शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

थकबाकीदार शेतकऱ्यांची सावकारांकडे धाव!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2019 15:34 IST

दुष्काळी परिस्थितीत अडचणीत सापडलेल्या थकबाकीदार शेतकºयांना कर्जासाठी सावकारांकडे धाव घेतल्याशिवाय पर्याय उरला नाही.

ठळक मुद्देदुष्काळी परिस्थितीत शेतकºयांजवळ पैसा नाही आणि पीक कर्ज मिळत नाही.थकबाकीदार शेतकºयांवर सावकारांकडे धाव घेऊन कर्ज मागण्याची वेळ आली आहे. अकोला जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातही अशीच परिस्थिती आहे.

- संतोष येलकर

अकोला: शासनाच्या कर्जमाफी योजनेचा लाभ मिळाला नाही आणि पीक कर्जाचे पुनर्गठन करण्यात आले नसल्याने, जिल्ह्यातील थकबाकीदार ९७ हजार शेतकºयांना यंदाच्या खरीप हंगामात पीक कर्ज मिळत नाही. त्यामुळे दुष्काळी परिस्थितीत अडचणीत सापडलेल्या थकबाकीदार शेतकºयांना कर्जासाठी सावकारांकडे धाव घेतल्याशिवाय पर्याय उरला नाही. अकोला जिल्ह्यासह राज्यातील इतर जिल्ह्यातही थकबाकीदार शेतकºयांची अशीच परिस्थिती आहे.३१ मार्च २०१६ पर्यंत थकबाकीदार शेतकºयांचे दीड लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्याचा निर्णय गत २८ जून २०१७ रोजी शासनामार्फत घेण्यात आला. त्यानंतर २०१६-१७ या वर्षात बँकांकडून पीक कर्ज घेतलेल्या जिल्ह्यातील ७५ हजार शेतकºयांना कर्जमाफी मिळाली नाही. तसेच थकबाकीदार संबंधित शेतकºयांच्या पीक कर्जाचे पुनर्गठन शासनामार्फत करण्यात आले नाही. यासोबतच २०१७-१८ या वर्षात पीक कर्ज घेतलेल्या शेतकºयांपैकी २२ हजार शेतकºयांकडून कर्जाची परतफेड करण्यात आली नाही आणि कर्जमाफी मिळेल, अशी अपेक्षा करीत, संबंधित थकबाकीदार शेतकºयांकडून पीक कर्जाच्या पुनर्गठनासाठी संबंधित बँकांना संमतीपत्र सादर करण्यात आले नाही. त्यामुळे गत दोन वर्षांत पीक कर्ज घेतलेल्या जिल्ह्यातील ९७ हजार शेतकºयांना शासनाच्या कर्जमाफी योजनेचा लाभ मिळाला नसून, पीक कर्जाचे पुनर्गठन करण्यात आले नसल्याने, थकबाकीदार शेतकºयांना यंदाच्या खरीप हंगामासाठी बँकांकडून पीक कर्ज मिळू शकत नाही. दुष्काळी परिस्थितीत शेतकºयांजवळ पैसा नाही आणि पीक कर्ज मिळत नाही, अशा परिस्थितीत खरीप पेरणीचा खर्च भागविण्यासाठी थकबाकीदार शेतकºयांना कर्जासाठी सावकारांकडे गेल्याशिवाय पर्याय उरला नाही. तोंडावर आलेल्या खरीप पेरणीसह गरजेनुसार इतर खर्च भागविण्यासाठी थकबाकीदार शेतकºयांवर सावकारांकडे धाव घेऊन कर्ज मागण्याची वेळ आली आहे. अकोला जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातही अशीच परिस्थिती आहे.

‘वन टाइम सेटलमेंट’साठी शेतकरी पैसा आणणार कोठून ?दुष्काळी परिस्थितीत संकटात सापडलेल्या शेतकºयांजवळ पैसा नाही. थकबाकीदार शेतकरी एकरकमी परतफेड (वन टाइम सेटलमेंट) योजनेंतर्गत कर्जाची परतफेड करून नवीन पीक कर्जासाठी पात्र ठरतात; परंतु दुष्काळी परिस्थितीत संकटात सापडलेल्या शेतकºयांजवळ पैसा नसल्याने, थकबाकीदार शेतकरी ‘वन टाइम सेटलमेंट’साठी पैसा आणणार तरी कोठून, असा प्रश्न निर्माण होत आहे.अकोला जिल्ह्यात असे आहेत थकबाकीदार शेतकरी!वर्ष                         शेतकरी२०१६-१७             ७५,०००२०१७-१८             २२,०००.........................................एकूण                     ९७,०००थकबाकीदार शेतकºयांनी कर्जासाठी सावकारांकडे जाऊ नये. एक रकमी परतफेड (वन टाइम सेटलमेंट) योजनेंतर्गत थकीत कर्जाची परतफेड करून, नवीन पीक कर्ज घेतले पाहिजे.- आलोक तारेणियाव्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक, अकोला. 

 

टॅग्स :AkolaअकोलाFarmerशेतकरीCrop Loanपीक कर्ज