शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्ती आहे का...?; जे लोक मराठ्यांना त्रास देतील, त्या जातीचा नेता पाडणार, जरांगेंचा नाव न घेता धनंजय मुंडेंना इशारा
2
Narendra Modi 3.0 : गृह, अर्थ, संरक्षण, परराष्ट्र...; भाजप आपल्याकडेच ठेवणार 'CCS' मधील ही महत्वाची मंत्रालयं!
3
मोदी आज तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार, महाराष्ट्रातील 'या' ६ खासदारांच्या नावांची चर्चा
4
Jayant Patil : "समुद्र नाही याची पुणेकरांना खंत होती म्हणूनच की काय भाजपाने पुण्यात समुद्रही आणून दाखवला"
5
VIDEO: मुंबई विमानतळावर वाचला शेकडो प्रवाशांचा जीव! थोडक्यात टळली दोन विमानांची धडक
6
"हँडसम आफ्रिदी...", नवज्योतसिंग सिद्धू आणि माजी पाकिस्तानी खेळाडूचा संवाद Viral
7
मोदी सरकारमध्ये उत्तर प्रदेशमधून कुणाकुणाला संधी? ही नावं येताहेत समोर   
8
मस्तच! रोज एक चमचा तूप खाण्याचे असंख्य फायदे; रोगप्रतिकारक शक्ती होईल मजबूत अन्...
9
सावधान! Android युजर्ससाठी धोक्याची घंटा; तुमचा फोन होऊ शकतो हॅक, सरकारचा इशारा
10
भीषण परिस्थिती! कोरडा दुष्काळ, वाटीभर पाण्यासाठी रांगा; अंगावर काटा आणणारे दृश्य
11
नाशिकचे स्वच्छतादूत चंद्रकांत पाटील यांना मोदी यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी निमंत्रण
12
प्रतापराव जाधव यांची केंद्रीय मंत्रीपदी वर्णी, सायंकाळी मोदी सरकारमध्ये घेणार शपथ
13
Sara Tendulkar Net Worth : सचिनची 'लेक' कोट्यवधीची मालकीण; जाणून घ्या 'सारा' कमाईचा स्त्रोत
14
मोदींच्या नेतृत्वाखालील नव्या NDA सरकारमध्ये काय असेल अमित शाह यांची भूमिका?
15
VIDEO: १६ फूटांच्या अजगराने महिलेला जिवंत गिळले; तीन दिवसांनी पोटातून...
16
Mamata Banerjee : नरेंद्र मोदींच्या शपथविधीला उपस्थित राहणार का?; ममता बॅनर्जींनी स्पष्ट केली भूमिका
17
Modi 3.0 : 'टीम मोदी'मध्ये कोण-कोण? मंत्रीपदाची शपथ घेण्यासाठी कुणा-कुणाला आला फोन? येथे पाहा 'लेटेस्ट लिस्ट'!
18
IND vs PAK : पाकिस्तानने चूक दुरुस्त केली; भारताविरूद्धच्या सामन्यासाठी संघात मोठा बदल केला
19
Adhir Ranjan Chowdhury : "जास्त दिवस टिकणार नाही मोदी सरकार, राहुल गांधींना..."; अधीर रंजन यांची भविष्यवाणी
20
समुद्र पाहण्यासाठी गेली अन् महागडा iphone पडला; ७ तास चालले बचावकार्य, Video

शेतक-यांना आता मदतीची आस

By admin | Published: November 11, 2015 1:56 AM

अकोलाजिल्हय़ातील सर्वच गावांमध्ये दुष्काळी परिस्थिती.

अकोला: अत्यल्प पावसामुळे पिकांच्या उत्पादनात प्रचंड घट झाल्याच्या स्थितीत जिल्हय़ातील लागवडीयोग्य सर्वच ९९७ गावांमधील खरीप पिकांची सुधारित पैसेवारी ५0 पैशांपेक्षा कमी असल्याचे जिल्हा प्रशासनामार्फत जाहीर करण्यात आले. त्यामध्ये जिल्हय़ातील सर्वच गावांमध्ये दुष्काळी परिस्थितीवर शिक्कामोर्तब झाले असले तरी, शासनाकडून मदत केव्हा जाहीर केली जाते, याबाबतची आस आता दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना लागली आहे. गतवर्षीच्या पावसाळ्यात अत्यल्प पाऊस झाल्याने, नापिकीच्या स्थितीत जिल्हय़ात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती. यावर्षीदेखील पावसाने दगा दिला असून, अत्यल्प पावसामुळे जिल्हय़ात मूग, उडिदाचे पीक बुडाले. सोयाबीन उत्पादन सरासरी एकरी एक ते दीड क्विंटल झाले. कपाशी पिकाचे उत्पादनही एकरी चार क्विंटलच्या वर होणार नसल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे नापिकीच्या स्थितीत जिल्हय़ातील शेतकरी संकटात सापडला आहे. प्रत्यक्ष पीक परिस्थिती आणि उत्पादनाच्या आधारे जिल्हय़ातील खरीप पिकांची सुधारित पैसेवारी गत शनिवार, ७ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी जाहीर केली. त्यानुसार जिल्हय़ातील खरीप पिकांची सरासरी पैसेवारी ४२ पैसे आहे. खरीप पिकांची सुधारित पैसेवारी ५0 पैशांपेक्षा कमी असल्याने, जिल्हय़ातील दुष्काळी परिस्थितीचे चित्र स्पष्ट आहे. जिल्हय़ातील सर्वच गावांची पैसेवारी ५0 पैशांपेक्षा कमी असल्याची माहिती जिल्हा प्रशासनामार्फत शासनाकडे सादर करण्यात आली आहे; मात्र दुष्काळी गावांना सवलती व दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांसाठी मदत शासनामार्फत अद्याप जाहीर करण्यात आली नाही.