शहरं
Join us  
Trending Stories
1
अशी ही 'अदलाबदली'! कोकाटेंचा 'पत्ता' कापणार नाहीत, पण खातं बदलणार; दत्तात्रय भरणे होणार कृषिमंत्री - सूत्र
2
'भारताची अर्थव्यवस्था मृतावस्थेत', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेला राहुल गांधींचे समर्थन, म्हणाले...
3
IND vs ENG : कमनशिबी कॅप्टन! किंग कोहलीनंतर टीम इंडियातील प्रिन्स शुबमन गिलवर आली ही वेळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या मनमानी कारभारावरून अमेरिकेत गोंधळ; राष्ट्रपतींच्या टॅरिफ पॉवरवर न्यायालय आज निर्णय देणार
5
लोकमत इम्पॅक्ट: गणेश मंडळांना मोठा दिलासा, मंडपासाठीच्या खड्ड्यांचा दंड १५ हजारावरुन २ हजारावर  
6
मालेगाव बॉम्ब स्फोट: "तपास यंत्रणा शंकेपलीकडे आरोप सिद्ध करू शकत नसतील, तर..."; खासदार देसाई काय बोलले?
7
August Horoscope 2025: ऑगस्टमध्ये 'या' ६ राशींच्या वाट्याला येणार राजसी थाट; बाकी राशींचे काय?
8
हिंदूही दहशतवादी असू शकतात! मालेगाव निकालानंतर काँग्रेसच्या ज्येष्ठ महिला नेत्यानं मांडलं स्पष्ट मत 
9
पाकिस्तानशी मोठी डील करून डोनाल्ड ट्रम्प यांचा दुहेरी निशाणा; भारतासह चीनलाही दिला संदेश?
10
औषधांचा साठा संपला, उपकरणांमध्येही बिघाड; कुर्ला येथील भाभा रुग्णालयातील रुग्णांचे हाल!
11
बाजारात मोठी घसरण! निफ्टी अडीच टक्क्यांहून अधिक खाली, अदानी-टाटांना सर्वाधिक फटका
12
२५% टॅरिफवर भडकले भारतीय व्यावसायिक; कोणी दिला ट्रम्प यांना अमेरिकन सामानावर बहिष्काराचा इशारा?
13
IPL 2026: केएल राहुल बनणार कर्णधार, २५ कोटीही मिळणार? 'या' संघाबद्दल रंगलीये चर्चा
14
मालेगाव बॉम्ब स्फोट: निकालावर सरसंघचालक भागवत यांनी तीन शब्दात प्रतिक्रिया, म्हणाले...
15
व्हॉट्सअपवरील विनाकामाचे फोटो अन् व्हिडिओंनी भरला फोन, ही ट्रिक वापरून पहा; गॅलरी रिकामी राहील
16
अंतराळ क्षेत्रात एन्ट्री करण्याच्या तयारीत मुकेश अंबानींची रिलायन्स; 'या' कंपनीत मोठी गुंतवणूक करणार
17
आमिर-जुनैदनं रिक्रिएट केला 'अंदाज अपना अपना' मधील आयकॉनिक सीन, पाहा मजेशीर VIDEO
18
आज शितला सप्तमीच्या मुहूर्तावर सुरु करा रोज ५ मिनिटं शेगडी पूजन; अन्नपूर्णा होईल प्रसन्न!
19
"भगवा दहशतवाद म्हणणाऱ्यांनी हिंदूंची जाहीर माफी मागावी’’, एकनाथ शिंदेंची काँग्रेसवर टीका   
20
Video: विचित्र घटना; 'मौत का कुआं'मध्ये तरुण कोसळला; बाईक रायडरशिवाय तासभर धावत राहिली

अपारंपरिक पीक उत्पादनावर भर - मोहन वाघ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2020 12:17 IST

शेतीविषयक माहिती देण्यास कृषी विभाग तत्पर असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मोहन वाघ यांनी गुरुवारी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

- राजरत्न सिरसाट

अकोला : जिल्ह्यात कृषी विकासाच्या दृष्टीने प्रयत्न सुरू असून, अपारंपरिक पिके उत्पादनावर भर देण्यात येत आहे. कीटकनाशके फवारणीसंदर्भात शेतकºयांचे प्रबोधन करण्यात येत असून, विषबाधा झालेल्या शेतमजूर, शेतकºयांचे प्राण वाचविण्यात यश आले आहे. पारंपरिक पिकांसोबतच आता अपारंपरिक पीक उत्पादनासंदर्भात शेतकºयांचे प्रबोधन करण्यात येत आहे. येत्या खरीप हंगामात शेतकºयांना शेतीविषयक माहिती देण्यास कृषी विभाग तत्पर असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मोहन वाघ यांनी गुरुवारी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

प्रश्न: यावर्षीच्या खरीप हंगामाचे नियोजन कसे असणार?

उत्तर: गतवर्षी आॅक्टोबरपर्यंत पीक चांगले होते. आॅक्टोबर महिन्यानंतरही सतत पाऊस सुरू राहिल्याने विशेषत: सोयाबीन पीक, बीजोत्पादन क्षेत्रावर परिणाम झाला आहे. म्हणूनच यावर्षी घरचे सोयाबीन बियाणे वापरण्यासंदर्भात शेतकºयांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या पिकासोबतच आता अपारंपरिक पीक लागवडीकरिता शेतकºयांना मार्गदर्शन करण्यात येत असून, शेतकºयांचा प्रतिसाद मिळत आहे.

प्रश्न: कोणती अपारंपरिक पिके घेणार?

उत्तर: काही वर्षांपूर्वी जवस हे विदर्भातील महत्त्वाचे पीक होते; परंतु अलीकडे हे पीक कमी झाले आहे. याबाबत शेतकºयांना मार्गदर्शन करण्यात येत असून, मसाले पिकातील ओवा, हळद पिकाकडे शेतकरी वळला आहे. तद्वतच रब्बी हंगामात ज्वारी व बाजरी इत्यादी पिकाचे क्षेत्र वाढविण्यावर भर देण्यात येत आहे. पीक प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून ‘आत्मा’ व ‘पोक्रा’ योजनेंतर्गतही पीक पेरणीकडे भर देण्यात आला आहे. म्हणूनच रब्बी ज्वारी २,५००, ओवा २,५००, जवस ५० आणि बाजरी ५० हेक्टरपर्यंत वाढली आहे.

प्रश्न: कीटकनाशक फवारणीसंदर्भात कोणत्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत?

उत्तर: गतवर्षीच्या खरीप हंगामात कीटकनाशके फवारणी करताना जिल्ह्यात ३७४ शेतकरी, शेतमजुरांना विषबाधा झाली होती. त्यावेळी कृषी विभाग, महसूल, ग्रामविकास, आरोग्य व गृह विभाग, एकूणच जिल्हा प्रशासनाने एकत्रितरीत्या मोहीम राबवून विषबाधा झालेल्या सर्व रुग्णांचे प्राण वाचविण्यात आले. जिल्ह्यातील डॉक्टर, वैद्यकीय अधिकाºयांना आंतरराष्टÑीय स्तरावरील डॉ. प्रजापती व डॉ. पिल्ले यांनी यासंदर्भात प्रशिक्षण व माहिती दिली. हे मॉडेल राज्य व राष्ट्रीय पातळीवर दिशादर्शक ठरेल, असे वाटते. फवारणी करताना घ्यावयाची काळजी, शास्त्रीय पद्धत आदींबाबत कृषी विभाग मार्गदर्शन करीतच आहे.

प्रश्न: नावीन्यपूर्ण उपक्रम कोणते राबविले?

उत्तर: राष्टÑीय सुरक्षा अभियानांतर्गत या रब्बी हंगामात २,२०० शेतकºयांना हरभरा १३,५०९ तर गहू पिकाचे ३,६४० क्ंिवटल प्रमाणित बियाणे परमिटवर वितरित करण्यात आले. याकरिता आत्माचे तालुका व सहायक तंत्रज्ञान व्यवस्थापक तसेच ५१७ कृषी मित्रामार्फत ८ दिवसांत ही मोहीम राबविण्यात आली.

टॅग्स :Akolaअकोलाagricultureशेती