शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

कर्जबाजारीपणासाठी शासनाला दोषी ठरवत अल्पभूधारक शेतकरी कुटुंबप्रमुखाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 18:43 IST

सायखेड (जि. अकोला): शासनाने आपल्या समस्यांची कोणत्याही प्रकारची दखल न घेतल्यामुळे निराश झाल्याने आपण जीवन संपवित असल्याची चिठ्ठी लिहून बार्शीटाकळी तालुक्यातील चोहोगाव येथील अल्पभूधारक शेतकरी कुटुंबाचे प्रमुख हरिदास रतन इंगळे (५७) यांनी २६ जानेवारी रोजी राहत्या घरी विष प्राशन केले.

ठळक मुद्देसरकाने दखल न घेतल्याने कर्जबाजारी झाल्याचे चिठ्ठीत नमूद केले आहे.मृतक हरिदास इंगळे यांच्या पत्नीच्या नावे चोहोगाव शिवारात एक एकर शेती आहे.मायक्रोफायनान्स कंपनीचे थकीत कर्ज, इतर खासगी कर्जामुळे ते चिंतित होते.

सायखेड (जि. अकोला): शासनाने आपल्या समस्यांची कोणत्याही प्रकारची दखल न घेतल्यामुळे निराश झाल्याने आपण जीवन संपवित असल्याची चिठ्ठी लिहून बार्शीटाकळी तालुक्यातील चोहोगाव येथील अल्पभूधारक शेतकरी कुटुंबाचे प्रमुख हरिदास रतन इंगळे (५७) यांनी २६ जानेवारी रोजी राहत्या घरी विष प्राशन केले. अकोला येथील खासगी इस्पितळात उपचारादरम्यान ३१ जानेवारी रोजी त्यांचा मृत्यू झाला. मृत्यूपूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत त्यांनी शासनाने कोणत्याही प्रकारची दखल न घेतल्यामुळे आत्महत्या करीत असल्याचे म्हटले असून, ही चिठ्ठी बुधवारी त्यांच्या मृत्यूनंतर सापडली.मृतक हरिदास इंगळे यांच्या पत्नीच्या नावे चोहोगाव शिवारात एक एकर शेती आहे. या शेतात त्यांनी शासनाच्या विशेष घटक योजनेंतर्गत विहीर खोदून वर्षभरापूर्वी सौर कृ षी पंपाचा लाभ घेतला. त्याद्वारे त्यांनी शेतात उत्पादन घेणे सुरू केले; परंतु निसर्गाने वेळोवेळी साथ सोडल्याने सतत नापिकी व उत्पादनात घट होत गेली. त्यांनी याच शेतीच्या भरवशावर मुलींचे थाटामाटात लग्न केले व मुलाच्या शिक्षणासह कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवित होते. अशातच मायक्रोफायनान्स कंपनीचे थकीत कर्ज, इतर खासगी कर्जामुळे ते चिंतित होते. या चिंतेने त्यांनी विष प्राशन करून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मृतक हरिदास इंगळे हे कोणत्याही सामाजिक कार्यात सहकार्य करीत असत. त्यांचा स्वभाव प्रेमळ होता. ते तंटामुक्त समितीचे अध्यक्ष असताना त्यांनी अनेक वादांचे निवारण केले. समाजात एकजूट ठेवून सलोखा कायम ठेवण्याचा सल्ला ते नेहमी देत होते. त्यांनी आत्महत्या करण्याचे पाऊल उचलल्याने अनेकांची मने सुन्न झाली होती. मुलींनी व मुलाने आक्रोश करून हंबरडा फोडला.

मृत्यूपूर्वी लिहिली चिठ्ठीहरिदास इंगळे यांनी आत्महत्या करण्यापूर्र्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीमध्ये ‘मी एक कर्जबाजारी अल्पभूधारक शेतकरी असूनही सरकारने आपल्या समस्यांची कोणत्याही प्रकारची दखल न घेतल्यामुळे मी माझे आयुष्य संपवित आहे; परंतु त्याबाबत माझ्या घरातील कोणत्याही माणसाला त्रास देऊ नये’, असे नमूद केले आहे.

टॅग्स :Akola Ruralअकोला ग्रामीणfarmer suicideशेतकरी आत्महत्या