शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
4
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
5
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
6
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
7
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
8
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
9
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
10
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
11
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
12
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
13
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
14
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
15
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
16
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
17
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

अकरावी प्रवेश प्रक्रिया केंद्रीय पद्धतीनेच होणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2019 12:27 PM

माध्यमिक शिक्षण विभागाने गत दोन वर्षांपासून अकरावीची प्रवेश प्रक्रिया केंद्रीय पद्धतीने; परंतु आॅफलाइन सुरू केली आहे.

अकोला: दहावीचा निकाल लागल्यावर अकरावीमध्ये विविध शाखेत प्रवेशाचे विद्यार्थ्यांना वेध लागतात. विद्यार्थ्यांची आर्थिक लुबाडणूक होऊ नये, या दृष्टिकोनातून माध्यमिक शिक्षण विभागाने गत दोन वर्षांपासून अकरावीची प्रवेश प्रक्रिया केंद्रीय पद्धतीने; परंतु आॅफलाइन सुरू केली आहे. यामुळे शिक्षण संस्थाचालकांमध्ये पोटशूळ उठला आहे. शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद यांनी यंदासुद्धा अकरावीचे प्रवेश केंद्रीय पद्धतीनेच होणार असल्याचे स्पष्ट केले; परंतु याला शिक्षण संस्थाचालकांचा विरोध आहे. प्रवेशाचे अधिकार आम्हालाच द्या, आम्ही मोफत प्रवेश प्रक्रिया राबवू, असे शिक्षण संस्थाचालकांचे म्हणणे आहे.इयत्ता दहावीचा निकाल शनिवारी जाहीर झाला आहे. १९ हजारांवर विद्यार्थी यंदा परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. त्यामुळे आता अकरावी प्रवेशाची लगबग सुरू होणार आहे. गत दोन वर्षांपासून शहरामध्ये केंद्रीय पद्धतीने; परंतु आॅफलाइन अकरावीची विज्ञान शाखेची प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. यंदासुद्धा माध्यमिक शिक्षण विभागाने केंद्रीय पद्धतीनेच प्रवेश प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला शहरातील शिक्षण संस्थाचालक विरोध करीत आहेत. कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये आम्हाला प्रवेश मिळत नाही. अनेक जागा रिक्त राहतात. त्यामुळे प्रवेश प्रक्रिया करण्याचा अधिकार आम्हाला द्यावा, अशी मागणी शिक्षण संस्थाचालकांनी शिक्षणाधिकाऱ्यांकडे केली आहे. शिक्षण संस्थाचालकांना कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेशाचे अधिकार दिले तर विद्यार्थ्यांची आर्थिक लुबाडणूक होण्याची शक्यता आहे आणि प्रवेशपत्र विक्रीच्या नावाखाली संस्थाचालक लाखो रुपये विद्यार्थ्यांकडून गोळा करतात. एवढेच नाही, तर गुणवत्तेला महत्त्व देऊन विद्यार्थ्यांना प्रवेश देतात. त्यामुळे कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशापासून वंचित राहावे लागते. विद्यार्थ्यांवर कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ नये, त्यांची आर्थिक लुबाडणूक होऊ नये, या दृष्टिकोनातूनच यंदासुद्धा शिक्षण विभागाने केंद्रीय पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेतला आहे; परंतु याला शिक्षण संस्थाचालक विरोध करीत आहेत. आठ दिवसांपूर्वी सर्व शिक्षण संस्थाचालकांनी शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद यांची भेट घेऊन अकरावी प्रवेशाचे अधिकार देण्याची मागणी केली आणि प्रवेश प्रक्रिया राबविताना, विद्यार्थ्यांना मोफत प्रवेशपत्र उपलब्ध करून देण्याचे शिक्षण संस्थाचालकांनी सांगितले. शिक्षण संस्थाचालकांची ही मागणी धुडकावून लावत, शिक्षणाधिकारी मुकुंद यांनी केंद्रीय पद्धतीनेच अकरावीचे प्रवेश होतील. असे स्पष्ट केले.

अकरावी प्रवेशाबाबत शिक्षण संस्थाचालकांनी भेट घेऊन प्रवेशाचे अधिकार देण्याची मागणी केली होती. त्यांच्या मागणीला शिक्षण विभागाचा विरोध नाही; परंतु त्यांनी शासनाकडून अकरावी प्रवेशासाठी परवानगी आणावी, त्यानंतर त्यांनी प्रक्रिया राबवावी, शिक्षण विभागाच्यावतीने अकरावीचे प्रवेश केंद्रीय पद्धतीने; परंतु आॅफलाइन प्रक्रियेनेच होतील.-प्रकाश मुकुंद, शिक्षणाधिकारीमाध्यमिक, अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाEducationशिक्षण