शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

कर्जमाफी नाही, पीक कर्जही मिळेना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2019 13:42 IST

अकोला : कर्जमाफी मिळाली नाही आणि पीक कर्जाचे पुनर्गठन करण्यात आले नसल्याने, जिल्ह्यातील थकबाकीदार ९७ हजार शेतकऱ्यांना यंदाच्या खरीप हंगामात पीक कर्जही मिळत नाही

- संतोष येलकरअकोला : कर्जमाफी मिळाली नाही आणि पीक कर्जाचे पुनर्गठन करण्यात आले नसल्याने, जिल्ह्यातील थकबाकीदार ९७ हजार शेतकऱ्यांना यंदाच्या खरीप हंगामात पीक कर्जही मिळत नाही. त्यामुळे दुष्काळी परिस्थितीत अडचणीत सापडलेल्या थकबाकीदार शेतकºयांसमोर खरीप पेरणीचा खर्च भागविण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.गत २८ जून २०१७ रोजीच्या शासन निर्णयानुसार, ३१ मार्च २०१६ पर्यंत थकबाकीदार शेतकºयांचे दीड लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्याचा निर्णय शासनामार्फत घेण्यात आला. त्यानंतर २०१६-१७ या वर्षात बँकांकडून पीक कर्ज घेतलेल्या जिल्ह्यातील ७५ हजार शेतकºयांना कर्जमाफी मिळाली नाही. कर्जमाफी मिळेल, या अपेक्षेने थकबाकीदार शेतकºयांकडून कर्जाची परतफेड करण्यात आली नाही आणि थकबाकीदार शेतकºयांच्या पीक कर्जाचे पुनर्गठन शासनामार्फत अद्याप करण्यात आले नाही. यासोबतच २०१७-१८ या वर्षात पीक कर्ज घेतलेल्या शेतकºयांपैकी २२ हजार शेतकºयांकडून कर्जाची परतफेड करण्यात आली नसून, कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही आणि पीक कर्जाच्या पुनर्गठनासाठी संबंधित शेतकºयांकडून पुनर्गठनासाठी संबंधित बँकांना संमतीपत्र सादर करण्यात आले नाही. त्यामुळे २०१६-१७ आणि २०१७-१८ या दोन वर्षांत पीक कर्ज घेतलेल्या जिल्ह्यातील ९७ हजार शेतकºयांना शासनाच्या कर्जमाफी योजनेचा लाभ मिळाला नसून, पीक कर्जाचे पुनर्गठन करण्यात आले नसल्याने, संबंधित थकबाकीदार शेतकºयांना यंदाच्या खरीप हंगामासाठी बँकांकडून पीक कर्ज मिळत नाही. दुष्काळी परिस्थितीत जवळ पैसा नाही आणि पीक कर्ज मिळत नाही, अशा परिस्थितीत तोंडावर आलेल्या खरीप पेरणीचा खर्च भागविणार तरी कसा, असा प्रश्न जिल्ह्यातील थकबाकीदार ९७ शेतकºयांसमोर निर्माण झाला आहे.१.३१ लाख शेतकºयांना कर्जमाफी!शासनाच्या कर्जमाफी योजनेंतर्गत ३१ मार्च २०१६ पर्यंत थकबाकीदार असलेल्या जिल्ह्यातील १ लाख ३१ हजार ३१० शेतकºयांना आतापर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे; परंतु २०१६-१७ आणि २०१७-१८ या वर्षात पीक कर्ज घेतलेल्या मात्र अद्याप थकबाकीदार असलेल्या ९७ हजार शेतकºयांना अद्याप कर्जमाफी मिळाली नसून, पीक कर्जाची रक्कम थकीत असल्याने, यंदाच्या खरीप हंगामात पीक कर्ज मिळत नसल्याची स्थिती आहे.पुनर्गठन केव्हा होणार?२०१६-१७ या वर्षात पीक कर्ज घेतलेल्या शेतकºयांच्या पीक कर्जाचे पुनर्गठन शासनामार्फत अद्याप करण्यात आले नाही. त्यामुळे थकबाकीदार शेतकरी नवीन पीक कर्जासाठी पात्र ठरू शकत नाहीत. त्यानुषंगाने नवीन पीक कर्ज मिळण्यासाठी शासनामार्फत पीक कर्जाचे पुनर्गठन केव्हा होणार, असा प्रश्न थकबाकीदार शेतकºयांसमोर निर्माण झाला आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाCrop Loanपीक कर्जagricultureशेतीFarmerशेतकरी