शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
2
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
3
कुठल्याही प्रोजेक्टमध्ये त्रुटी आढळल्यास संबंधितांवर कारवाई होणार, अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित केली जाणार - मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
4
दिवाळीपूर्वी मोठी भेट! कपडे, खाद्यपदार्थांवरील GST ५% होणार? 'या' वस्तू आणि सेवांवरील टॅक्सही घटणार
5
जम्मूच्या दोडा येथे ढगफुटी; डोंगरावरून आलेल्या पुरात चार जणांचा मृत्यू, १० हून अधिक घरे वाहून गेली
6
Pune: लक्ष्मी रोडवरील थरार... गर्दीत बस येताच चालकाला ह्रदयविकाराचा झटका; पोलीस धावले अन्...
7
Atharva Sudame: पुण्याचा रीलस्टार ते थेट राज ठाकरेंशी मैत्री; कोण आहे अथर्व सुदामे?
8
बुधवारी गणपती २०२५: १ गोष्ट अर्पण करा, पूर्ण पूजा सफल होईल; वर्षभर पुण्य, बाप्पा शुभच करेल!
9
वाह! आयुष्य असावं तर 'या' क्रिकेटरसारखं...; ६ महिने आराम अन् पगार मिळतो २७ कोटी
10
तंत्रज्ञानाची किमया! इंटरनेटशिवाय WhatsApp कॉल; गुगलचा आश्चर्याचा धक्का, काय आहे प्लॅन?
11
Ganpati Puja 2025: घरी स्थापन केलेल्या बाप्पाची दररोज पूजा कशी करावी? ‘या’ गोष्टींचे पालन आवश्यकच
12
अर्जुन-सानिया यांच्या साखरपुड्यासंदर्भातील फिरकी घेणारा प्रश्न अन् सचिन तेंडुलकरचा 'स्ट्रेट ड्राइव्ह'
13
उकडीचे की तळणीचे मोदक? वाद मोठा जहाल, पण दोन्ही मोदक आरोग्याच्या हिताचे; वाचा फायदे
14
मेड इन इंडिया! मारुतीची पहिली इलेक्ट्रिक कार अखेर लॉन्च, परदेशातही निर्यात होणार
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
16
गणेश चतुर्थी २०२५: गुरुजींना उशीर झाला? रेकॉर्डेट कंटेट नको? स्वतःच करा गणपती प्राणप्रतिष्ठा पूजाविधी
17
चीनमध्ये शक्तीप्रदर्शन; मोदी, पुतिन आणि जिनपिंग एकाच व्यासपीठावर, अमेरिकेला लागणार मिरची
18
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
19
पैसै घेऊन मूर्तीकार पळाला, कारखाना जैसे थे ठेवला; ऐनवेळी मूर्ती कुठून आणायची, गणेशभक्तांना चिंता
20
Nikki Murder Case : निक्कीला जाळणाऱ्या विपिनच्या कुटुंबाचं सर्वात मोठं खोटं पकडलं; तपासात 'अशी' झाली पोलखोल

शेतकऱ्यांचा शेतमाल घरीच पडून; घर खर्च, पीक कर्ज भरणे झाले कठीण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2020 13:56 IST

शेतकरी प्रचंड आर्थिक अडचणीत सापडला असून, घर खर्च आणि पीक कर्ज भरण्याचे संकट त्यांच्यापुढे उभे ठाकले आहे.

अकोला: कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी शासनाने सर्वत्र संचारबंदी लागू केली आहे. नागरिकांनी एकत्र जमू नये, त्यातून हा प्रसार वाढू नये, यासाठीची काळजी घेतली जात आहे. गर्दी टाळण्याकरिता जीवनावश्यक वस्तंूची दुकाने २४ तास खुली ठेवण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे; पण शेतमाल खरेदी होत नसल्याने शेतकरी प्रचंड आर्थिक अडचणीत सापडला असून, घर खर्च आणि पीक कर्ज भरण्याचे संकट त्यांच्यापुढे उभे ठाकले आहे.गतवर्षी पावसाच्या अनिश्चिततेचा फटका सुरुवातीला मूग, उडीद पिकाला बसल्याने या दोन्ही पिकांचे उत्पादन घटले. सोयाबीन, कापूस पिकाला अति पावसाचा फटका बसल्याने सोयाबीनचा उतारा घटला. सतत पाऊस सुरू राहिल्याने कापसाची प्रतही घटली. ही झीज भरू न काढण्यासाठी शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात गहू हरभरा पिकांची पेरणी केली; परंतु पेरणीला उशीर झाल्याने हरभºयाचे उत्पादन घटले. अवकाळी पावसाचाही फटका बसला. परिणामी, गहू, भाजीपाला, फळ पिकांचे प्रचंड नुकसान झाले. यातून शेतकºयांची आर्थिक घडी सुधारणे अशक्य असतानाच, कोरोनारू पी नवीन संकटाने जगालाच वेठीस धरले आहे. परिणामी, शासनाला कठोर पावले उचलावी लागत असून, संचारबंदी लागू करण्यात आली आहे. २१ मार्चपर्यंत अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती सुरू होती. तोपर्यंत हरभरा ३,५०० आणि तूर सरासरी ३,५०० क्ंिवटल आवक सुरू होती. तसेच सोयाबीनची आवक ही १५० क्ंिवटलवर होती. तथापि, आजमितीस सर्व शासकीय शेतमाल खरेदी केंद्र बंद आहेत. बाजार समित्यांमध्ये केवळ जीवनावश्यक वस्तू, धान्याचे व्यवहार सुरू आहेत. सध्या गहू, हरभरा काढणी सुरू असून, तूरही शेतकºयांकडे पडून आहे; परंतु शासकीय खरेदी केंद्र सुरू नसून, बाजार समित्यांमध्येही खरेदी-विक्रीचे व्यवहार बंद आहेत. येथे केवळ धान्य, डाळी, कांदा आणि बटाटा विक्री सुरू आहे. हरभरा खरेदीसाठीचे शासकीय खरेदी केंद्र सुरू नसल्याने हक्काची बाजार समिती शेतकºयांचा आधार आहे. तथापि, कोरोनाचा प्रसार टाळण्यासाठी ‘सोशल डिस्टन्सिंग’ आवश्यक असल्याने कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी बंद ठेवला आहे.

 कोरोनाचा प्रसार टाळण्यासाठी ‘सोशल डिस्टन्सिंग’ महत्त्वाचे आहे. शासनाने यासाठीच संचारबंदी लावली आहे. बाजारात होणारी गर्दी टाळण्यासाठी शेतमाल खरेदी-विक्रीचे व्यवहार बंद ठेवले आहेत. जीवनावश्यक वस्तू, धान्य, कांदा आणि बटाटा विक्रीचे व्यवहार सुरू आहेत; पण लोकांनी गर्दी करू नये.- शिरीश धोत्रे,सभापती,अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती, अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाFarmerशेतकरी