शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा-शिंदे गटाचे अखेर मुंबईत ठरले, CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
2
ब्रह्मोस एरोस्पेसच्या CEO ची नियुक्ती रद्द! 'कॅट'चा ऐतिहासिक निकाल; डॉ. जयतीर्थ जोशींना पदावरून हटवण्याचे आदेश
3
मनसे-उद्धवसेना युती ही आषाढीच्या घरी महाशिवरात्र; भाजपाने आकडेवारी देत ठाकरे बंधूंना डिवचले
4
७ वेळा अटक, पण इरादे बुलंद! बांगलादेशच्या पहिल्या महिला पंतप्रधान खालिदा जिया यांचे भारताशी होते कनेक्शन 
5
मृत्यूशय्येवर होत्या, तरीही कालच दाखल केला उमेदवारी अर्ज! खालिदा झियांच्या मृत्यूने बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचे मनसुबे धुळीस मिळाले
6
ATM कमी झाले, बँकेच्या शाखा वाढल्या; बचत खात्यांमध्ये मोठी वाढ, जमा रक्कम ३.३ लाख कोटींच्या पार
7
Video : मुंबईतील बस अपघाताचा व्हिडीओ आला समोर; भांडुपमध्ये रस्त्यावर उभ्या असलेल्या लोकांना बसने चिरडले
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या समर्थकाला 'बांगलादेशी' सोडून घेऊन गेले, आसाम पोलिसांवर हल्ला; १० जणांना अटक
9
मनसे सोडल्यावर प्रकाश महाजन पहिल्यांदाच राज ठाकरेंवर थेट बोलले; म्हणाले, “विठ्ठलानेच...”
10
"मला तो सीन करायचा नव्हता पण, रणवीरने...", 'धुरंधर'मधल्या 'त्या' कामुक सीनबाबत अभिनेत्याचा मोठा खुलासा
11
९०% लोकांना माहीतच नाही iPhoneची 'ही' जादू! स्क्रीनला हात न लावता सेकंदात करता येते काम
12
Stock Market Today: मंथली एक्सपायरीवर निराशाजनक सुरुवात; Sensex १२० अंकांनी घसरला, Nifty मध्ये ४० अंकांची घसरण
13
बांगलादेशच्या उच्चायुक्तांनी दिल्ली सोडली! युनूस सरकारकडून तातडीने ढाका गाठण्याचे आदेश; नेमके कारण काय?
14
पोर्टफोलिओमध्ये करा 'हे' ५ बदल! संरक्षण आणि आयटी शेअर्समध्ये मोठी संधी; पाहा नवीन टार्गेट प्राईस
15
'ती' गेल्याचं ऐकलं अन प्रियकरानेही प्राण सोडले! हॉस्पिटलमधून पळाला अन् काही तासांतच…
16
Silver Price: २०२६ मध्ये चांदीची चमक होणार का कमी? एका झटक्यात ₹२४,४७४ ची घसरण, काय आहेत हे संकेत?
17
मोठी बातमी! ९१ ड्रोन... युक्रेनचा पुतीन यांना मारण्याचा प्रयत्न; निवासस्थानाजवळ घातकी ड्रोन पाडले अन्...
18
ब्रह्मपुत्रेच्या काठी हिंदूंच्या रक्ताचा पूर! २०० हून अधिक हल्ले, बांगलादेशातील 'या' जिल्ह्यात हिंदूंचे अस्तित्व धोक्यात
19
इराणवर सर्वात मोठा हल्ला होईल, तो थांबवता येणार नाही; डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे विधान
20
भारतातील १० सर्वात मोठ्या कंपन्यांच्या बाजार भांडवलात मोठा चढ-उतार, SBI च्या गुंतवणूकदारांना सर्वाधिक नुकसान
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफीच्या अंमलबजावणीचे अपयश; शेतकरी आत्महत्या वाढत्याच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2019 13:06 IST

अकोला : कर्जमाफी योजनेमुळे शेतकऱ्यांमध्ये आशावाद निर्माण होईल, ही अपेक्षा प्रशासकीय यंत्रणांच्या दप्तरदिरंगाईमुळे फोल ठरली आहे. तब्बल दीड वर्षापासून ...

अकोला: कर्जमाफी योजनेमुळे शेतकऱ्यांमध्ये आशावाद निर्माण होईल, ही अपेक्षा प्रशासकीय यंत्रणांच्या दप्तरदिरंगाईमुळे फोल ठरली आहे. तब्बल दीड वर्षापासून शेतकरी कर्जमाफीची अंमलबजावणी कासवगतीनेच सुरू असल्यामुळे शेतकºयांमधील नैराश्य वाढतेच असल्याचे शेतकरी आत्महत्यांच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.अकोला जिल्ह्याची आकडेवारी तपासली असता जानेवारी ते डिसेंबर २०१८ या वर्षभराच्या कालावधीत तब्बल ११८ शेतकऱ्यांनी गळफास आवळला आहे. नापिकी, कर्जबाजरीपणा व शेतमालाचा कमी भाव प्रामुख्याने या तीन कारणांमुळेच आत्महत्या झाल्याचे सरकारी दप्तरात नोंदविलेले आहे. नापिकीला लहरी निसर्ग, शेतमालाच्या कमी भावाला सरकारी धोरण कारणीभूत आहे, तसेच कर्जबाजारीपणातून मुक्त होण्यासाठी दिलेल्या कर्जमाफीच्या अंमलबजावणीची संथ गती आत्महत्यांसाठी जबाबदार ठरली आहे.अपुऱ्या व लहरी पावसामुळे दुष्काळ आणि नापिकीला सामोरे जावे लागलेल्या शेतकऱ्यांना कर्जबाजारी व्हावे लागले. भाजपा सरकारने कर्जबाजारी झालेल्या राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी गत २८ जून २०१७ रोजीच्या शासन निर्णयानुसार छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना जाहीर करण्यात आली; मात्र या योजनेची तत्काळ अंमलबजावणी करून शेतकऱ्यांना दिलासा देण्यात प्रशासकीय यंत्रणा सपशेल अपयशी ठरल्यामुळे सरकार विरोधात रोष निर्माण झाला आहे. दुसरीकडे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत्याच आहेत. विशेष म्हणजे, गत वर्षभरात झालेल्या ११८ आत्महत्यांमध्ये ६६ शेतकरी आत्महत्या या मदतीस पात्र ठरविण्यात आल्या असून, ३१ आत्महत्या अपात्र ठरविल्या आहेत. तब्बल २१ आत्महत्यांच्या बाबतीत जिल्हा प्रशासनाने कुठलाही निर्णय घेतलेला नाही. या आत्महत्यांची वाढती संख्या व कर्जमाफ ीच्या अंमलबजावणीची स्थिती यांचे प्रमाण पाहिले असता अंमलबजावणीमधील अपयश अधोरेखित होते. जिल्ह्यात कर्जमाफीसाठी आॅनलाइन अर्ज केलेल्या शेतकºयांपैकी ३१ डिसेंबरपर्यंत १ लाख २९ हजार शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ देण्यात आला असला तरी, नऊ हजार शेतकरी अद्याप कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहेत.

शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कर्जमाफीची योजना आणली. सारे सोपस्कार पार पाडून योजना तयार झाली, घोषित झाली; मात्र अंमलबजावणी करणाºया यंत्रणेमुळे ही योजना सपशेल अपयशी ठरल्याने शेतकºयांमधील नैराश्य कायम असून, त्याचाच परिणाम आत्महत्यामध्ये वाढ होण्यात झाली आहे.-किशोर तिवारी,अध्यक्ष, कै .वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशन.

 

टॅग्स :Akolaअकोलाfarmer suicideशेतकरी आत्महत्या