शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

बोंडअळीच्या मदतीसाठी शेतकरी आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2018 02:00 IST

मूर्तिजापूर : कपाशी पिकावरील बोंडअळीग्रस्तांमधून तालुक्यातील मूर्तिजापूरसह लाखपुरी व कुरूम ही महसूल मंडळेच वगळण्यात आल्याने शेतक-यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. वगळण्यात आलेल्या मंडळातील शेतकºयांना ही मदत मिळावी, या मागणीसाठी शेतकºयांनी तहसीलदार राहुल तायडे यांना निवेदन सादर करून मदतीची मागणी केली आहे, अन्यथा १० दिवसांनंतर शेतकरी उग्र स्वरूपाचे आंदोलन करणार असल्याचे निवेदनात नमूद आहे. 

ठळक मुद्देसर्वाधिक पेरा असलेली मंडळेच वगळली : चुकीच्या सर्वेक्षणाचा शेतक-यांना फटका, ३३ टक्क्यांच्या अटीमुळे अनेक शेतकरी मदतीपासून मुकण्याची शक्यता 

लोकमत न्यूज नेटवर्कमूर्तिजापूर : कपाशी पिकावरील बोंडअळीग्रस्तांमधून तालुक्यातील मूर्तिजापूरसह लाखपुरी व कुरूम ही महसूल मंडळेच वगळण्यात आल्याने शेतक-यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. वगळण्यात आलेल्या मंडळातील शेतकºयांना ही मदत मिळावी, या मागणीसाठी शेतकºयांनी तहसीलदार राहुल तायडे यांना निवेदन सादर करून मदतीची मागणी केली आहे, अन्यथा १० दिवसांनंतर शेतकरी उग्र स्वरूपाचे आंदोलन करणार असल्याचे निवेदनात नमूद आहे. मूर्तिजापूर तालुक्यातील लाखपुरी, शेलुबाजार, निंभा, कुरूम ही मंडळे  बोंडअळीच्या मदतीपासून का वगळण्यात आली आहेत. आॅक्टोबर, नोव्हेंबर महिन्यात ज्या शेतक-यांनी बोंडअळीच्या नुकसानासाठी तक्रारी दाखल केल्या होत्या त्यांच्या शेतामध्ये मंडळ अधिकारी, कृषी सहायकांनी पाहणी केली. त्यानंतर तालुका कृषी अधिकारी, कृषी अधिकारी पंचायत समिती व तालुकास्तरीय समिती यांनी नुकसानग्रस्त प्रत्येक झाडांची १०० बोंड्यांपैकी ७०/८० बोंड्या नुकसानग्रस्त असल्याची त्यांनी पाहणी केली.  पालकमंत्री रणजित पाटील यांनी जांभा खु. व शेलुबोंडे येथील नुकसानग्रस्त शेतकºयांच्या शेतावर स्वत: पाहणी केली. खासदार संजय धोत्रे यांनी पुंडलिक नगर येथील विवेक पातोंड यांच्या शेतावर जावून बोंडअळीची पाहणी केली. सर्वांनी पाहणी केल्यानंतर जिल्हास्तरीय पाहणी आली. त्यामध्ये जिल्हा कृषी अधीक्षक, जिल्हा परिषद कृषी अधिकारी, विद्यापीठाचे शास्त्रज्ञ यांच्या समितीने नुकसानग्रस्त बोडंअळीच्या कपाशीची पाहणी करून ही कपाशी तत्काळ काढून शेत मोकळे करा, असे प्रत्येक शेतकºयांना सांगितले. शेतकºयांमधील रोष पाहता नुकसानग्रस्त शेतकºयांना मदत जाहीर न झाल्यास शहीद धर्मा पाटील प्रकरणाची पुनरावृत्ती होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. नैसर्गिक संकटाच्या मालिकेने आधीच शेतकरी हतबल झाला आहे; मात्र त्याच्या विषयी कुठलेही धोरण न आखता शासन त्याची क्रूर थट्टा करीत आहे. त्यांना आत्महत्येस प्रवृत्त केले जात आहे. यावर्षी बोंडअळीच्या कहराने कापूस बेल्ट म्हणून ओळखल्या जाणाºया या भागातील कापूस पीक पूर्णपणे उद्ध्वस्त झाले. त्या भागाचा पालकमंत्री रणजित पाटील, खासदार संजय धोत्रे, आमदार हरीश पिंपळे व जनप्रतिनिधीने दौरे करून पाहणीदेखील करून सर्वेक्षणाचे आदेश देण्यात यावे. यावेळी ९०/ १०० कापसाची बोंडे कपाशीला होती; मात्र त्यामध्ये बोंडअळीचा शिरकाव झाल्याने शेतकºयांनी छातीवर दगड ठेवून हिरव्या पिकांवर नांगर फिरविला. तरीही कपाशीवरील बोंडअळीग्रस्त मूर्तिजापूर, लाखपुरी व कुरूम या महसूल मंडळातील नुकसानग्रस्त शेतकºयांना मदतीपासून वंचित ठेवण्यात आले आहे. आता मात्र शेतकºयांचे हे शेवटचे पत्र आहे. चुकीचा अहवाल तत्काळ दुरूस्त करून शेतकºयांना जर मदत पोहोचली नाही तर शेतकरी जो मार्ग अनुसरील व त्यामधून मोठा अनर्थ घडल्यास त्यास शासन जबाबदार राहील, असाही इशारा देण्यात आला आहे.  निवेदनावर प्रगती शेतकरी मंडळाचे अध्यक्ष राजू साहेबराव वानखडे, कैलास साबळे, मुन्ना नाईकनवरे, प्रा.गौरखेडे, हरनामसिंह बाजहिरे, सुनील काळे, संजय पखाले, मुन्ना पाटील, आनंद खंडारे, संदीप मानकर, संजय गावंडे, रमेश गोळंबे, बी़ पी़ कावरे, प्रभाकर गावंडे, प्रकाश गावंडे, प्रकाश मुळे, देवीदास बांगड,अरूण बोंडे, शरद बंग, बालु टांक, माधव काळे, नितीन गावंडे, श्रीकांत वानखडे, शंकर मोरे आदींच्या स्वाक्षरी निवेदनावर आहेत.

शिवसेनेचा आंदोलनाचा इशारामूर्तिजापूर :  मूर्तिजापूर तालुक्यात बोंडअळीमुळे शेतकºयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे शासनाने मदतीसाठी दुजाभाव न करता सरसकट मदत द्यावी,अन्यथा शिवसेना आपल्या स्टाइलने आंदोलन करेल, असा इशारा  शिवसेना तालुकाप्रमुख अप्पूदादा तिडके यांनी उपविभागीय अधिकारी यांना निवेदनाद्वारे दिला आहे.तालुक्यातील अंतर्गत येणारे मंडळे या मदतीत समाविष्ट करा, अशी मागणी शिवसेना तालुकाप्रमुख अप्पू तिडके, अ‍ॅड. शरद भटकर, वैद्यकीय सेल तालुकाप्रमुख डॉ. पंकज राऊत, शिवा गव्हाणे, रुपेश कडू, मनोज जावरकर, ऋषिकेश देशमुख, रामेश्वर जामनीकर, हेमंत पाटील, ऋषिकेश डिके, मनोज गायकवाड, अंगत पाटील व इतर कार्यकर्त्यांनी केली आहे. 

टॅग्स :Akolaअकोला