शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
2
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
3
टाटा ट्रस्ट्समध्ये नवा पेच! पुनर्नियुक्ती नाकारल्यानंतर मेहेली मिस्त्री यांचं मोठं पाऊल; सर्वांनाच पाठवली नोटीस
4
राज ठाकरे सकाळी ९च्या गर्दीत बदलापूर-कल्याणला चढून लोकल ट्रेनमध्ये विंडो सीट पकडू शकतील का?
5
एकनाथ खडसेंच्या बंगल्यातून CD, पेनड्राईव्ह, कागदपत्रे चोरी झालेच नाहीत?, पोलीस तपासात काय समोर आलं?
6
पाकिस्तानने अणुबॉम्ब फोडला, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
7
राज ठाकरेंना दोन लाख मुस्लीम दुबार मतदार का दिसले नाहीत? शेलार म्हणाले, 'अजून वेळ गेलेली नाही'
8
'सीपीआर द्यायचं माहीत नाही, व्हिडीओ काढले'; महिला वकिलाचा कोर्टातच दुर्दैवी मृत्यू, शेजारीच होते रुग्णालय
9
हनिमूनसाठी जोडप्याने बुक केली दुबई ट्रीप, लाखो रुपये दिले; परदेशात पोहोचल्यावर बसला मोठा धक्का!
10
यूपी, बंगाल, तामिळनाडूसह 12 राज्यांमध्ये उद्यापासून SIR प्रक्रिया सुरू; 'या' पक्षांचा तीव्र विरोध...
11
'भुल भूलैया ४'मध्ये अक्षय कुमार-कार्तिक आर्यन एकत्र येणार? चर्चा सुरु; दिग्दर्शक म्हणाले...
12
टिंडरवरची गर्लफ्रेंड महागात पडली! तोंडओळखीतच इंजिनियर तरुण लट्टू झाला अन् कंगाल होऊन बसला! 
13
"मी ऐकलंय की मराठी अभिनेत्रीसोबत त्याचं अफेअर...", गोविंदाबद्दल पत्नी सुनीता आहुजाचा खुलासा
14
₹३४,००० पगार असेल तर ८ व्या वेतन आयोगानंतर किती होईल? जाणून घ्या कॅलक्युलेशन
15
Tulsi Vivah 2025: ज्यांना मुलगी नाही त्यांनाही तुळशी विवाह लावल्याने मिळते कन्यादानाचे पुण्य!
16
चीन-पाकिस्तानसह अमेरिकेलाही एकाचवेळी बसेल चाप; 'बगराम एअरबेस' भारतासाठी किती महत्त्वपूर्ण?
17
OPEC+ Oil Output: आणखी एक अग्निपरीक्षा; ८ देशांनी मिळून घेतला असा निर्णय ज्याचा थेट भारतावर होणार परिणाम, का वाढलं टेन्शन?
18
देशातील सर्वात श्रीमंत राजघराणे! अजूनही जगतात राजेशाही जीवन! कमाईचे मुख्य साधन कोणतं?
19
क्रिकेट लीगसाठी गेल, गप्टिलसह ७० क्रिकेटपटूंना श्रीनगरला नेले, अन् आयोजकच फरार झाले, नेमकं प्रकरण काय? 
20
IAS Anuradha Pal : स्वप्न होती मोठी! घरची परिस्थिती बिकट, वडील विकायचे दूध; लेक झाली IAS, डोळे पाणावणारी गोष्ट

सावकारी कर्जमाफीत शेतकरी याद्यांची पडताळणी रेंगाळली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2020 11:10 IST

शेतकºयांच्या याद्या पडताळणी रेंगाळल्याने, जिल्ह्यातील कर्जदार शेतकºयांना सावकारी कर्जमाफी योजनेचा लाभ केव्हा मिळणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

- संतोष येलकर लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: सावकारी कर्जमाफी योजनेंतर्गत जिल्ह्यात परवानाधारक सावकारांकडून कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यासाठी ११ हजार कर्जदार शेतकऱ्यांच्या याद्या जिल्हा उपनिबंधक कार्यालयामार्फत दोन महिन्यांपूर्वी जिल्ह्यातील सातही तहसील कार्यालयांकडे पाठविण्यात आल्या. त्यापैकी ९०० शेतकºयांच्या याद्यांची पडताळणी तलाठ्यांकडून करण्यात आली; मात्र १० हजार १०० शेतकºयांच्या याद्या पडताळणीसाठी अद्याप तलाठ्यांकडे प्रलंबित आहेत. त्यामुळे शेतकºयांच्या याद्या पडताळणी रेंगाळल्याने, जिल्ह्यातील कर्जदार शेतकºयांना सावकारी कर्जमाफी योजनेचा लाभ केव्हा मिळणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.शासन निर्णयानुसार विदर्भ-मराठाड्यातील शेतकºयांनी परवानाधारक सावकारांकडून घेतलेले कर्ज माफ करण्यात आले आहे. त्यानुसार पात्र शेतकºयांना सावकारी कर्जमाफी योजनेचा लाभ देण्याचा कार्यक्रम सहकार विभागामार्फत राबविण्यात येत आहे. योजनेंतर्गत परवानधारक सावकारांकडून कर्ज घेतलेल्या ११ हजार कर्जदार शेतकºयांच्या याद्या जिल्हा उपनिबंधक कार्यालयामार्फत गत नोव्हेंबर व डिसेंबरमध्ये जिल्ह्यातील सातही तहसील कार्यालयाकडे पडताळणीसाठी पाठविण्यात आल्या. कर्जदार शेतकरी सातबाराधारक आहेत की नाही, कोणी नोकरीवर आहे काय, पेन्शनधारक आहेत काय, यासंदर्भात पडताळणी करण्यासाठी तहसील कार्यालयांकडून शेतकºयांच्या याद्या संबंधित तलाठ्यांकडे पाठविण्यात आल्या. ११ हजार शेतकºयांच्या याद्यांपैकी ९०० शेतकºयांच्या याद्यांची पडताळणी करण्यात आली असली तरी, उर्वरित १० हजार १०० शेतकºयांच्या याद्यांची पडताळणी अद्याप तलाठ्यांकडे प्रलंबित आहे. शेतकºयांच्या याद्यांची पडताळणी रेंगाळल्याने कर्जदार शेतकºयांना सावकारी कर्जमाफी योजनेचा लाभ केव्हा मिळणार, यासंदर्भात प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

११ हजार शेतकºयांचे १५ कोटींचे कर्ज होणार माफ!सावकारी कर्जमाफी योजनेंतर्गत जिल्ह्यात परवानाधारक सावकारांकडून कर्ज घेतलेल्या ११ हजार कर्जदार शेतकºयांचे १५ कोटी रुपयांचे कर्ज माफ होणार आहे. कर्जदार शेतकºयांचे कर्ज माफ करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असली तरी, शेतकºयांच्या याद्यांची पडताळणी मात्र रेंगाळली आहे.सावकारी कर्जमाफी योजनेंतर्गत जिल्ह्यातील कर्जदार ११ हजार शेतकºयांच्या याद्या नोव्हेंबर व डिसेंबरमध्ये तहसील कार्यालयाकडे पाठविण्यात आल्या. तहसील कार्यालयांकडून शेतकºयांच्या याद्या पडताळणीसाठी तलाठ्यांकडे पाठविण्यात आल्या. त्यापैकी पडताळणी करण्यात आलेल्या ९०० शेतकºयांच्या याद्या प्राप्त झाल्या असून, उर्वरित शेतकरी याद्यांची पडताळणी अद्याप प्रलंबित आहे.-डॉ. प्रवीण लोखंडे,जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था)

 

टॅग्स :AkolaअकोलाFarmerशेतकरी