शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
2
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
3
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात कुख्यात गणेश उइकेसह 4 माओवाद्यांचा खात्मा
4
मी नाराज कधीच नव्हतो, भाजप हा माझा पक्ष; बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांनी...- सुधीर मुनगंटीवार
5
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
6
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
7
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
8
"आज 'महाप्रलय' येणार...!"; स्वतःला अवतार म्हणवणाऱ्या Eboh Noah च्या भविष्यवाणीला घाबरून एकत्र आले हजारो लोक
9
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
10
सीक्रेट सांतानं कर्मचाऱ्याला दिलेलं गिफ्ट पाहून तरुणी भलत्याच खूश झाल्या, असं काय मिळालं?
11
"कांगारूंना कसं हरवायचं? ते शास्त्र फक्त शास्त्रींकडेच! इंग्लंडने त्यांनाच कोच करावं"
12
Travel : जगातील एक 'असे' ठिकाण, जिथे वेळेचे कोणतेच बंधन नाही! घड्याळ तर कुणी वापरतच नाही
13
Vinayak Pande and Yatin Wagh: उद्धव ठाकरेंचा आदेश, विनायक पांडे- यतिन वाघ यांची पक्षातून हकालपट्टी; राऊतांची पोस्ट!
14
'खेलरत्न'साठी हार्दिक! दिव्या देशमुखसह २४ खेळाडू अर्जुन पुरस्कारासाठी नामांकित; इथं पाहा संपूर्ण यादी
15
ज्यांनी घेतलीय त्यांनी मागच्या सीटवर बसू नका, या देशाने घातली मारुती सुझुकीच्या Fronx विक्रीवर बंदी...
16
Astrology: २०२६ आधी 'या' ३ गोष्टी केल्याने होईल मोठा लाभ; ज्योतिषांनी दिला नवीन वर्षाचा कानमंत्र!
17
"युतीमुळे तुम्हाला फरक पडत नाही, तर तोंडाची डबडी का वाजवताय?", संजय राऊत भाजपा नेत्यांवर भडकले
18
१७ वर्षानंतर तारिक रहमान बांगलादेशात परतले; राजकीय हालचालींना वेग, भारतासाठी फायद्याचे की तोट्याचे
19
"कोणालाच सत्य माहित नव्हतं...", ९ वर्षांनंतर शिल्पा शिंदेने 'भाबीजी घर पर हैं' सोडण्यामागचं सांगितलं कारण
20
जीएसटी कमी होऊन, दोन महिनेही झाले नाहीत तोच कारच्या किंमती महागणार; मारुतीपासून महिंद्रापर्यंत सर्वच कंपन्या वाढवणार किमती
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफीनंतरही शेतकरी आत्महत्यांचे सत्र थांबेना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2017 00:42 IST

जिल्ह्यात दीड महिन्यात १८ शेतकऱ्यांनी संपविली जीवनयात्रा

संतोष येलकर । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी शासनाने दीड महिन्यांपूर्वी कर्जमाफीची घोषणा केली, तरी प्रत्यक्षात शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणे अद्याप बाकी आहे. कर्जमाफीचा गाजावाजा करण्यात येत असतानाच जिल्ह्यात गत दीड महिन्यांच्या कालावधीत १८ शेतकऱ्यांनी आत्महत्या करून जीवनयात्रा संपविली. त्यामुळे कर्जमाफीनंतरही शेतकरी आत्महत्यांचे सत्र थांबले नसल्याची बाब समोर येत आहे.शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राज्यात छेडण्यात आलेल्या शेतकरी आंदोलनादरम्यान, अल्पभूधारक शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची पहिली घोषणा मुख्यमंत्र्यांनी गत ३ जून रोजी केली. त्यानंतर अल्पभूधारक शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासह निकषांच्या आधारे शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याची घोषणा गत ११ जून रोजी शासनामार्फत करण्यात आली. या घोषणानंतर १ एप्रिल २०१२ ते ३० जून २०१६ पर्यंत थकबाकीदार असलेल्या शेतकऱ्यांना दीड लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी देण्यात आल्याचा शासन निर्णय २८ जून रोजी काढण्यात आला. त्यानंतर कर्जमाफी योजनेची व्याप्ती वाढवीत, सन २००९ ते ३० जून २०१६ पर्यंत थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा शासनाकडून निर्णय घेण्यात आला. शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आल्याची घोषणा झाल्यानंतर दीड महिन्यांचा कालावधी उलटून गेला; मात्र प्रत्यक्षात कर्जमाफीचा लाभ अद्यापही थकबाकीदार शेतकऱ्यांना मिळाला नाही. दरम्यान, गत १ जून ते १९ जुलै या कालावधीत जिल्ह्यात १८ शेतकऱ्यांनी आत्महत्या करून जीवनयात्रा संपविली. त्यामुळे थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आल्याचा गाजावाजा सुरू असला, तरी शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच असल्याची बाब समोर येत आहे.१ जून ते १९ जुलैपर्यंत शेतकरी आत्महत्यांची प्रकरणे!१ जून ते १९ जुलै या कालावधीत जिल्ह्यात १८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. त्यामध्ये सुनील महादेव तांबडे (चांदूर), प्रल्हाद तुळशीराम बगले (तुदगाव), रफीकशा मोहंमदशा (वाडेगाव), सुरेश जगदेवराव काळे (वाडेगाव), शंकर शिवदास बुंदे (अनकवाडी), गणेश लक्ष्मण काळबोंडे (उमरा), वासुदेवराव रामकृष्ण थोटे (डोंगरगाव), संदीप विश्वंभर नानोटी (वाडेगाव), अशोक मारोती कळसकार (खंडाळा), मंगेश साहेबराव कापसे (कुटासा), जयप्रकाश उद्धवराव खारोडे (तळेगाव बु.), गजानन वामनराव जाधव (कावसा), भूषण महेंद्र खवले (उमरा), विजय महादेव काळपांडे (दहिगाव), रामदास संपत हिवराळे (तुलंगा), संतोष ओंकार मोकळकर (रौंदळा), श्रीकृष्ण काशीराम खाडे (सुकोडा), विनोद रामकृष्ण कुटे (हाता) इत्यादी १८ शेतकरी आत्महत्या प्रकरणांचा समावेश आहे. कर्जमाफीच्या मार्गदर्शक सूचना केव्हा प्राप्त होणार?थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेचा शासन निर्णय २८ जून रोजी काढण्यात आला; परंतु त्यानंतर योजनेची व्याप्ती वाढविण्याचा घेण्यात आलेला निर्णय आणि कर्जमाफीसंदर्भात मार्गदर्शक सूचना शासनाकडून अद्यापही संबंधित यंत्रणांना प्राप्त झाल्या नाही. त्यामुळे कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीसाठी मार्गदर्शक सूचना केव्हा प्राप्त होणार, याबाबत संबंधित यंत्रणांकडून प्रतीक्षा केली जात आहे.