शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
3
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
4
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
5
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
7
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
8
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
9
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
10
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
11
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
12
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
13
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
14
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
15
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
16
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
17
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
18
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
19
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
20
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!

राष्ट्रवादीच्या सामान्य कार्यकर्त्याला बळ देण्यासाठी परिवार संवाद दौरा - जयंत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 15:50 IST

Jayant Patil News कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी या यात्रे निमित्ताने संवाद साधण्यासाठी येथे आलो असल्याचे त्यांनी सांगितले.

मूर्तिजापूर :  तळागाळातील सामान्य कार्यकर्त्यानी संघंटीतपणे काम करण्याचे प्रयत्न करावे, कार्य कर्तव्याच्या भावना समजून घेण्यासाठी व बळ देण्यासाठी ही परिवार संवाद यात्रा असल्याचे प्रतिपादन राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी परिवार संवाद यात्रे निमित्ताने शनिवारी येथे आयोजित बैठकीत केले.          गडचिरोली पासून या परिवार संवाद यात्रेला सुरुवात करण्यात आली असून तब्बल दहाव्या दिवशी मूर्तिजापूर प्रचंड जनसमुदायासमोर बोलताना आपल्याला आनंद होत आहे. कार्यकर्त्यांनी पक्ष संघटन वाढविण्यासाठी जबाबदारी स्वीकारून बुथ, कमिट्या तयार करुन स्थानिक नेत्यांनी महत्त्वाची जबाबदारी स्वीकारली पाहिजे असे आवाहन करीत आपण कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी या यात्रे निमित्ताने संवाद साधण्यासाठी येथे आलो असल्याचे त्यांनी सांगितले. तद्वतच या तालुक्याच्या समस्या सोडविण्यासाठी आपण कटिबध्द असून लवकरच त्या मार्गी लावणार असल्याचे सांगितले. या वेळी जिल्ह्याचे संपर्क मंत्री यांनी यात्रेमागची भूमिका विशद करताना, कुठलेही निमित्त नसताना ही संवाद यात्रा का काढावी लागली हे स्पष्ट केले, दरम्यान, कोणाच्याही तोंडाला मास्क व फिजिकल डिस्टन्सिंग नसल्याने विदर्भात कोरोना नसल्याची फिरकी घेतली. पक्ष संघटन यादृष्टीने हा परिवार संवाद दौरा असून केंद्र शासनाचा समाचार घेताना केंद्र शासनाने अनेक चुकिचे निर्णय घेतल्याने येथील महिला सुरक्षित नसल्याची खंत उदाहरण देऊन व्यक्त केली. आमच्या पक्षात सक्षम महिला असून त्यांची ओळख त्यांनी स्वकर्तृत्वाने निर्माण केली असल्याच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर म्हणाल्या. यावेळी रविकांत वरपे, माजी आमदार तुकाराम बिडकर, भैयासाहेब तिडके, बळीराम सिरसकार, हरीदास भदे, रवी राठी, संतोष कोरपे, यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. या बैठकीला जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे, आमदार अमोल मिटकरी, युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, रक्षणा सलगर, गुलाबराव गावंडे, प्रदेश प्रवक्ता आशा मिरगे, शिवा मोहोड, उज्वला राऊत, सुषमा कावरे इत्यादी उपस्थित होते. संध्याकाळी ५ वाजता नियोजीत कार्यक्रम रात्री ९ वाजता सुरु झाल्याने उपस्थित बार्शीटाकळी व मूर्तिजापूर तालुक्यातील कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला. 

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलMurtijapurमुर्तिजापूरNCPराष्ट्रवादी काँग्रेस