शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
2
"इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे, अन्यथा...", अणुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा  
3
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
4
नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’
5
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
6
मी अजूनही ठाकरेंसोबत; तेजस्वी घोसाळकरांचे स्पष्टीकरण, राजकीय वळण न देण्याचे केले आवाहन 
7
"आधी ताकद दाखवली जाते, मग..."; अमेरिकेच्या हल्ल्यांवर इस्रायलने व्यक्त केला आनंद, नेतान्याहू म्हणाले, "धन्यवाद ट्रम्प"
8
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
9
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
10
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
11
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
12
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
13
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
14
लेख: पूल कोसळला, रेल्वेतून पडून मृत्यू... जे जबाबदार, तेच बेजबाबदार म्हणून या आपत्ती
15
विशेष लेख: कुंभमेळ्याचं नवं स्टेटस! येणार ‘रील’वाली गर्दी
16
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
17
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 
18
लेख: आषाढी पायी वारी :विज्ञाननिष्ठ उत्सव
19
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 
20
मुलाला आईची जात लावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार; प्रकरण काय? 

शेतकरी पीककर्जापासून वंचित, पेरणीच्या तोंडावर बुरे दिन

By admin | Updated: June 15, 2015 01:56 IST

शेतकरी व शेतकरी नेत्यांच्या संतप्त प्रतिक्रिया.

अकोला: भाजपने सत्तेवर येण्यापूर्वी 'अच्छे दिन आने वाले है'चा नारा दिला आणि प्रचारादरम्यान शेतकर्‍यांना पीककर्ज माफी, सातबारा कोरा, शेतकर्‍यांना उत्पादन खर्चाच्या ५0 टक्के अधिक भाववाढ देऊ, जुन्या पीककर्जाचे पुनर्गठन करून नव्याने पीककर्ज देऊ, अशी आश्‍वासनं दिली. मॉन्सून आला. पेरण्या तोंडावर आल्या असतानाही शासनाने एकही मागणी पूर्ण केली नाही. शेतकर्‍यांना अच्छे दिनचे स्वप्न दाखविणार्‍या भाजप सरकारने शेतकर्‍यांवर बुरे दिनची वेळ आणली आहे. अपुर्‍या निधीमुळे पीककर्ज पुनर्गठनात अडचणी निर्माण झाल्या आहेत. अद्यापही हजारो शेतकरी खरीप पीककर्जापासून वंचित आहेत. शासनाने पीककर्ज पुनर्गठनाच्या भानगडीत न पडता, शेतकर्‍यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, अशी मागणी जिल्हय़ातील शेतकरी व शेतकरी नेत्यांनी केली आहे. शासनाने शेतकर्‍यांना सरसकट कर्जमाफीची घोषणा न केल्यास जिल्हय़ातील हतबल झालेल्या शेतकर्‍यांना संघटित करून शासनाविरोधात तीव्र लढा उभारू, असा इशारा शेतकरी नेत्यांनी 'लोकमत'शी बोलताना दिला आहे.