शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

कर्जबाजारीपणासाठी शासनाला दोषी ठरवत अल्पभूधारक शेतकरी कुटुंबप्रमुखाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 18:43 IST

सायखेड (जि. अकोला): शासनाने आपल्या समस्यांची कोणत्याही प्रकारची दखल न घेतल्यामुळे निराश झाल्याने आपण जीवन संपवित असल्याची चिठ्ठी लिहून बार्शीटाकळी तालुक्यातील चोहोगाव येथील अल्पभूधारक शेतकरी कुटुंबाचे प्रमुख हरिदास रतन इंगळे (५७) यांनी २६ जानेवारी रोजी राहत्या घरी विष प्राशन केले.

ठळक मुद्देसरकाने दखल न घेतल्याने कर्जबाजारी झाल्याचे चिठ्ठीत नमूद केले आहे.मृतक हरिदास इंगळे यांच्या पत्नीच्या नावे चोहोगाव शिवारात एक एकर शेती आहे.मायक्रोफायनान्स कंपनीचे थकीत कर्ज, इतर खासगी कर्जामुळे ते चिंतित होते.

सायखेड (जि. अकोला): शासनाने आपल्या समस्यांची कोणत्याही प्रकारची दखल न घेतल्यामुळे निराश झाल्याने आपण जीवन संपवित असल्याची चिठ्ठी लिहून बार्शीटाकळी तालुक्यातील चोहोगाव येथील अल्पभूधारक शेतकरी कुटुंबाचे प्रमुख हरिदास रतन इंगळे (५७) यांनी २६ जानेवारी रोजी राहत्या घरी विष प्राशन केले. अकोला येथील खासगी इस्पितळात उपचारादरम्यान ३१ जानेवारी रोजी त्यांचा मृत्यू झाला. मृत्यूपूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत त्यांनी शासनाने कोणत्याही प्रकारची दखल न घेतल्यामुळे आत्महत्या करीत असल्याचे म्हटले असून, ही चिठ्ठी बुधवारी त्यांच्या मृत्यूनंतर सापडली.मृतक हरिदास इंगळे यांच्या पत्नीच्या नावे चोहोगाव शिवारात एक एकर शेती आहे. या शेतात त्यांनी शासनाच्या विशेष घटक योजनेंतर्गत विहीर खोदून वर्षभरापूर्वी सौर कृ षी पंपाचा लाभ घेतला. त्याद्वारे त्यांनी शेतात उत्पादन घेणे सुरू केले; परंतु निसर्गाने वेळोवेळी साथ सोडल्याने सतत नापिकी व उत्पादनात घट होत गेली. त्यांनी याच शेतीच्या भरवशावर मुलींचे थाटामाटात लग्न केले व मुलाच्या शिक्षणासह कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवित होते. अशातच मायक्रोफायनान्स कंपनीचे थकीत कर्ज, इतर खासगी कर्जामुळे ते चिंतित होते. या चिंतेने त्यांनी विष प्राशन करून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मृतक हरिदास इंगळे हे कोणत्याही सामाजिक कार्यात सहकार्य करीत असत. त्यांचा स्वभाव प्रेमळ होता. ते तंटामुक्त समितीचे अध्यक्ष असताना त्यांनी अनेक वादांचे निवारण केले. समाजात एकजूट ठेवून सलोखा कायम ठेवण्याचा सल्ला ते नेहमी देत होते. त्यांनी आत्महत्या करण्याचे पाऊल उचलल्याने अनेकांची मने सुन्न झाली होती. मुलींनी व मुलाने आक्रोश करून हंबरडा फोडला.

मृत्यूपूर्वी लिहिली चिठ्ठीहरिदास इंगळे यांनी आत्महत्या करण्यापूर्र्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीमध्ये ‘मी एक कर्जबाजारी अल्पभूधारक शेतकरी असूनही सरकारने आपल्या समस्यांची कोणत्याही प्रकारची दखल न घेतल्यामुळे मी माझे आयुष्य संपवित आहे; परंतु त्याबाबत माझ्या घरातील कोणत्याही माणसाला त्रास देऊ नये’, असे नमूद केले आहे.

टॅग्स :Akola Ruralअकोला ग्रामीणfarmer suicideशेतकरी आत्महत्या