शहरं
Join us  
Trending Stories
1
Municipal Corporation Election: विदर्भात महायुतीचे ठरले! चार महापालिकांत शिंदेसेना, तर दोन ठिकाणी अजित पवारांची राष्ट्रवादी महायुतीत
2
खोपोलीत शिंदेसेनेच्या नगरसेविकेच्या पतीची हत्या! मुलाला शाळेत सोडून परत येत असताना केला हल्ला
3
तुमची इंडिगो फ्लाइट रद्द झाली होती का? आजपासून १०,००० रुपयांचे व्हाउचर मिळणार
4
Video : पंतप्रधान मोदींचा कार्यक्रम उरकला अन् शोभेसाठी लावलेल्या झाडाच्या कुंड्या लोकांनी पळवल्या!
5
२७ महापालिकांत कुणाचे किती नगरसेवक? गेल्यावेळी भाजपचे...; ४३९ जागा जिंकून काँग्रेस होती तिसऱ्या क्रमांकावर
6
Stock Markets Today: शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; Sensex १५० अंकांनी घरसला, BEL टॉप गेनर
7
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
8
विकी-कतरिनाच्या लेकाचा पहिला ख्रिसमस, अभिनेत्रीने शेअर केला फोटो; चाहते म्हणाले...
9
Investment Tips For Working Women: नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ६ विश्वासार्ह गुंतवणूक योजना; तुम्हाला कधीही पैशाची कमतरता भासू देणार नाहीत
10
‘माझा मुलगा वर्षावर मला भेटायला टॅक्सीने यायचा’; पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्रीपदाच्या काळातील किस्सा सांगितला
11
बांगलादेशात खळबळ! १७ वर्षांनंतर तारिक रहमान मायदेशी परतले; येताच मोहम्मद युनूस यांना केला फोन!
12
संपादकीय: पुन्हा चुकू अन् फुटू नका, राज-उद्धव आणि भाजप...
13
रेल्वे प्रवाशांच्या खिशाला कात्री! आजपासून तिकीट दरवाढ लागू; जाणून घ्या तुमचे तिकीट किती रुपयांनी महागले?
14
मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांना देखील मेरी ख्रिसमस; नायजेरियात ISIS वर बॉम्ब हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
15
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २६ डिसेंबर २०२५: आनंद व उत्साहाचे वातावरण; कामात यश मिळेल!
16
पीछेहाट कम्युनिस्ट पक्षाची, विचारसरणीची नव्हे!
17
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
18
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
19
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
20
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
Daily Top 2Weekly Top 5

फडणवीस सरकार सेनेच्या नव्हे, तर राष्ट्रवादीच्या सम र्थनावर टिकून!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 00:49 IST

अकोला : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला  शिवसेना विरोध करीत आहे. शेतकर्‍यांच्या मुद्यांवर  सरकारला घेरण्याचा प्रयत्न करीत आहे;  फडणवीस सरकार  हे शिवसेनेच्या सर्मथनावर टिकून नव्हे, तर राष्ट्रवादी  काँग्रेसच्या सर्मथनावर टिकून आहे आणि हे बोलत असताना  मी खुर्चीची, पदाची तमा बाळगत नाही. जनतेला मी न्याय  मिळवून देऊ शकतो की नाही, हे मी अधिक पाहतो. अशा  शब्दात खासदार नाना पटोले यांनी रविवारी एका हॉटेलमध्ये  आयोजित पत्रपरिषदेत भाजप सरकारचा समाचार घेतला. 

ठळक मुद्देखासदार नाना पटोले जनतेची घुसमट होत असल्याचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला  शिवसेना विरोध करीत आहे. शेतकर्‍यांच्या मुद्यांवर  सरकारला घेरण्याचा प्रयत्न करीत आहे;  फडणवीस सरकार  हे शिवसेनेच्या सर्मथनावर टिकून नव्हे, तर राष्ट्रवादी  काँग्रेसच्या सर्मथनावर टिकून आहे आणि हे बोलत असताना  मी खुर्चीची, पदाची तमा बाळगत नाही. जनतेला मी न्याय  मिळवून देऊ शकतो की नाही, हे मी अधिक पाहतो. अशा  शब्दात खासदार नाना पटोले यांनी रविवारी एका हॉटेलमध्ये  आयोजित पत्रपरिषदेत भाजप सरकारचा समाचार घेतला. दररोज होणार्‍या शेतकर्‍यांच्या आत्महत्या भयावह आहेत.  शासनाकडून शेतकर्‍यांना कोणतीही मदत मिळत नाही.  त्यामुळे शेतकर्‍यांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली  आहे. राज्य शासनाने शेतकर्‍यांना कर्जमाफी दिली; परंतु ती  देताना कर्जमाफीच्या अर्जात जाचक अशी ६६ कलमे  लादली. १ कोटी ३४ लाख शेतकर्‍यांचे कर्ज माफ झाले.  त्यातही महसूलमंत्री चंद्रकांत पाटील १0 लाख शेतकरी  बोगस असल्याचे म्हणतात, असे सांगत खासदार नाना  पटोले यांनी शेतकर्‍यांना कर्जमाफी देताना, त्यांच्यावर  जाचक अटी लादल्या जातात आणि दुसरीकडे केंद्र शासन  अदानीचे ७९ हजार कोटी रुपयांचे कर्ज माफ करते, हे ख पवून घेतल्या जाणार नाही. आम्ही २0२२ ची वाट पाहणार  नाही. शेतकर्‍यांबाबत केंद्र शासनाने २0१९ पर्यंतच सकारा त्मक निर्णय घ्यावा, असेही खा. पटोले म्हणाले. पक्षात  तुमची घुसमट होते का, या प्रश्नाचे उत्तर देताना खा. पटोले  यांनी मी काँग्रेसमध्ये होतो, तेव्हाही घुसमट झाली नाही आणि  आता भाजपातही माझी घुसमट होत नाही, असे स्पष्ट करीत  त्यांनी जनतेची घुसमट होत आहे. जनतेच्या समस्या  मांडण्यासाठी मी निवडून आलो, त्या मांडण्याचा मी प्रयत्न  करतो आहे. आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्रात एकाच वेळी  सरकार स्थापन झाले. आंध्र सरकारने तीन वर्षांत  जलसिंचनाची व्यवस्था केली; परंतु आमचे सरकार तापी व  गोदावरी खोर्‍याचा विकास करून जलसिंचनाची व्यवस्था  करू शकले नाही, असा आरोपही खासदार पटोले यांनी  केला. तसेच शेतकर्‍यांच्या मुद्दयावर आपण खासदारकीदे खील सोडायला तयार असल्याचे ते म्हणाले. पत्रपरिषदेला  शेतकरी जागर मंचाचे जगदीश मुरूमकार, प्रशांत गावंडे,  ज्ञानेश्‍वर सुलताने, मनोज तायडे, विजय देशमुख आदी उ पस्थित होते.

कृषी विद्यापीठे राजकीय अड्डेल्ल राज्यातील कृषी विद्यापीठांकडून शेती आणि शेतकर्‍यांचा  विकास अपेक्षित आहे; परंतु कृषी विद्यापीठे ही पांढरे हत्ती  ठरताहेत. राज्यात कृषी विद्यापीठे असूनही शेतकर्‍यांचे भले  होत नाही. त्यांच्यासाठी दर्जेदार बियाणे तयार होत नाहीत.  संशोधन होत नाही. कृषी विद्यापीठे राजकीय अड्डे बनली  आहेत. कुलगुरूंची निवड गुणवत्तेवर केली जात नाही, तर  ती जातीच्या आधारावर केली जात असल्याचा आरोपही  खासदार नाना पटोले यांनी पत्रपरिषदेत  केला.