शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

अकरावी प्रवेश प्रक्रिया केंद्रीय पद्धतीनेच होणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2019 12:27 IST

माध्यमिक शिक्षण विभागाने गत दोन वर्षांपासून अकरावीची प्रवेश प्रक्रिया केंद्रीय पद्धतीने; परंतु आॅफलाइन सुरू केली आहे.

अकोला: दहावीचा निकाल लागल्यावर अकरावीमध्ये विविध शाखेत प्रवेशाचे विद्यार्थ्यांना वेध लागतात. विद्यार्थ्यांची आर्थिक लुबाडणूक होऊ नये, या दृष्टिकोनातून माध्यमिक शिक्षण विभागाने गत दोन वर्षांपासून अकरावीची प्रवेश प्रक्रिया केंद्रीय पद्धतीने; परंतु आॅफलाइन सुरू केली आहे. यामुळे शिक्षण संस्थाचालकांमध्ये पोटशूळ उठला आहे. शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद यांनी यंदासुद्धा अकरावीचे प्रवेश केंद्रीय पद्धतीनेच होणार असल्याचे स्पष्ट केले; परंतु याला शिक्षण संस्थाचालकांचा विरोध आहे. प्रवेशाचे अधिकार आम्हालाच द्या, आम्ही मोफत प्रवेश प्रक्रिया राबवू, असे शिक्षण संस्थाचालकांचे म्हणणे आहे.इयत्ता दहावीचा निकाल शनिवारी जाहीर झाला आहे. १९ हजारांवर विद्यार्थी यंदा परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. त्यामुळे आता अकरावी प्रवेशाची लगबग सुरू होणार आहे. गत दोन वर्षांपासून शहरामध्ये केंद्रीय पद्धतीने; परंतु आॅफलाइन अकरावीची विज्ञान शाखेची प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. यंदासुद्धा माध्यमिक शिक्षण विभागाने केंद्रीय पद्धतीनेच प्रवेश प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला शहरातील शिक्षण संस्थाचालक विरोध करीत आहेत. कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये आम्हाला प्रवेश मिळत नाही. अनेक जागा रिक्त राहतात. त्यामुळे प्रवेश प्रक्रिया करण्याचा अधिकार आम्हाला द्यावा, अशी मागणी शिक्षण संस्थाचालकांनी शिक्षणाधिकाऱ्यांकडे केली आहे. शिक्षण संस्थाचालकांना कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेशाचे अधिकार दिले तर विद्यार्थ्यांची आर्थिक लुबाडणूक होण्याची शक्यता आहे आणि प्रवेशपत्र विक्रीच्या नावाखाली संस्थाचालक लाखो रुपये विद्यार्थ्यांकडून गोळा करतात. एवढेच नाही, तर गुणवत्तेला महत्त्व देऊन विद्यार्थ्यांना प्रवेश देतात. त्यामुळे कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशापासून वंचित राहावे लागते. विद्यार्थ्यांवर कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ नये, त्यांची आर्थिक लुबाडणूक होऊ नये, या दृष्टिकोनातूनच यंदासुद्धा शिक्षण विभागाने केंद्रीय पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेतला आहे; परंतु याला शिक्षण संस्थाचालक विरोध करीत आहेत. आठ दिवसांपूर्वी सर्व शिक्षण संस्थाचालकांनी शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद यांची भेट घेऊन अकरावी प्रवेशाचे अधिकार देण्याची मागणी केली आणि प्रवेश प्रक्रिया राबविताना, विद्यार्थ्यांना मोफत प्रवेशपत्र उपलब्ध करून देण्याचे शिक्षण संस्थाचालकांनी सांगितले. शिक्षण संस्थाचालकांची ही मागणी धुडकावून लावत, शिक्षणाधिकारी मुकुंद यांनी केंद्रीय पद्धतीनेच अकरावीचे प्रवेश होतील. असे स्पष्ट केले.

अकरावी प्रवेशाबाबत शिक्षण संस्थाचालकांनी भेट घेऊन प्रवेशाचे अधिकार देण्याची मागणी केली होती. त्यांच्या मागणीला शिक्षण विभागाचा विरोध नाही; परंतु त्यांनी शासनाकडून अकरावी प्रवेशासाठी परवानगी आणावी, त्यानंतर त्यांनी प्रक्रिया राबवावी, शिक्षण विभागाच्यावतीने अकरावीचे प्रवेश केंद्रीय पद्धतीने; परंतु आॅफलाइन प्रक्रियेनेच होतील.-प्रकाश मुकुंद, शिक्षणाधिकारीमाध्यमिक, अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाEducationशिक्षण