शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
2
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
3
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
4
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
5
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
6
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
7
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
8
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
9
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
10
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
11
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
12
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
13
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
14
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
15
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
16
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
17
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
18
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
19
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
20
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती

बोंडअळीच्या मदतीसाठी शेतकरी आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2018 02:00 IST

मूर्तिजापूर : कपाशी पिकावरील बोंडअळीग्रस्तांमधून तालुक्यातील मूर्तिजापूरसह लाखपुरी व कुरूम ही महसूल मंडळेच वगळण्यात आल्याने शेतक-यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. वगळण्यात आलेल्या मंडळातील शेतकºयांना ही मदत मिळावी, या मागणीसाठी शेतकºयांनी तहसीलदार राहुल तायडे यांना निवेदन सादर करून मदतीची मागणी केली आहे, अन्यथा १० दिवसांनंतर शेतकरी उग्र स्वरूपाचे आंदोलन करणार असल्याचे निवेदनात नमूद आहे. 

ठळक मुद्देसर्वाधिक पेरा असलेली मंडळेच वगळली : चुकीच्या सर्वेक्षणाचा शेतक-यांना फटका, ३३ टक्क्यांच्या अटीमुळे अनेक शेतकरी मदतीपासून मुकण्याची शक्यता 

लोकमत न्यूज नेटवर्कमूर्तिजापूर : कपाशी पिकावरील बोंडअळीग्रस्तांमधून तालुक्यातील मूर्तिजापूरसह लाखपुरी व कुरूम ही महसूल मंडळेच वगळण्यात आल्याने शेतक-यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. वगळण्यात आलेल्या मंडळातील शेतकºयांना ही मदत मिळावी, या मागणीसाठी शेतकºयांनी तहसीलदार राहुल तायडे यांना निवेदन सादर करून मदतीची मागणी केली आहे, अन्यथा १० दिवसांनंतर शेतकरी उग्र स्वरूपाचे आंदोलन करणार असल्याचे निवेदनात नमूद आहे. मूर्तिजापूर तालुक्यातील लाखपुरी, शेलुबाजार, निंभा, कुरूम ही मंडळे  बोंडअळीच्या मदतीपासून का वगळण्यात आली आहेत. आॅक्टोबर, नोव्हेंबर महिन्यात ज्या शेतक-यांनी बोंडअळीच्या नुकसानासाठी तक्रारी दाखल केल्या होत्या त्यांच्या शेतामध्ये मंडळ अधिकारी, कृषी सहायकांनी पाहणी केली. त्यानंतर तालुका कृषी अधिकारी, कृषी अधिकारी पंचायत समिती व तालुकास्तरीय समिती यांनी नुकसानग्रस्त प्रत्येक झाडांची १०० बोंड्यांपैकी ७०/८० बोंड्या नुकसानग्रस्त असल्याची त्यांनी पाहणी केली.  पालकमंत्री रणजित पाटील यांनी जांभा खु. व शेलुबोंडे येथील नुकसानग्रस्त शेतकºयांच्या शेतावर स्वत: पाहणी केली. खासदार संजय धोत्रे यांनी पुंडलिक नगर येथील विवेक पातोंड यांच्या शेतावर जावून बोंडअळीची पाहणी केली. सर्वांनी पाहणी केल्यानंतर जिल्हास्तरीय पाहणी आली. त्यामध्ये जिल्हा कृषी अधीक्षक, जिल्हा परिषद कृषी अधिकारी, विद्यापीठाचे शास्त्रज्ञ यांच्या समितीने नुकसानग्रस्त बोडंअळीच्या कपाशीची पाहणी करून ही कपाशी तत्काळ काढून शेत मोकळे करा, असे प्रत्येक शेतकºयांना सांगितले. शेतकºयांमधील रोष पाहता नुकसानग्रस्त शेतकºयांना मदत जाहीर न झाल्यास शहीद धर्मा पाटील प्रकरणाची पुनरावृत्ती होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. नैसर्गिक संकटाच्या मालिकेने आधीच शेतकरी हतबल झाला आहे; मात्र त्याच्या विषयी कुठलेही धोरण न आखता शासन त्याची क्रूर थट्टा करीत आहे. त्यांना आत्महत्येस प्रवृत्त केले जात आहे. यावर्षी बोंडअळीच्या कहराने कापूस बेल्ट म्हणून ओळखल्या जाणाºया या भागातील कापूस पीक पूर्णपणे उद्ध्वस्त झाले. त्या भागाचा पालकमंत्री रणजित पाटील, खासदार संजय धोत्रे, आमदार हरीश पिंपळे व जनप्रतिनिधीने दौरे करून पाहणीदेखील करून सर्वेक्षणाचे आदेश देण्यात यावे. यावेळी ९०/ १०० कापसाची बोंडे कपाशीला होती; मात्र त्यामध्ये बोंडअळीचा शिरकाव झाल्याने शेतकºयांनी छातीवर दगड ठेवून हिरव्या पिकांवर नांगर फिरविला. तरीही कपाशीवरील बोंडअळीग्रस्त मूर्तिजापूर, लाखपुरी व कुरूम या महसूल मंडळातील नुकसानग्रस्त शेतकºयांना मदतीपासून वंचित ठेवण्यात आले आहे. आता मात्र शेतकºयांचे हे शेवटचे पत्र आहे. चुकीचा अहवाल तत्काळ दुरूस्त करून शेतकºयांना जर मदत पोहोचली नाही तर शेतकरी जो मार्ग अनुसरील व त्यामधून मोठा अनर्थ घडल्यास त्यास शासन जबाबदार राहील, असाही इशारा देण्यात आला आहे.  निवेदनावर प्रगती शेतकरी मंडळाचे अध्यक्ष राजू साहेबराव वानखडे, कैलास साबळे, मुन्ना नाईकनवरे, प्रा.गौरखेडे, हरनामसिंह बाजहिरे, सुनील काळे, संजय पखाले, मुन्ना पाटील, आनंद खंडारे, संदीप मानकर, संजय गावंडे, रमेश गोळंबे, बी़ पी़ कावरे, प्रभाकर गावंडे, प्रकाश गावंडे, प्रकाश मुळे, देवीदास बांगड,अरूण बोंडे, शरद बंग, बालु टांक, माधव काळे, नितीन गावंडे, श्रीकांत वानखडे, शंकर मोरे आदींच्या स्वाक्षरी निवेदनावर आहेत.

शिवसेनेचा आंदोलनाचा इशारामूर्तिजापूर :  मूर्तिजापूर तालुक्यात बोंडअळीमुळे शेतकºयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे शासनाने मदतीसाठी दुजाभाव न करता सरसकट मदत द्यावी,अन्यथा शिवसेना आपल्या स्टाइलने आंदोलन करेल, असा इशारा  शिवसेना तालुकाप्रमुख अप्पूदादा तिडके यांनी उपविभागीय अधिकारी यांना निवेदनाद्वारे दिला आहे.तालुक्यातील अंतर्गत येणारे मंडळे या मदतीत समाविष्ट करा, अशी मागणी शिवसेना तालुकाप्रमुख अप्पू तिडके, अ‍ॅड. शरद भटकर, वैद्यकीय सेल तालुकाप्रमुख डॉ. पंकज राऊत, शिवा गव्हाणे, रुपेश कडू, मनोज जावरकर, ऋषिकेश देशमुख, रामेश्वर जामनीकर, हेमंत पाटील, ऋषिकेश डिके, मनोज गायकवाड, अंगत पाटील व इतर कार्यकर्त्यांनी केली आहे. 

टॅग्स :Akolaअकोला