शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
2
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
3
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
4
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
5
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
6
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
7
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
8
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
9
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
10
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
11
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
12
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
13
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
14
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
15
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
16
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
17
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
18
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
19
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
20
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...

सात एकरातील तुरीवर शेतकऱ्याने फिरवला ट्रॅक्टर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2021 19:04 IST

Farmer News : नुकसानीमुळे सात एकरात पेरलेल्या तुरीत ट्रॅक्टर फिरविण्याची पाळी कमळणी कमळखेड येथील शेतकऱ्यावर आली आहे.

मूर्तिजापूर :  तालुक्यात अतिवृष्टी वर परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या नाकी नऊ आणले आहे, या पावसाने शेतकऱ्यांच्या खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानीमुळे सात एकरात पेरलेल्या तुरीत कमळणी कमळखेड येथील शेतकऱ्यावर ट्रॅक्टर फिरविण्याची पाळी आली आहे.          आलुक्यात यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला.  परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे, यामुळे खरीप पिकांच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे, अतीवृष्टी व परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या सोयाबीन, मुग, उडीद, ज्वारी, बाजरी, कपाशी, व तुरीच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, अतीवृष्टीमुळे तुर या पिकाची वाढ खुंटली तर काही ठीकाणी पिक पिवळे पडून वाळले आहे, तर हजारो हेक्टर वरील सोयाबीन पीक प्याण्याखाली आल्याने उत्पादन घटले आहे, त्याच बरोबर तुर परीस्थिती प्रचंड खालावली असल्याने लागवडीचा खर्चही निघणार नाही, हे गांभीर्य लक्षात घेऊन शेतकरी तुर पिकावर ट्रॅक्टर फिरवून हरभरा पेरणीच्या तयारीला लागले आहे. अशातच कमळणी कमळखेड येथील सधन शेतकरी प्रशांत कांबे यांनी आपल्या सात एकरात पेरलेल्या तुर पिकावर ट्रॅक्टर फिरवला आहे. अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. भविष्यात लागवडीचा खर्च निघणार नाही, हे ओळखून हरभरा पेरणीसाठी शेती तयार करीत असल्याचे प्रशांत कांबे यांचे म्हणणे आहे.

टॅग्स :Murtijapurमुर्तिजापूरFarmerशेतकरी