शहरं
Join us  
Trending Stories
1
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
2
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
3
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
4
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
5
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
6
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
7
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  
8
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
9
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
10
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
11
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
12
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
13
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
14
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
15
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
16
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
17
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
18
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
19
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
20
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?

अपारंपरिक पीक उत्पादनावर भर - मोहन वाघ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2020 12:17 IST

शेतीविषयक माहिती देण्यास कृषी विभाग तत्पर असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मोहन वाघ यांनी गुरुवारी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

- राजरत्न सिरसाट

अकोला : जिल्ह्यात कृषी विकासाच्या दृष्टीने प्रयत्न सुरू असून, अपारंपरिक पिके उत्पादनावर भर देण्यात येत आहे. कीटकनाशके फवारणीसंदर्भात शेतकºयांचे प्रबोधन करण्यात येत असून, विषबाधा झालेल्या शेतमजूर, शेतकºयांचे प्राण वाचविण्यात यश आले आहे. पारंपरिक पिकांसोबतच आता अपारंपरिक पीक उत्पादनासंदर्भात शेतकºयांचे प्रबोधन करण्यात येत आहे. येत्या खरीप हंगामात शेतकºयांना शेतीविषयक माहिती देण्यास कृषी विभाग तत्पर असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मोहन वाघ यांनी गुरुवारी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

प्रश्न: यावर्षीच्या खरीप हंगामाचे नियोजन कसे असणार?

उत्तर: गतवर्षी आॅक्टोबरपर्यंत पीक चांगले होते. आॅक्टोबर महिन्यानंतरही सतत पाऊस सुरू राहिल्याने विशेषत: सोयाबीन पीक, बीजोत्पादन क्षेत्रावर परिणाम झाला आहे. म्हणूनच यावर्षी घरचे सोयाबीन बियाणे वापरण्यासंदर्भात शेतकºयांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या पिकासोबतच आता अपारंपरिक पीक लागवडीकरिता शेतकºयांना मार्गदर्शन करण्यात येत असून, शेतकºयांचा प्रतिसाद मिळत आहे.

प्रश्न: कोणती अपारंपरिक पिके घेणार?

उत्तर: काही वर्षांपूर्वी जवस हे विदर्भातील महत्त्वाचे पीक होते; परंतु अलीकडे हे पीक कमी झाले आहे. याबाबत शेतकºयांना मार्गदर्शन करण्यात येत असून, मसाले पिकातील ओवा, हळद पिकाकडे शेतकरी वळला आहे. तद्वतच रब्बी हंगामात ज्वारी व बाजरी इत्यादी पिकाचे क्षेत्र वाढविण्यावर भर देण्यात येत आहे. पीक प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून ‘आत्मा’ व ‘पोक्रा’ योजनेंतर्गतही पीक पेरणीकडे भर देण्यात आला आहे. म्हणूनच रब्बी ज्वारी २,५००, ओवा २,५००, जवस ५० आणि बाजरी ५० हेक्टरपर्यंत वाढली आहे.

प्रश्न: कीटकनाशक फवारणीसंदर्भात कोणत्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत?

उत्तर: गतवर्षीच्या खरीप हंगामात कीटकनाशके फवारणी करताना जिल्ह्यात ३७४ शेतकरी, शेतमजुरांना विषबाधा झाली होती. त्यावेळी कृषी विभाग, महसूल, ग्रामविकास, आरोग्य व गृह विभाग, एकूणच जिल्हा प्रशासनाने एकत्रितरीत्या मोहीम राबवून विषबाधा झालेल्या सर्व रुग्णांचे प्राण वाचविण्यात आले. जिल्ह्यातील डॉक्टर, वैद्यकीय अधिकाºयांना आंतरराष्टÑीय स्तरावरील डॉ. प्रजापती व डॉ. पिल्ले यांनी यासंदर्भात प्रशिक्षण व माहिती दिली. हे मॉडेल राज्य व राष्ट्रीय पातळीवर दिशादर्शक ठरेल, असे वाटते. फवारणी करताना घ्यावयाची काळजी, शास्त्रीय पद्धत आदींबाबत कृषी विभाग मार्गदर्शन करीतच आहे.

प्रश्न: नावीन्यपूर्ण उपक्रम कोणते राबविले?

उत्तर: राष्टÑीय सुरक्षा अभियानांतर्गत या रब्बी हंगामात २,२०० शेतकºयांना हरभरा १३,५०९ तर गहू पिकाचे ३,६४० क्ंिवटल प्रमाणित बियाणे परमिटवर वितरित करण्यात आले. याकरिता आत्माचे तालुका व सहायक तंत्रज्ञान व्यवस्थापक तसेच ५१७ कृषी मित्रामार्फत ८ दिवसांत ही मोहीम राबविण्यात आली.

टॅग्स :Akolaअकोलाagricultureशेती