शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
2
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
3
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
4
Kolhapur: क्लासला जाताना ओढ्याच्या पाण्यात वाहून गेलेल्या मुलाचा शोध सुरुच
5
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
6
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
7
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
8
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
9
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
10
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
11
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
12
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
13
WTC Final : मिचेल स्टार्कनं अर्धशतकासह रचला इतिहास; हेजलवूडच्या साथीनं ५० वर्षांचा विक्रमही मोडला
14
"आदमी खिलौना है" शेवटचं स्टेटस; अहमदाबाद विमान दुर्घटनेत हरियाणातील अंजू शर्मा यांचा दुर्दैवी अंत!
15
जन्मदाताच बनला हैवान! पत्नीशी झालेल्या भांडणाच्या रागात लेकरांवर केला वार, मुलीचा जागीच मृत्यू 
16
ज्याची होती चर्चा, तेच कारण समोर आलं...! राजाला का मारलं? सोनमनं सगळंच सांगून टाकलं; खरा मास्टरमाइंड आला समोर
17
मृतांचे क्लेम सेटलमेंट लवकर पूर्ण करणार; अहमदाबाद विमान अपघाताबाबत LIC चा मोठा निर्णय
18
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
19
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलरची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
20
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत

पाणीटंचाई निवारणाच्या उपाययोजनांना मुदतवाढ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2019 15:14 IST

अकोला: राज्यात ३० जूननंतर पाणीटंचाई निवारणाच्या उपाययोजनांना मुदतवाढ देण्यात येत असल्याचे परिपत्रक शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागामार्फत २९ जून रोजी काढण्यात आले.

- संतोष येलकर

अकोला: राज्यात ३० जूननंतर पाणीटंचाई निवारणाच्या उपाययोजनांना मुदतवाढ देण्यात येत असल्याचे परिपत्रक शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागामार्फत २९ जून रोजी काढण्यात आले. त्यानुसार पाणीटंचाई निवारणाच्या उपाययोजना सुरू ठेवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी टंचाई परिस्थितीचा फेरआढावा घेऊन टंचाई असलेल्या क्षेत्रात पाणीटंचाई जाहीर करून उपाययोजना सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.शासनाच्या स्थायी आदेशानुसार पाणीटंचाई निवारणासाठी घेण्यात येणाºया उपाययोजना ३० जूनपर्यंत राबविणे आवश्यक आहे. तथापि, ३० जून २०१९ नंतर टंचाई अंतर्गत पिण्याच्या पाण्याच्या उपाययोजना सुरू ठेवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील टंचाई परिस्थितीचा फेरआढावा घेऊन महाराष्ट्र भूजल (विकास व व्यवस्थापन) अधिनियम २००९ मधील तरतुदीनुसार पिण्याच्या पाण्याची टंचाई असलेल्या क्षेत्रात पाणीटंचाई जाहीर करून टंचाई अंतर्गत घेण्यात येणाºया उपाययोजना सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात यावा, असे निर्देश देत पाणीटंचाई निवारणाच्या उपाययोजनांसाठी शासनामार्फत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानुसार पाणीटंचाई निवारणाच्या उपाययोजनांची कामे १५ जुलैपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले असून, पाणीटंचाई निवारणासाठी विहीर, तलाव उद्भवावरून पाणीपुरवठा करण्याकरिता डीझल जनरेटरच्या भाड्याचा तसेच डीझलचा खर्च टंचाई निधीतून करण्याचा निर्णय १५ जुलैपर्यंत लागू राहणार असल्याचेही शासन परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.‘सीईओं’ना १५ जुलैपर्यंत निवीदा स्वीकृतीचे अधिकार!पाणीटंचाई निवारणासाठी तात्पुरत्या पाणी पुरवठा योजना आणि नळ पाणीपुरवठा योजनांची विशेष दुरुस्ती या उपाययोजनांसाठी प्राप्त होणाºया निविदांना चालू दरसूचीनुसार मूल्यांकित किमतीपेक्षा १० टक्क्यापर्यंत जादा दराच्या निविदा स्वीकृतीचे अधिकार राज्यातील जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाºयांना (सीईओ) देण्यात आले आहेत. ‘सीईओं’ना देण्यात आलेले हे अधिकार येत्या १५ जुलैपर्यंत लागू राहणार आहेत.चारा छावण्यांना १ आॅगस्टपर्यंत टँकरद्वारे पाणीपुरवठा!चारा छावण्यांतील जनावरांसाठी शासकीय टँकरद्वारे पाणीपुरवठा येत्या १ आॅगस्टपर्यंत सुरू ठेवण्यास मुभा देण्यात येत असल्याचेही शासन निर्णयात म्हटले आहे.

 

टॅग्स :Akolaअकोलाwater scarcityपाणी टंचाई