शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिलीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
6
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
7
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
8
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
9
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
10
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
11
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
12
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
13
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
14
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
15
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
16
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
17
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
18
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
19
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
20
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
Daily Top 2Weekly Top 5

अपारंपरिक पीक उत्पादनावर भर - मोहन वाघ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2020 12:17 IST

शेतीविषयक माहिती देण्यास कृषी विभाग तत्पर असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मोहन वाघ यांनी गुरुवारी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

- राजरत्न सिरसाट

अकोला : जिल्ह्यात कृषी विकासाच्या दृष्टीने प्रयत्न सुरू असून, अपारंपरिक पिके उत्पादनावर भर देण्यात येत आहे. कीटकनाशके फवारणीसंदर्भात शेतकºयांचे प्रबोधन करण्यात येत असून, विषबाधा झालेल्या शेतमजूर, शेतकºयांचे प्राण वाचविण्यात यश आले आहे. पारंपरिक पिकांसोबतच आता अपारंपरिक पीक उत्पादनासंदर्भात शेतकºयांचे प्रबोधन करण्यात येत आहे. येत्या खरीप हंगामात शेतकºयांना शेतीविषयक माहिती देण्यास कृषी विभाग तत्पर असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मोहन वाघ यांनी गुरुवारी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

प्रश्न: यावर्षीच्या खरीप हंगामाचे नियोजन कसे असणार?

उत्तर: गतवर्षी आॅक्टोबरपर्यंत पीक चांगले होते. आॅक्टोबर महिन्यानंतरही सतत पाऊस सुरू राहिल्याने विशेषत: सोयाबीन पीक, बीजोत्पादन क्षेत्रावर परिणाम झाला आहे. म्हणूनच यावर्षी घरचे सोयाबीन बियाणे वापरण्यासंदर्भात शेतकºयांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या पिकासोबतच आता अपारंपरिक पीक लागवडीकरिता शेतकºयांना मार्गदर्शन करण्यात येत असून, शेतकºयांचा प्रतिसाद मिळत आहे.

प्रश्न: कोणती अपारंपरिक पिके घेणार?

उत्तर: काही वर्षांपूर्वी जवस हे विदर्भातील महत्त्वाचे पीक होते; परंतु अलीकडे हे पीक कमी झाले आहे. याबाबत शेतकºयांना मार्गदर्शन करण्यात येत असून, मसाले पिकातील ओवा, हळद पिकाकडे शेतकरी वळला आहे. तद्वतच रब्बी हंगामात ज्वारी व बाजरी इत्यादी पिकाचे क्षेत्र वाढविण्यावर भर देण्यात येत आहे. पीक प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून ‘आत्मा’ व ‘पोक्रा’ योजनेंतर्गतही पीक पेरणीकडे भर देण्यात आला आहे. म्हणूनच रब्बी ज्वारी २,५००, ओवा २,५००, जवस ५० आणि बाजरी ५० हेक्टरपर्यंत वाढली आहे.

प्रश्न: कीटकनाशक फवारणीसंदर्भात कोणत्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत?

उत्तर: गतवर्षीच्या खरीप हंगामात कीटकनाशके फवारणी करताना जिल्ह्यात ३७४ शेतकरी, शेतमजुरांना विषबाधा झाली होती. त्यावेळी कृषी विभाग, महसूल, ग्रामविकास, आरोग्य व गृह विभाग, एकूणच जिल्हा प्रशासनाने एकत्रितरीत्या मोहीम राबवून विषबाधा झालेल्या सर्व रुग्णांचे प्राण वाचविण्यात आले. जिल्ह्यातील डॉक्टर, वैद्यकीय अधिकाºयांना आंतरराष्टÑीय स्तरावरील डॉ. प्रजापती व डॉ. पिल्ले यांनी यासंदर्भात प्रशिक्षण व माहिती दिली. हे मॉडेल राज्य व राष्ट्रीय पातळीवर दिशादर्शक ठरेल, असे वाटते. फवारणी करताना घ्यावयाची काळजी, शास्त्रीय पद्धत आदींबाबत कृषी विभाग मार्गदर्शन करीतच आहे.

प्रश्न: नावीन्यपूर्ण उपक्रम कोणते राबविले?

उत्तर: राष्टÑीय सुरक्षा अभियानांतर्गत या रब्बी हंगामात २,२०० शेतकºयांना हरभरा १३,५०९ तर गहू पिकाचे ३,६४० क्ंिवटल प्रमाणित बियाणे परमिटवर वितरित करण्यात आले. याकरिता आत्माचे तालुका व सहायक तंत्रज्ञान व्यवस्थापक तसेच ५१७ कृषी मित्रामार्फत ८ दिवसांत ही मोहीम राबविण्यात आली.

टॅग्स :Akolaअकोलाagricultureशेती