शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

थकबाकीदार शेतकऱ्यांची सावकारांकडे धाव!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2019 15:34 IST

दुष्काळी परिस्थितीत अडचणीत सापडलेल्या थकबाकीदार शेतकºयांना कर्जासाठी सावकारांकडे धाव घेतल्याशिवाय पर्याय उरला नाही.

ठळक मुद्देदुष्काळी परिस्थितीत शेतकºयांजवळ पैसा नाही आणि पीक कर्ज मिळत नाही.थकबाकीदार शेतकºयांवर सावकारांकडे धाव घेऊन कर्ज मागण्याची वेळ आली आहे. अकोला जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातही अशीच परिस्थिती आहे.

- संतोष येलकर

अकोला: शासनाच्या कर्जमाफी योजनेचा लाभ मिळाला नाही आणि पीक कर्जाचे पुनर्गठन करण्यात आले नसल्याने, जिल्ह्यातील थकबाकीदार ९७ हजार शेतकºयांना यंदाच्या खरीप हंगामात पीक कर्ज मिळत नाही. त्यामुळे दुष्काळी परिस्थितीत अडचणीत सापडलेल्या थकबाकीदार शेतकºयांना कर्जासाठी सावकारांकडे धाव घेतल्याशिवाय पर्याय उरला नाही. अकोला जिल्ह्यासह राज्यातील इतर जिल्ह्यातही थकबाकीदार शेतकºयांची अशीच परिस्थिती आहे.३१ मार्च २०१६ पर्यंत थकबाकीदार शेतकºयांचे दीड लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्याचा निर्णय गत २८ जून २०१७ रोजी शासनामार्फत घेण्यात आला. त्यानंतर २०१६-१७ या वर्षात बँकांकडून पीक कर्ज घेतलेल्या जिल्ह्यातील ७५ हजार शेतकºयांना कर्जमाफी मिळाली नाही. तसेच थकबाकीदार संबंधित शेतकºयांच्या पीक कर्जाचे पुनर्गठन शासनामार्फत करण्यात आले नाही. यासोबतच २०१७-१८ या वर्षात पीक कर्ज घेतलेल्या शेतकºयांपैकी २२ हजार शेतकºयांकडून कर्जाची परतफेड करण्यात आली नाही आणि कर्जमाफी मिळेल, अशी अपेक्षा करीत, संबंधित थकबाकीदार शेतकºयांकडून पीक कर्जाच्या पुनर्गठनासाठी संबंधित बँकांना संमतीपत्र सादर करण्यात आले नाही. त्यामुळे गत दोन वर्षांत पीक कर्ज घेतलेल्या जिल्ह्यातील ९७ हजार शेतकºयांना शासनाच्या कर्जमाफी योजनेचा लाभ मिळाला नसून, पीक कर्जाचे पुनर्गठन करण्यात आले नसल्याने, थकबाकीदार शेतकºयांना यंदाच्या खरीप हंगामासाठी बँकांकडून पीक कर्ज मिळू शकत नाही. दुष्काळी परिस्थितीत शेतकºयांजवळ पैसा नाही आणि पीक कर्ज मिळत नाही, अशा परिस्थितीत खरीप पेरणीचा खर्च भागविण्यासाठी थकबाकीदार शेतकºयांना कर्जासाठी सावकारांकडे गेल्याशिवाय पर्याय उरला नाही. तोंडावर आलेल्या खरीप पेरणीसह गरजेनुसार इतर खर्च भागविण्यासाठी थकबाकीदार शेतकºयांवर सावकारांकडे धाव घेऊन कर्ज मागण्याची वेळ आली आहे. अकोला जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातही अशीच परिस्थिती आहे.

‘वन टाइम सेटलमेंट’साठी शेतकरी पैसा आणणार कोठून ?दुष्काळी परिस्थितीत संकटात सापडलेल्या शेतकºयांजवळ पैसा नाही. थकबाकीदार शेतकरी एकरकमी परतफेड (वन टाइम सेटलमेंट) योजनेंतर्गत कर्जाची परतफेड करून नवीन पीक कर्जासाठी पात्र ठरतात; परंतु दुष्काळी परिस्थितीत संकटात सापडलेल्या शेतकºयांजवळ पैसा नसल्याने, थकबाकीदार शेतकरी ‘वन टाइम सेटलमेंट’साठी पैसा आणणार तरी कोठून, असा प्रश्न निर्माण होत आहे.अकोला जिल्ह्यात असे आहेत थकबाकीदार शेतकरी!वर्ष                         शेतकरी२०१६-१७             ७५,०००२०१७-१८             २२,०००.........................................एकूण                     ९७,०००थकबाकीदार शेतकºयांनी कर्जासाठी सावकारांकडे जाऊ नये. एक रकमी परतफेड (वन टाइम सेटलमेंट) योजनेंतर्गत थकीत कर्जाची परतफेड करून, नवीन पीक कर्ज घेतले पाहिजे.- आलोक तारेणियाव्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक, अकोला. 

 

टॅग्स :AkolaअकोलाFarmerशेतकरीCrop Loanपीक कर्ज