शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

कर्जमाफीनंतरही शेतकरी आत्महत्यांचे सत्र थांबेना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2017 00:42 IST

जिल्ह्यात दीड महिन्यात १८ शेतकऱ्यांनी संपविली जीवनयात्रा

संतोष येलकर । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी शासनाने दीड महिन्यांपूर्वी कर्जमाफीची घोषणा केली, तरी प्रत्यक्षात शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणे अद्याप बाकी आहे. कर्जमाफीचा गाजावाजा करण्यात येत असतानाच जिल्ह्यात गत दीड महिन्यांच्या कालावधीत १८ शेतकऱ्यांनी आत्महत्या करून जीवनयात्रा संपविली. त्यामुळे कर्जमाफीनंतरही शेतकरी आत्महत्यांचे सत्र थांबले नसल्याची बाब समोर येत आहे.शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राज्यात छेडण्यात आलेल्या शेतकरी आंदोलनादरम्यान, अल्पभूधारक शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची पहिली घोषणा मुख्यमंत्र्यांनी गत ३ जून रोजी केली. त्यानंतर अल्पभूधारक शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासह निकषांच्या आधारे शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याची घोषणा गत ११ जून रोजी शासनामार्फत करण्यात आली. या घोषणानंतर १ एप्रिल २०१२ ते ३० जून २०१६ पर्यंत थकबाकीदार असलेल्या शेतकऱ्यांना दीड लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी देण्यात आल्याचा शासन निर्णय २८ जून रोजी काढण्यात आला. त्यानंतर कर्जमाफी योजनेची व्याप्ती वाढवीत, सन २००९ ते ३० जून २०१६ पर्यंत थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा शासनाकडून निर्णय घेण्यात आला. शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आल्याची घोषणा झाल्यानंतर दीड महिन्यांचा कालावधी उलटून गेला; मात्र प्रत्यक्षात कर्जमाफीचा लाभ अद्यापही थकबाकीदार शेतकऱ्यांना मिळाला नाही. दरम्यान, गत १ जून ते १९ जुलै या कालावधीत जिल्ह्यात १८ शेतकऱ्यांनी आत्महत्या करून जीवनयात्रा संपविली. त्यामुळे थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आल्याचा गाजावाजा सुरू असला, तरी शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच असल्याची बाब समोर येत आहे.१ जून ते १९ जुलैपर्यंत शेतकरी आत्महत्यांची प्रकरणे!१ जून ते १९ जुलै या कालावधीत जिल्ह्यात १८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. त्यामध्ये सुनील महादेव तांबडे (चांदूर), प्रल्हाद तुळशीराम बगले (तुदगाव), रफीकशा मोहंमदशा (वाडेगाव), सुरेश जगदेवराव काळे (वाडेगाव), शंकर शिवदास बुंदे (अनकवाडी), गणेश लक्ष्मण काळबोंडे (उमरा), वासुदेवराव रामकृष्ण थोटे (डोंगरगाव), संदीप विश्वंभर नानोटी (वाडेगाव), अशोक मारोती कळसकार (खंडाळा), मंगेश साहेबराव कापसे (कुटासा), जयप्रकाश उद्धवराव खारोडे (तळेगाव बु.), गजानन वामनराव जाधव (कावसा), भूषण महेंद्र खवले (उमरा), विजय महादेव काळपांडे (दहिगाव), रामदास संपत हिवराळे (तुलंगा), संतोष ओंकार मोकळकर (रौंदळा), श्रीकृष्ण काशीराम खाडे (सुकोडा), विनोद रामकृष्ण कुटे (हाता) इत्यादी १८ शेतकरी आत्महत्या प्रकरणांचा समावेश आहे. कर्जमाफीच्या मार्गदर्शक सूचना केव्हा प्राप्त होणार?थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेचा शासन निर्णय २८ जून रोजी काढण्यात आला; परंतु त्यानंतर योजनेची व्याप्ती वाढविण्याचा घेण्यात आलेला निर्णय आणि कर्जमाफीसंदर्भात मार्गदर्शक सूचना शासनाकडून अद्यापही संबंधित यंत्रणांना प्राप्त झाल्या नाही. त्यामुळे कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीसाठी मार्गदर्शक सूचना केव्हा प्राप्त होणार, याबाबत संबंधित यंत्रणांकडून प्रतीक्षा केली जात आहे.