शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्रात भाजप कोणाच्याही कुबड्यांवर चालत नाही; सत्तेमुळे तुम्ही समाधानी असाल, पण मी नाही": शाह
2
१२ राज्यांमध्ये होणार मतदार याद्यांची पडताळणी; SIR दुसरा टप्पा ४ नोव्हेंबरपासून, महाराष्ट्राचा समावेश नाही
3
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
4
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
5
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
6
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
7
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
8
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
9
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
10
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
11
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
12
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
13
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
14
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
15
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
16
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
17
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
18
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
19
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
20
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला

विविध संस्था, शाळांच्या एकत्रीकरणास शिक्षण संस्था चालकांचा विरोध!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2019 16:09 IST

शिक्षण संस्थांच्या शाळांचे एकत्रिकरण करून शिक्षण संस्था संपविण्याचा शासनाचा डाव असल्याचा आरोप शिक्षण संस्थाचालक मंडळाने केला आहे.

- नितीन गव्हाळे लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: तत्कालीन मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार शालेय शिक्षण विभागाने एकाच परिसरातील विविध शिक्षण संस्थांनी चालविलेल्या शाळांचे एकत्रिकरण करण्याचा विचार सुरू केला आहे. त्यासाठी शिक्षण विभागाने एक अभ्यासगट स्थापन केला आहे. शिक्षण संस्थांच्या शाळांचे एकत्रिकरण करून शिक्षण संस्था संपविण्याचा शासनाचा डाव असल्याचा आरोप शिक्षण संस्थाचालक मंडळाने केला आहे.शिक्षणातील महत्त्वाच्या ३३ विषयांसाठी अभ्यासगट स्थापन करण्याचा निर्णय तत्कालिन मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता. त्यानुसार अभ्यासगट स्थापन करण्यात आले असून, या अभ्यासगटांना आता शिक्षण क्षेत्रातूनच विरोध होऊ लागला आहे. राज्यामध्ये एकाच इमारतीमध्ये किंवा एकाच परिसरामध्ये एकाच संस्थेच्या वेगवेगळ्या शाळा आणि वेगवेगळ्या संस्थांच्या शाळा चालविल्या जातात. या सर्व शाळा एकत्रित करण्याचा विचार पुढे आला आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये एकाच संस्थेच्या अनेक शाळा आहेत, तसेच वेगवेगळ्या संस्थांकडून शाळा, महाविद्यालयेसुद्धा चालविले जातात. या शाळांमधील पटसंख्या घसरत आहे. शिक्षक अतिरिक्त ठरत आहेत. ज्या शाळेमध्ये पटसंख्या कमी आहे, ती शाळा दुसऱ्या मोठ्या शाळेमध्ये किंवा शिक्षण संस्थेमध्ये विलीन करण्याचा विचार करण्यात येत आहे. त्यासाठी नागपूरचे प्राथमिक शिक्षणाधिकारी सी.जी. वंजारी यांच्या अध्यक्षतेखाली एक अभ्यासगट स्थापन करण्यात आला. हा अभ्यासगट या शाळांचा अभ्यास करून शाळांचे एकत्रिकरण करायचे की नाही, याबाबतचा अहवाल शिक्षण आयुक्तालयाकडे सादर करणार आहे. त्यानंतरच विविध संस्थांच्या शाळांच्या एकत्रिकरणाचा निर्णय घेण्यात येणार आहे; परंतु शाळा एकत्रिकरणाचा विचार शिक्षण क्षेत्रासाठी घातक असून, शासनाला शाळा आणि शिक्षक संपवायचे आहेत, असा आरोप शिक्षण संस्थाचालक मंडळाने केला आहे.

शाळांच्या एकत्रिकरणास आमचा विरोध असून, मंगळवारी राज्य शिक्षण संस्था संचालक महामंडळाची पुणे येथे बैठक आहे. शाळांचे एकत्रिकरण करून शासनाला ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्था मोडकळीस आणायची आहे. आरटीई कायद्याचे हे उल्लंघन आहे. शाळा एकत्रिकरणाचा निर्णय घेतला तर राज्यातील ७0 हजार शाळा बंद पडतील. त्यामुळे बहुजन समाजासह शेतकरी, शेतमजुरांची मुले शिक्षणापासून वंचित राहतील.-विजय कौसल, जिल्हाध्यक्ष,शिक्षण संस्था संचालक मंडळ, अकोला

 

 

टॅग्स :AkolaअकोलाEducation Sectorशिक्षण क्षेत्रSchoolशाळा