समितीच्या सभेत केवळ १३ शेतकरी आत्महत्यांची प्रकरणे मदतीसाठी पात्र.

अकोला : शेतकरी आत्महत्यांच्या प्रकरणात मदत वाटपाबाबत बुधवारी झालेल्या जिल्हास्तरीय समितीच्या सभेत शेतकरी आत्महत्यांची ३१ प्रकरणे मदतीसाठी अपात्र ठरविण्यात आली. केवळ १३ शेतकरी आत्महत्यांची प्रकरणे मदतीसाठी पात्र ठरविण्यात आली असून, १२ प्रकरणांमध्ये फेरचौकशीचे निर्देश देण्यात आले. जिल्हास्तरीय समितीच्या सभेत एकूण ५६ शेतकरी आत्महत्यांच्या प्रकरणांवर चर्चा करण्यात आली. त्यापैकी १३ प्रकरणे मदतीसाठी पात्र ठरविण्यात आली. त्यामध्ये अकोला तालुक्यातल्या कट्यार येथील बाळकृष्ण सूर्यभान तेलगोटे, पळसो खुर्द येथील कैलास सुखदेव सरदार, अंबिकापूर येथील गोपाल सहदेव मामनकर, दहीगाव गावंडे येथील रुपेश पंजाबराव प्रांजळे, बोरगाव मंजू येथील शिशुपाल लालसिंग पवार, उगवा येथील मधुकर श्रीराम पवार, पातूर तालुक्यातल्या चरणगाव येथील राधा अरुण देशमुख, मळसूर येथील आत्माराम नारायण पायधन, आकोट तालुक्यातील अडगाव येथील उत्तम मारोती पटके, तेल्हारा तालुक्यातल्या बोरव्हा येथील रमेश सीताराम भिलावेकर, टाकळी येथील आनंदा रामदास गवई, बाळापूर तालुक्यातल्या अंदुरा येथील गजानन जनार्दन पाटील आणि मूर्तिजापूर तालुक्यातील जामठी येथील सुरेश पुरुषोत्तम रडके इत्यादी १३ शेतकरी आत्महत्यांची प्रकरणे मदतीसाठी पात्र ठरविण्यात आली. उर्वरित ३१ शेतकरी आत्महत्यांची प्रकरणे मदतीसाठी अपात्र ठरविण्यात आली असून, १२ शेतकरी आत्महत्या प्रकरणांमध्ये फेरचौकशी करण्याचे निर्देश देण्यात आले. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतर पहिल्यांदाच झालेल्या जिल्हास्तरीय समितीच्या सभेत सुमारे ५६ शेतकरी आत्महत्यांच्या प्रकरणांवर चर्चा करण्यात आली.