शहरं
Join us  
Trending Stories
1
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
2
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
3
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
4
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
5
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
6
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
7
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
8
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
9
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
10
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
11
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
12
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
13
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
14
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
15
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
16
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
17
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
18
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
19
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
20
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा

रानडुकरांच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2020 4:33 PM

दीपक विठ्ठल डाखोरे असे मृतक शेतकºयाचे नाव आहे.

आलेगाव(अकोला) : रानडुकरांच्या हल्ल्यापासून बचाव करताना विहीरीत पडल्याने ३६ वर्षीय शेतकºयाचा मृत्यू झाला. ही घटना २२ फेब्रुवारी रोजी पातूर तालुक्यातील पिंपळडोळी शिवारात घडली. दीपक विठ्ठल डाखोरे असे मृतक शेतकºयाचे नाव आहे.पातुर तालुक्यात वन्यप्राण्यांचा हैदोस सुरू आहे. या वन्यप्राण्यांपासून आपली पिके वाचविण्यासाठी शेतकरी दिवसा व रात्री मेहनत करतात. परंतु तरीही वन्यप्राण्यांकडून पिकांची नासधूस होते. पातूर तालुक्यातील पिंपळडोळी येथील शेतकरी दीपक विठ्ठल डाखोरे यांनी एक शेत बटाईने केले आहे. त्या शेतात भुईमुगाचे पीक आहे. भारनियमनामुळे डाखोरे हे शुक्रवारी रात्री पिकाला रात्री पाणी देण्यासाठी गेले होते. पिकात शेतात रानडुकरे शिरल्याचे त्यांना दिसले. या रान डुकरांना शेताच्या बाहेर हाकलण्यासाठी ते त्यांच्या मागे धावले. परंतु रानडुकरांनी डाखोरे यांच्यावर उलट हल्ला केला. रानडुकरांपासुन वाचण्याच्या प्रयत्नात डाखोरे त्यांचा तोल जाऊन ते विहिरीत पडले. त्यांना पोहता येत नसल्याने विहिरीच्या पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला. सकाळी ही बाब लक्षात आल्यानंतर खळबळ उडाली. सर्वत्र हळहळ व्यक्त होऊ लागली. रान डुकरांपासून पिकांचा आणि शेतकऱ्यांचा बचाव व्हावा यासाठी वन विभागाने ठोस प्रयत्न करण्याची गरज आहे. त्यासाठी वारंवार मागणी होऊनही फारसे प्रयत्न झाल्याचे दिसत नाही. मृतक शेतकरी डाखोरे यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबीयांवर आता मोठे संकट कोसळले असल्याने वनविभागाने त्यांना मदत द्यावी अशी मागणी होत आहे.(वार्ताहर)

टॅग्स :AkolaअकोलाFarmerशेतकरी