शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
4
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
5
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
6
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
7
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
8
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
9
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
10
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
11
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
12
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
13
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
14
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
15
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
16
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
17
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
18
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
19
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
20
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांचा शेतमाल घरीच पडून; घर खर्च, पीक कर्ज भरणे झाले कठीण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2020 13:56 IST

शेतकरी प्रचंड आर्थिक अडचणीत सापडला असून, घर खर्च आणि पीक कर्ज भरण्याचे संकट त्यांच्यापुढे उभे ठाकले आहे.

अकोला: कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी शासनाने सर्वत्र संचारबंदी लागू केली आहे. नागरिकांनी एकत्र जमू नये, त्यातून हा प्रसार वाढू नये, यासाठीची काळजी घेतली जात आहे. गर्दी टाळण्याकरिता जीवनावश्यक वस्तंूची दुकाने २४ तास खुली ठेवण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे; पण शेतमाल खरेदी होत नसल्याने शेतकरी प्रचंड आर्थिक अडचणीत सापडला असून, घर खर्च आणि पीक कर्ज भरण्याचे संकट त्यांच्यापुढे उभे ठाकले आहे.गतवर्षी पावसाच्या अनिश्चिततेचा फटका सुरुवातीला मूग, उडीद पिकाला बसल्याने या दोन्ही पिकांचे उत्पादन घटले. सोयाबीन, कापूस पिकाला अति पावसाचा फटका बसल्याने सोयाबीनचा उतारा घटला. सतत पाऊस सुरू राहिल्याने कापसाची प्रतही घटली. ही झीज भरू न काढण्यासाठी शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात गहू हरभरा पिकांची पेरणी केली; परंतु पेरणीला उशीर झाल्याने हरभºयाचे उत्पादन घटले. अवकाळी पावसाचाही फटका बसला. परिणामी, गहू, भाजीपाला, फळ पिकांचे प्रचंड नुकसान झाले. यातून शेतकºयांची आर्थिक घडी सुधारणे अशक्य असतानाच, कोरोनारू पी नवीन संकटाने जगालाच वेठीस धरले आहे. परिणामी, शासनाला कठोर पावले उचलावी लागत असून, संचारबंदी लागू करण्यात आली आहे. २१ मार्चपर्यंत अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती सुरू होती. तोपर्यंत हरभरा ३,५०० आणि तूर सरासरी ३,५०० क्ंिवटल आवक सुरू होती. तसेच सोयाबीनची आवक ही १५० क्ंिवटलवर होती. तथापि, आजमितीस सर्व शासकीय शेतमाल खरेदी केंद्र बंद आहेत. बाजार समित्यांमध्ये केवळ जीवनावश्यक वस्तू, धान्याचे व्यवहार सुरू आहेत. सध्या गहू, हरभरा काढणी सुरू असून, तूरही शेतकºयांकडे पडून आहे; परंतु शासकीय खरेदी केंद्र सुरू नसून, बाजार समित्यांमध्येही खरेदी-विक्रीचे व्यवहार बंद आहेत. येथे केवळ धान्य, डाळी, कांदा आणि बटाटा विक्री सुरू आहे. हरभरा खरेदीसाठीचे शासकीय खरेदी केंद्र सुरू नसल्याने हक्काची बाजार समिती शेतकºयांचा आधार आहे. तथापि, कोरोनाचा प्रसार टाळण्यासाठी ‘सोशल डिस्टन्सिंग’ आवश्यक असल्याने कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी बंद ठेवला आहे.

 कोरोनाचा प्रसार टाळण्यासाठी ‘सोशल डिस्टन्सिंग’ महत्त्वाचे आहे. शासनाने यासाठीच संचारबंदी लावली आहे. बाजारात होणारी गर्दी टाळण्यासाठी शेतमाल खरेदी-विक्रीचे व्यवहार बंद ठेवले आहेत. जीवनावश्यक वस्तू, धान्य, कांदा आणि बटाटा विक्रीचे व्यवहार सुरू आहेत; पण लोकांनी गर्दी करू नये.- शिरीश धोत्रे,सभापती,अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती, अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाFarmerशेतकरी