शहरं
Join us  
Trending Stories
1
आमदारांना देण्यासाठी साडेपाच कोटी ठेवले रुम नं. 102मध्ये, अनिल गोटेंनी ठोकले कुलूप; संजय राऊत सरकारवर भडकले
2
IPL 2025 : मुंबईकरांसमोर दिल्लीकरांची डाळ नाही शिजली! MI नं थाटात मारली प्लेऑफ्समध्ये एन्ट्री
3
'काम करा नाहीतर निलंबित होण्यासाठी तयार रहा', मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांचा अधिकाऱ्यांना इशारा
4
ती म्हणाली होती की,... 'मॅन ऑफ द मॅच' वेळी सूर्या भाऊला आली बायकोची आठवण
5
भयंकर थरार! इंडिगोचे विमान सापडले गारपिटीच्या तडाख्यात; प्रवाशांचा आक्रोश, विमानात प्रचंड गोंधळ
6
अजित पवारांची राष्ट्रवादी 'शक्ति स्थळा'वरून फुंकणार रणशिंग! साताऱ्यात मेळावा
7
IPL 2025 : कुलदीप यादवची 'सेंच्युरी'; मोडला हरभजन सिंगचा विक्रम
8
'तेच माझं चुकलं…’वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाला नवे वळण देणारी ऑडिओ क्लिप व्हायरल
9
पुणे, छत्रपती संभाजीनगरला मिळाले नवे आयुक्त; सरकारकडून कोणत्या आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या?
10
'दहशतवादाला जन्म देणारा पाकिस्तान...', WHO च्या मंचावरुन भारताचा पाकवर निशाणा
11
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण : पतीसह सासू, नणंदेच्या पोलीस कोठडीत वाढ
12
MI vs DC : ट्रिकी खेळपट्टीवर तळपली सूर्या भाऊची बॅट! ठोकली कडक फिफ्टी
13
लातुरात लॉजवरच सुरू होता वेश्या व्यवसाय; पोलिसांची धाड, दोन महिलांची सुटका; सात जणांना अटक
14
Thane: रस्त्याच्या कडेला लघुशंका करताना विजेच्या तारेला स्पर्श, १७ वर्षीय मुलाचा दुर्देवी अंत
15
Yavatmal: पतीला ज्यूसमधून दिले विष, विद्यार्थ्यांच्या मदतीने जाळला मृतदेह; मुख्याध्यापिकेने बनवला होता 'यूपीएससी मिशन २०३०' ग्रुप
16
Mumbai: कधीही कोसळण्याची भीती! 'या' आहेत मुंबईतील अतिधोकायदायक इमारती, पहा संपूर्ण यादी
17
Mumbai: वाडिया रुग्णालयाला मोठं यश, झिपर स्टॉपर गिळलेल्या १० महिन्याच्या बाळाला वाचवलं!
18
'मुंबईचा राजा' नावासह छापलेल्या खास जर्सीसह रोहितचा सन्मान; MI नं चाहत्यांनाही केलं खुश
19
"माझ्या लेकीला जनावरासारखं मारलं, तिचं बाळ कुठे ठेवलंय माहिती नाही"; वैष्णवीच्या वडिलांचा आक्रोश
20
ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानपेक्षा अधिक बिथरला चीन; भारताविरोधात टाकले ४ नवे डाव

औषधोपचाराअभावी अल्पभूधारक शेतक-याचा मृत्यू!

By admin | Updated: April 15, 2016 02:22 IST

आजारपण असतानाही केवळ पैशांअभावी औषधोपचार न घेता आल्यामुळे अल्पभूधारक शेतक-याचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू.

शिर्ला (पातूर, अकोला): घरी अठराविश्‍वे दारिद्रय़.. चार एकर शेतीच्या तुकड्याशिवाय उदरनिर्वाहाचे दुसरे साधन नाही..त्यात दुष्काळ..दोन वेळच्या जेवणाचीही भ्रांत.. अशा बिकट परिस्थितीत सहा महिन्यांपूर्वी अर्धांगवायूच्या झटक्याने खाटेला खिळवून ठेवले. आजारपण असतानाही केवळ पैशांअभावी औषधोपचार न घेता आल्यामुळे खचलेल्या एका अल्पभूधारक शेतकर्‍याचा गुरुवारी हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. पातुर तालुक्यातील शिर्ला येथील विनायकराव उत्तमराव अंधारे ( ६४) यांच्याकडे चार एकर शेती होती. यातूनच ते आपल्या कुटुंबाचा गाडा ओढत होते. सहा महिन्यांपूर्वी त्यांना अर्धांगवायूचा झटका आला आणि त्यांचे शरिर लुळे पडले . सुरूवातीला त्यांनी जुजबी औषधोपचार घेतला; परंतु परिस्थितीअभावी पुढचा महागडा औषधोपचार शक्य न झाल्यामुळे विनायकराव कायमचे अंथरुणाला खिळले. घरातील कर्ता पुरुष अंथरुणाला खिळल्यामुळे आधीच अठराविश्‍वे दारिद्रय़ असलेल्या अंधारे कुटुंबावर डोंगरच कोसळला. विनायकराव यांच्या घरात पत्नी, मुलगा आणि सून, तसेच चार वर्षांपूर्वी विजेच्या धक्क्याने दगावलेल्या मोठय़ा मुलाची मुलगी एवढे सदस्य आहेत. मुलगा मिळेल ते काम करून सर्वांच्या पोटाची खळगी भरण्याचा प्रयत्न करतो. दोन्ही वेळच्या जेवणाची भ्रांत असताना विनायकराव औषधोपचार घेऊ शकले नाही. यंदा दुष्काळामुळे नापिकी झाली. गत चार वर्षांपासून हीच परिस्थिती आहे. या हलाखीच्या परिस्थितीत गुरुवारी विनायकरावांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. अर्धांगवायूने अंथरूणाला खिळलेल्या विनायकरावांना वेळीच उपचार मिळाला असता, तर ते वाचू शकले असते, अशा प्रतिक्रिया गावकर्‍यांनी व्यक्त केल्या आहेत. रुढी, परंपरेला दिली तिलांजली रुढी, परंपरेनुसार निधनानंतर धार्मिक विधी पार पाडले जातात. या खर्चिक प्रकाराला फाटा देण्याचा निर्णय अंधारे कुटुंबियांनी घेतला. विनायकराव यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले, त्याप्रसंगी खर्चिक रुढी परंपरांना तिलांजली देण्याची घोषणा दिलीप मोतीराम अंधारे यांनी सर्व नातेवाईकांसमोर केली. त्याला समाजबांधवांनी सर्मथन दिले.