शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

पाणीटंचाई निवारणाच्या उपाययोजनांना मुदतवाढ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2019 15:14 IST

अकोला: राज्यात ३० जूननंतर पाणीटंचाई निवारणाच्या उपाययोजनांना मुदतवाढ देण्यात येत असल्याचे परिपत्रक शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागामार्फत २९ जून रोजी काढण्यात आले.

- संतोष येलकर

अकोला: राज्यात ३० जूननंतर पाणीटंचाई निवारणाच्या उपाययोजनांना मुदतवाढ देण्यात येत असल्याचे परिपत्रक शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागामार्फत २९ जून रोजी काढण्यात आले. त्यानुसार पाणीटंचाई निवारणाच्या उपाययोजना सुरू ठेवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी टंचाई परिस्थितीचा फेरआढावा घेऊन टंचाई असलेल्या क्षेत्रात पाणीटंचाई जाहीर करून उपाययोजना सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.शासनाच्या स्थायी आदेशानुसार पाणीटंचाई निवारणासाठी घेण्यात येणाºया उपाययोजना ३० जूनपर्यंत राबविणे आवश्यक आहे. तथापि, ३० जून २०१९ नंतर टंचाई अंतर्गत पिण्याच्या पाण्याच्या उपाययोजना सुरू ठेवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील टंचाई परिस्थितीचा फेरआढावा घेऊन महाराष्ट्र भूजल (विकास व व्यवस्थापन) अधिनियम २००९ मधील तरतुदीनुसार पिण्याच्या पाण्याची टंचाई असलेल्या क्षेत्रात पाणीटंचाई जाहीर करून टंचाई अंतर्गत घेण्यात येणाºया उपाययोजना सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात यावा, असे निर्देश देत पाणीटंचाई निवारणाच्या उपाययोजनांसाठी शासनामार्फत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानुसार पाणीटंचाई निवारणाच्या उपाययोजनांची कामे १५ जुलैपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले असून, पाणीटंचाई निवारणासाठी विहीर, तलाव उद्भवावरून पाणीपुरवठा करण्याकरिता डीझल जनरेटरच्या भाड्याचा तसेच डीझलचा खर्च टंचाई निधीतून करण्याचा निर्णय १५ जुलैपर्यंत लागू राहणार असल्याचेही शासन परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.‘सीईओं’ना १५ जुलैपर्यंत निवीदा स्वीकृतीचे अधिकार!पाणीटंचाई निवारणासाठी तात्पुरत्या पाणी पुरवठा योजना आणि नळ पाणीपुरवठा योजनांची विशेष दुरुस्ती या उपाययोजनांसाठी प्राप्त होणाºया निविदांना चालू दरसूचीनुसार मूल्यांकित किमतीपेक्षा १० टक्क्यापर्यंत जादा दराच्या निविदा स्वीकृतीचे अधिकार राज्यातील जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाºयांना (सीईओ) देण्यात आले आहेत. ‘सीईओं’ना देण्यात आलेले हे अधिकार येत्या १५ जुलैपर्यंत लागू राहणार आहेत.चारा छावण्यांना १ आॅगस्टपर्यंत टँकरद्वारे पाणीपुरवठा!चारा छावण्यांतील जनावरांसाठी शासकीय टँकरद्वारे पाणीपुरवठा येत्या १ आॅगस्टपर्यंत सुरू ठेवण्यास मुभा देण्यात येत असल्याचेही शासन निर्णयात म्हटले आहे.

 

टॅग्स :Akolaअकोलाwater scarcityपाणी टंचाई