शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
2
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
3
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
4
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
5
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
6
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
7
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
8
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
9
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
10
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
11
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
12
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
13
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
14
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
15
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
16
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा
17
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
18
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
19
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
20
'सरकारने निर्दोषांना शिक्षा करू नये; पण...', दिल्ली बॉम्बस्फोटांवर अबू आझमींचे मोठे विधान

थकबाकीदार शेतकऱ्यांची सावकारांकडे धाव!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2019 15:34 IST

दुष्काळी परिस्थितीत अडचणीत सापडलेल्या थकबाकीदार शेतकºयांना कर्जासाठी सावकारांकडे धाव घेतल्याशिवाय पर्याय उरला नाही.

ठळक मुद्देदुष्काळी परिस्थितीत शेतकºयांजवळ पैसा नाही आणि पीक कर्ज मिळत नाही.थकबाकीदार शेतकºयांवर सावकारांकडे धाव घेऊन कर्ज मागण्याची वेळ आली आहे. अकोला जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातही अशीच परिस्थिती आहे.

- संतोष येलकर

अकोला: शासनाच्या कर्जमाफी योजनेचा लाभ मिळाला नाही आणि पीक कर्जाचे पुनर्गठन करण्यात आले नसल्याने, जिल्ह्यातील थकबाकीदार ९७ हजार शेतकºयांना यंदाच्या खरीप हंगामात पीक कर्ज मिळत नाही. त्यामुळे दुष्काळी परिस्थितीत अडचणीत सापडलेल्या थकबाकीदार शेतकºयांना कर्जासाठी सावकारांकडे धाव घेतल्याशिवाय पर्याय उरला नाही. अकोला जिल्ह्यासह राज्यातील इतर जिल्ह्यातही थकबाकीदार शेतकºयांची अशीच परिस्थिती आहे.३१ मार्च २०१६ पर्यंत थकबाकीदार शेतकºयांचे दीड लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्याचा निर्णय गत २८ जून २०१७ रोजी शासनामार्फत घेण्यात आला. त्यानंतर २०१६-१७ या वर्षात बँकांकडून पीक कर्ज घेतलेल्या जिल्ह्यातील ७५ हजार शेतकºयांना कर्जमाफी मिळाली नाही. तसेच थकबाकीदार संबंधित शेतकºयांच्या पीक कर्जाचे पुनर्गठन शासनामार्फत करण्यात आले नाही. यासोबतच २०१७-१८ या वर्षात पीक कर्ज घेतलेल्या शेतकºयांपैकी २२ हजार शेतकºयांकडून कर्जाची परतफेड करण्यात आली नाही आणि कर्जमाफी मिळेल, अशी अपेक्षा करीत, संबंधित थकबाकीदार शेतकºयांकडून पीक कर्जाच्या पुनर्गठनासाठी संबंधित बँकांना संमतीपत्र सादर करण्यात आले नाही. त्यामुळे गत दोन वर्षांत पीक कर्ज घेतलेल्या जिल्ह्यातील ९७ हजार शेतकºयांना शासनाच्या कर्जमाफी योजनेचा लाभ मिळाला नसून, पीक कर्जाचे पुनर्गठन करण्यात आले नसल्याने, थकबाकीदार शेतकºयांना यंदाच्या खरीप हंगामासाठी बँकांकडून पीक कर्ज मिळू शकत नाही. दुष्काळी परिस्थितीत शेतकºयांजवळ पैसा नाही आणि पीक कर्ज मिळत नाही, अशा परिस्थितीत खरीप पेरणीचा खर्च भागविण्यासाठी थकबाकीदार शेतकºयांना कर्जासाठी सावकारांकडे गेल्याशिवाय पर्याय उरला नाही. तोंडावर आलेल्या खरीप पेरणीसह गरजेनुसार इतर खर्च भागविण्यासाठी थकबाकीदार शेतकºयांवर सावकारांकडे धाव घेऊन कर्ज मागण्याची वेळ आली आहे. अकोला जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातही अशीच परिस्थिती आहे.

‘वन टाइम सेटलमेंट’साठी शेतकरी पैसा आणणार कोठून ?दुष्काळी परिस्थितीत संकटात सापडलेल्या शेतकºयांजवळ पैसा नाही. थकबाकीदार शेतकरी एकरकमी परतफेड (वन टाइम सेटलमेंट) योजनेंतर्गत कर्जाची परतफेड करून नवीन पीक कर्जासाठी पात्र ठरतात; परंतु दुष्काळी परिस्थितीत संकटात सापडलेल्या शेतकºयांजवळ पैसा नसल्याने, थकबाकीदार शेतकरी ‘वन टाइम सेटलमेंट’साठी पैसा आणणार तरी कोठून, असा प्रश्न निर्माण होत आहे.अकोला जिल्ह्यात असे आहेत थकबाकीदार शेतकरी!वर्ष                         शेतकरी२०१६-१७             ७५,०००२०१७-१८             २२,०००.........................................एकूण                     ९७,०००थकबाकीदार शेतकºयांनी कर्जासाठी सावकारांकडे जाऊ नये. एक रकमी परतफेड (वन टाइम सेटलमेंट) योजनेंतर्गत थकीत कर्जाची परतफेड करून, नवीन पीक कर्ज घेतले पाहिजे.- आलोक तारेणियाव्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक, अकोला. 

 

टॅग्स :AkolaअकोलाFarmerशेतकरीCrop Loanपीक कर्ज