शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
3
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
4
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
5
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
6
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
7
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
8
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
9
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
10
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
11
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
12
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
13
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
14
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
15
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
16
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
17
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
18
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
19
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
20
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?

अकरावी विज्ञान शाखेच्या ५० टक्के जागा राहणार रिक्त!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2019 13:52 IST

केंद्रीय प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत केवळ ३ हजार २०० विद्यार्थ्यांचे अर्ज शिक्षण विभागाकडे प्राप्त झाले आहेत.

अकोला : इयत्ता अकरावी विज्ञान शाखेच्या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेला १७ जूनपासून सुरुवात झाली; परंतु विद्यार्थ्यांकडून नांदेड पॅटर्नला पसंती दिली जात असल्याचे निदर्शनास येत आहे. केंद्रीय प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत केवळ ३ हजार २०० विद्यार्थ्यांचे अर्ज शिक्षण विभागाकडे प्राप्त झाले आहेत. त्यामुळे यंदा अकरावी विज्ञान शाखेच्या ५० टक्के जागा रिक्त राहण्याची शक्यता दिसून येते.महानगरपालिका कार्यक्षेत्रातील ५५ कनिष्ठ महाविद्यालयांत इयत्ता अकरावी विज्ञान शाखेची केंद्रीय पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. यंदा या कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये एकूण ८ हजार ३६० जागा उपलब्ध असून, त्यासाठी १७ जूनपासून प्रवेश अर्ज स्वीकृतीला सुरुवात झाली आहे. २० जूनपर्यंत सुरू केवळ तीन हजार विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी अर्ज केले. मुदत संपल्याने शुक्रवार, २१ जूून ते सोमवार, २४ जून या कालावधीत विलंब शुल्कासोबत प्रवेश अर्ज स्वीकारण्यात येणार आहे; मात्र शुक्रवारी केवळ २०० विद्यार्थ्यांनी अर्ज केले. आतापर्यंत शिक्षण विभागाकडे प्राप्त अर्जांचा विचार केल्यास यंदा अकरावी विज्ञान शाखेच्या ५० टक्क्यांपेक्षा जास्त जागा रिक्त राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे. बहुतांश विद्यार्थ्यांचा ओढा नांदेड जिल्ह्याकडे असल्याने ही परिस्थिती उद््भवल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले.म्हणून नांदेड ‘पॅटर्न’ला पसंतीयंदा नीट, सीईटी परीक्षेत जिल्ह्याचा निकाल गतवर्षीच्या तुलनेत कमी लागल्याने विद्यार्थ्यांनी स्थानिक कनिष्ठ महाविद्यालयांकडे पाठ फिरविल्याचे बोलल्या जात आहे. तसेच शेजारील जिल्ह्यातील विद्यार्थीदेखील अकोल्यापेक्षा नांदेडला पसंती देत आहेत.अनेक तुकड्या प्रवेशाविनाच राहणार!५० टक्क्यांपेक्षा कमी जागांवर प्रवेश होणार असल्याचे संकेत आहेत. त्यामुळे प्रत्येक कनिष्ठ महाविद्यालयांना समान प्रवेश देणे शिक्षण विभागासमोर मोठे आव्हान असणार आहे. अशा परिस्थितीत लहान कनिष्ठ महाविद्यालयांना योग्य न्याय न मिळाल्यास त्यांच्यामध्ये नाराजी निर्माण होऊ शकते. गतवर्षीदेखील काही प्रमाणात लहान कनिष्ठ महाविद्यालयांमधून नाराजी व्यक्त करण्यात आली होती.गतवर्षीप्रमाणे यंदाही इयत्ता अकरावी विज्ञान शाखेची प्रवेश प्रक्रिया केंद्रीय पद्धतीने राबविण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज सादरीकरणासाठी २४ जूनपर्यंत मुदत देण्यात आली आहे.- गजानन चौधरी, इयत्ता अकरावी, केंद्रीय प्रवेश प्रक्रिया समिती सदस्य, अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाEducationशिक्षण