शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
4
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
5
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
6
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
7
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
8
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
9
हृदयविकाराच्या झटक्याने प्रसिद्ध मराठी अभिनेता-दिग्दर्शकाचं निधन; ४२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
10
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
11
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
12
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
13
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
14
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
15
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
16
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
17
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
18
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
19
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
20
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

अकरावी प्रवेश प्रक्रिया केंद्रीय पद्धतीनेच होणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2019 12:27 IST

माध्यमिक शिक्षण विभागाने गत दोन वर्षांपासून अकरावीची प्रवेश प्रक्रिया केंद्रीय पद्धतीने; परंतु आॅफलाइन सुरू केली आहे.

अकोला: दहावीचा निकाल लागल्यावर अकरावीमध्ये विविध शाखेत प्रवेशाचे विद्यार्थ्यांना वेध लागतात. विद्यार्थ्यांची आर्थिक लुबाडणूक होऊ नये, या दृष्टिकोनातून माध्यमिक शिक्षण विभागाने गत दोन वर्षांपासून अकरावीची प्रवेश प्रक्रिया केंद्रीय पद्धतीने; परंतु आॅफलाइन सुरू केली आहे. यामुळे शिक्षण संस्थाचालकांमध्ये पोटशूळ उठला आहे. शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद यांनी यंदासुद्धा अकरावीचे प्रवेश केंद्रीय पद्धतीनेच होणार असल्याचे स्पष्ट केले; परंतु याला शिक्षण संस्थाचालकांचा विरोध आहे. प्रवेशाचे अधिकार आम्हालाच द्या, आम्ही मोफत प्रवेश प्रक्रिया राबवू, असे शिक्षण संस्थाचालकांचे म्हणणे आहे.इयत्ता दहावीचा निकाल शनिवारी जाहीर झाला आहे. १९ हजारांवर विद्यार्थी यंदा परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. त्यामुळे आता अकरावी प्रवेशाची लगबग सुरू होणार आहे. गत दोन वर्षांपासून शहरामध्ये केंद्रीय पद्धतीने; परंतु आॅफलाइन अकरावीची विज्ञान शाखेची प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. यंदासुद्धा माध्यमिक शिक्षण विभागाने केंद्रीय पद्धतीनेच प्रवेश प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला शहरातील शिक्षण संस्थाचालक विरोध करीत आहेत. कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये आम्हाला प्रवेश मिळत नाही. अनेक जागा रिक्त राहतात. त्यामुळे प्रवेश प्रक्रिया करण्याचा अधिकार आम्हाला द्यावा, अशी मागणी शिक्षण संस्थाचालकांनी शिक्षणाधिकाऱ्यांकडे केली आहे. शिक्षण संस्थाचालकांना कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेशाचे अधिकार दिले तर विद्यार्थ्यांची आर्थिक लुबाडणूक होण्याची शक्यता आहे आणि प्रवेशपत्र विक्रीच्या नावाखाली संस्थाचालक लाखो रुपये विद्यार्थ्यांकडून गोळा करतात. एवढेच नाही, तर गुणवत्तेला महत्त्व देऊन विद्यार्थ्यांना प्रवेश देतात. त्यामुळे कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशापासून वंचित राहावे लागते. विद्यार्थ्यांवर कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ नये, त्यांची आर्थिक लुबाडणूक होऊ नये, या दृष्टिकोनातूनच यंदासुद्धा शिक्षण विभागाने केंद्रीय पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेतला आहे; परंतु याला शिक्षण संस्थाचालक विरोध करीत आहेत. आठ दिवसांपूर्वी सर्व शिक्षण संस्थाचालकांनी शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद यांची भेट घेऊन अकरावी प्रवेशाचे अधिकार देण्याची मागणी केली आणि प्रवेश प्रक्रिया राबविताना, विद्यार्थ्यांना मोफत प्रवेशपत्र उपलब्ध करून देण्याचे शिक्षण संस्थाचालकांनी सांगितले. शिक्षण संस्थाचालकांची ही मागणी धुडकावून लावत, शिक्षणाधिकारी मुकुंद यांनी केंद्रीय पद्धतीनेच अकरावीचे प्रवेश होतील. असे स्पष्ट केले.

अकरावी प्रवेशाबाबत शिक्षण संस्थाचालकांनी भेट घेऊन प्रवेशाचे अधिकार देण्याची मागणी केली होती. त्यांच्या मागणीला शिक्षण विभागाचा विरोध नाही; परंतु त्यांनी शासनाकडून अकरावी प्रवेशासाठी परवानगी आणावी, त्यानंतर त्यांनी प्रक्रिया राबवावी, शिक्षण विभागाच्यावतीने अकरावीचे प्रवेश केंद्रीय पद्धतीने; परंतु आॅफलाइन प्रक्रियेनेच होतील.-प्रकाश मुकुंद, शिक्षणाधिकारीमाध्यमिक, अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाEducationशिक्षण