शहरं
Join us  
Trending Stories
1
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
2
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
3
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
4
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
5
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
6
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
7
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
8
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
9
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
10
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
11
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
12
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
13
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
14
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
15
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
16
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
17
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
18
Javelin Throw Final : भारताचा गोल्डन बॉय नीरज अन् पाक ऑलिम्पिक चॅम्पियन नदीमवर भारी पडला सचिन; पण...
19
यंदा रावण नाही, सोनम रघुवंशीचा पुतळा जाळणार! इंदूरच्या नागरिकांचा वेगळाच दसरा प्लॅन; राजाच्या कुटुंबालाही आमंत्रण
20
राहुल गांधींच्या हायड्रोजन बॉम्बपूर्वी चंद्रपूरच्या 'राजुरा' मतदारसंघात खळबळ ! निवडणूक आयोगावर मत वगळण्याचे गंभीर आरोप

मागासवर्गातील अधिकारी-कर्मचारी पदोन्नतीपासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2019 12:47 IST

शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या धोरणामुळे लाखो अधिकारी-कर्मचाऱ्यांना पदोन्नतीपासून वंचित ठेवण्याचे षड्यंत्र सुरू आहे

अकोला : सर्वोच्च न्यायालयाच्या स्पष्ट आदेशानंतरही सर्वच मागासप्रवर्गातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना आरक्षित तसेच खुल्या प्रवर्गातूनही पदोन्नती न देण्याच्या शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या धोरणामुळे लाखो अधिकारी-कर्मचाऱ्यांना पदोन्नतीपासून वंचित ठेवण्याचे षड्यंत्र सुरू आहे. हा प्रकार रोखण्यासाठी स्वतंत्र मजदूर युनियनच्यावतीने येत्या २७ आॅगस्ट रोजी नागपुरात मुख्यमंत्री सचिवालयावर धडक मोर्चा काढला जात आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या एम. नागराज विरुद्ध भारत सरकार या प्रकरणाच्या निकालातील अटींची पूर्तता महाराष्ट्र शासनाने केली नाही. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्राचा आरक्षण कायदा-२००१ शाबूत ठेवून त्यासंदर्भातील २५ मे २००४ रोजीचा शासन निर्णय रद्द केला होता. त्यावेळी मागासलेपणा, पर्याप्त प्रतिनिधीत्व व प्रशासनाची कार्यक्षमता याबाबत संख्यात्मक अहवाल तयार करणे, त्यानुसार राज्यातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या-विमुक्त जाती, विशेष मागासप्रवर्गातील अधिकारी- कर्मचाºयांना पदोन्नती आरक्षण लागू करणे सहज शक्य असताना महाराष्ट्र शासनाने त्याकडे दुर्लक्ष केले. त्याचवेळी लगतच्या कर्नाटक राज्यात या पद्धतीने पदोन्नती देण्यात आली, हे विशेष.त्यानंतर जरनैल सिंग विरुद्ध गुप्ता या याचिकेबाबत सर्वोच्च न्यायालयाने १७ मे २०१८ रोजी निर्णय देताना मागासवर्गीयांना खुल्या प्रवर्गातूनही पदोन्नती देण्याचा आदेश दिला. त्यामध्ये अनारक्षित ते अनारक्षित व आरक्षित ते आरक्षित प्रवर्ग अशाप्रकारे पदोन्नती देणे चुकीचे ठरवून मागासवर्गीयांना गुणवत्तेवर आधारित पदोन्नती देणे वैध ठरवले. त्यानंतर महाराष्ट्र शासन विरुद्ध घोगरे या याचिकेवर सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने ५ जून २०१८ रोजी कायद्यानुसार प्रतिबंध नसल्याचाही आदेश दिला. त्यानुसार केंद्र शासनाच्या कार्मिक व प्रशासन विभागाने १५ जून २०१८ रोजी पदोन्नतीमधील आरक्षण लागू करण्याच्या सूचना दिल्या. या आदेशानंतरही महाराष्ट्र शासनाने पदोन्नतीमधील आरक्षण लागू करण्यासंदर्भात कोणतीही कार्यवाही केली नाही. इतर कोणत्याही राज्याने खुल्या प्रवर्गातून पदोन्नती देणे बंद केले नसताना फक्त महाराष्ट्रातच बंद करण्यात आले. हा अन्याय रोखण्यासाठी २७ आॅगस्ट रोजी यशवंत स्टेडिअमवरून मोर्चा काढण्यात येत आहे.

- केवळ पत्राद्वारे रोखली पदोन्नतीराज्य शासनाने सर्वोच्च न्यायालय, केंद्र शासनाचे विविध आदेशाची अंमलबजावणी केली नाही. तसेच कोणताही शासन निर्णय न काढता २९ डिसेंबर २०१७ रोजी सामान्य प्रशासन विभागाने एका पत्राद्वारे मागासवर्गीयांना खुल्या प्रवर्गातून पदोन्नती देणे बंद केले. त्यामुळे राज्यातील लाखो अधिकारी-कर्मचारी पदोन्नतीपासून वंचित झाले आहेत.

 

टॅग्स :AkolaअकोलाMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारEmployeeकर्मचारी