शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली मॅच जिंकली
6
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
7
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
8
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
9
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
10
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
11
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
12
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
13
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
14
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
15
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
16
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
17
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
20
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video

कर्जबाजारीपणासाठी शासनाला दोषी ठरवत अल्पभूधारक शेतकरी कुटुंबप्रमुखाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 18:43 IST

सायखेड (जि. अकोला): शासनाने आपल्या समस्यांची कोणत्याही प्रकारची दखल न घेतल्यामुळे निराश झाल्याने आपण जीवन संपवित असल्याची चिठ्ठी लिहून बार्शीटाकळी तालुक्यातील चोहोगाव येथील अल्पभूधारक शेतकरी कुटुंबाचे प्रमुख हरिदास रतन इंगळे (५७) यांनी २६ जानेवारी रोजी राहत्या घरी विष प्राशन केले.

ठळक मुद्देसरकाने दखल न घेतल्याने कर्जबाजारी झाल्याचे चिठ्ठीत नमूद केले आहे.मृतक हरिदास इंगळे यांच्या पत्नीच्या नावे चोहोगाव शिवारात एक एकर शेती आहे.मायक्रोफायनान्स कंपनीचे थकीत कर्ज, इतर खासगी कर्जामुळे ते चिंतित होते.

सायखेड (जि. अकोला): शासनाने आपल्या समस्यांची कोणत्याही प्रकारची दखल न घेतल्यामुळे निराश झाल्याने आपण जीवन संपवित असल्याची चिठ्ठी लिहून बार्शीटाकळी तालुक्यातील चोहोगाव येथील अल्पभूधारक शेतकरी कुटुंबाचे प्रमुख हरिदास रतन इंगळे (५७) यांनी २६ जानेवारी रोजी राहत्या घरी विष प्राशन केले. अकोला येथील खासगी इस्पितळात उपचारादरम्यान ३१ जानेवारी रोजी त्यांचा मृत्यू झाला. मृत्यूपूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत त्यांनी शासनाने कोणत्याही प्रकारची दखल न घेतल्यामुळे आत्महत्या करीत असल्याचे म्हटले असून, ही चिठ्ठी बुधवारी त्यांच्या मृत्यूनंतर सापडली.मृतक हरिदास इंगळे यांच्या पत्नीच्या नावे चोहोगाव शिवारात एक एकर शेती आहे. या शेतात त्यांनी शासनाच्या विशेष घटक योजनेंतर्गत विहीर खोदून वर्षभरापूर्वी सौर कृ षी पंपाचा लाभ घेतला. त्याद्वारे त्यांनी शेतात उत्पादन घेणे सुरू केले; परंतु निसर्गाने वेळोवेळी साथ सोडल्याने सतत नापिकी व उत्पादनात घट होत गेली. त्यांनी याच शेतीच्या भरवशावर मुलींचे थाटामाटात लग्न केले व मुलाच्या शिक्षणासह कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवित होते. अशातच मायक्रोफायनान्स कंपनीचे थकीत कर्ज, इतर खासगी कर्जामुळे ते चिंतित होते. या चिंतेने त्यांनी विष प्राशन करून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मृतक हरिदास इंगळे हे कोणत्याही सामाजिक कार्यात सहकार्य करीत असत. त्यांचा स्वभाव प्रेमळ होता. ते तंटामुक्त समितीचे अध्यक्ष असताना त्यांनी अनेक वादांचे निवारण केले. समाजात एकजूट ठेवून सलोखा कायम ठेवण्याचा सल्ला ते नेहमी देत होते. त्यांनी आत्महत्या करण्याचे पाऊल उचलल्याने अनेकांची मने सुन्न झाली होती. मुलींनी व मुलाने आक्रोश करून हंबरडा फोडला.

मृत्यूपूर्वी लिहिली चिठ्ठीहरिदास इंगळे यांनी आत्महत्या करण्यापूर्र्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीमध्ये ‘मी एक कर्जबाजारी अल्पभूधारक शेतकरी असूनही सरकारने आपल्या समस्यांची कोणत्याही प्रकारची दखल न घेतल्यामुळे मी माझे आयुष्य संपवित आहे; परंतु त्याबाबत माझ्या घरातील कोणत्याही माणसाला त्रास देऊ नये’, असे नमूद केले आहे.

टॅग्स :Akola Ruralअकोला ग्रामीणfarmer suicideशेतकरी आत्महत्या