शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

अपारंपरिक पीक उत्पादनावर भर - मोहन वाघ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2020 12:17 IST

शेतीविषयक माहिती देण्यास कृषी विभाग तत्पर असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मोहन वाघ यांनी गुरुवारी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

- राजरत्न सिरसाट

अकोला : जिल्ह्यात कृषी विकासाच्या दृष्टीने प्रयत्न सुरू असून, अपारंपरिक पिके उत्पादनावर भर देण्यात येत आहे. कीटकनाशके फवारणीसंदर्भात शेतकºयांचे प्रबोधन करण्यात येत असून, विषबाधा झालेल्या शेतमजूर, शेतकºयांचे प्राण वाचविण्यात यश आले आहे. पारंपरिक पिकांसोबतच आता अपारंपरिक पीक उत्पादनासंदर्भात शेतकºयांचे प्रबोधन करण्यात येत आहे. येत्या खरीप हंगामात शेतकºयांना शेतीविषयक माहिती देण्यास कृषी विभाग तत्पर असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मोहन वाघ यांनी गुरुवारी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

प्रश्न: यावर्षीच्या खरीप हंगामाचे नियोजन कसे असणार?

उत्तर: गतवर्षी आॅक्टोबरपर्यंत पीक चांगले होते. आॅक्टोबर महिन्यानंतरही सतत पाऊस सुरू राहिल्याने विशेषत: सोयाबीन पीक, बीजोत्पादन क्षेत्रावर परिणाम झाला आहे. म्हणूनच यावर्षी घरचे सोयाबीन बियाणे वापरण्यासंदर्भात शेतकºयांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या पिकासोबतच आता अपारंपरिक पीक लागवडीकरिता शेतकºयांना मार्गदर्शन करण्यात येत असून, शेतकºयांचा प्रतिसाद मिळत आहे.

प्रश्न: कोणती अपारंपरिक पिके घेणार?

उत्तर: काही वर्षांपूर्वी जवस हे विदर्भातील महत्त्वाचे पीक होते; परंतु अलीकडे हे पीक कमी झाले आहे. याबाबत शेतकºयांना मार्गदर्शन करण्यात येत असून, मसाले पिकातील ओवा, हळद पिकाकडे शेतकरी वळला आहे. तद्वतच रब्बी हंगामात ज्वारी व बाजरी इत्यादी पिकाचे क्षेत्र वाढविण्यावर भर देण्यात येत आहे. पीक प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून ‘आत्मा’ व ‘पोक्रा’ योजनेंतर्गतही पीक पेरणीकडे भर देण्यात आला आहे. म्हणूनच रब्बी ज्वारी २,५००, ओवा २,५००, जवस ५० आणि बाजरी ५० हेक्टरपर्यंत वाढली आहे.

प्रश्न: कीटकनाशक फवारणीसंदर्भात कोणत्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत?

उत्तर: गतवर्षीच्या खरीप हंगामात कीटकनाशके फवारणी करताना जिल्ह्यात ३७४ शेतकरी, शेतमजुरांना विषबाधा झाली होती. त्यावेळी कृषी विभाग, महसूल, ग्रामविकास, आरोग्य व गृह विभाग, एकूणच जिल्हा प्रशासनाने एकत्रितरीत्या मोहीम राबवून विषबाधा झालेल्या सर्व रुग्णांचे प्राण वाचविण्यात आले. जिल्ह्यातील डॉक्टर, वैद्यकीय अधिकाºयांना आंतरराष्टÑीय स्तरावरील डॉ. प्रजापती व डॉ. पिल्ले यांनी यासंदर्भात प्रशिक्षण व माहिती दिली. हे मॉडेल राज्य व राष्ट्रीय पातळीवर दिशादर्शक ठरेल, असे वाटते. फवारणी करताना घ्यावयाची काळजी, शास्त्रीय पद्धत आदींबाबत कृषी विभाग मार्गदर्शन करीतच आहे.

प्रश्न: नावीन्यपूर्ण उपक्रम कोणते राबविले?

उत्तर: राष्टÑीय सुरक्षा अभियानांतर्गत या रब्बी हंगामात २,२०० शेतकºयांना हरभरा १३,५०९ तर गहू पिकाचे ३,६४० क्ंिवटल प्रमाणित बियाणे परमिटवर वितरित करण्यात आले. याकरिता आत्माचे तालुका व सहायक तंत्रज्ञान व्यवस्थापक तसेच ५१७ कृषी मित्रामार्फत ८ दिवसांत ही मोहीम राबविण्यात आली.

टॅग्स :Akolaअकोलाagricultureशेती