शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
2
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
3
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
4
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
5
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
6
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
7
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
8
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
9
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
10
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल
11
भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा
12
गाझातील रुग्णालयावर इस्त्रायलचा हल्ला, ४ पत्रकारांसह १४ लोक ठार; जगभरातून होतोय निषेध 
13
पाकिस्तान हेरगिरी प्रकरणी यूट्यूबर ज्योती मल्होत्राला केलं कोर्टात हजर; ९५ दिवसांनी तुरुंगाबाहेर!
14
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
15
Shakib Al Hasan World Record : ५०० विकेट्स अन् ७००० धावा! पठ्ठ्यानं वर्ल्ड रेकॉर्डसह केली हवा
16
Farrhana Bhatt : वडील सोडून गेले, चारित्र्यावर झाली चिखलफेक, जीवे मारण्याच्या धमक्या; अभिनेत्रीने केला संघर्ष
17
Hartalika Teeja 2025: हरितालिका व्रत केल्याने केवळ सौभाग्य नाही, तर 'हे'देखील लाभ होतात!
18
TCS-इन्फोसिस ठरले हिरो! आयटी शेअर्समुळे बाजारात तेजी; निफ्टी-सेन्सेक्सही वधारले; पण, 'या' क्षेत्रात दबाव
19
Mumbai Crime: मरीन ड्राईव्हच्या समुद्रात आढळला तरुणीचा मृतदेह; चेहऱ्यावर जखमा
20
"तीच लोक डोक्यावर पाय देऊन गद्दारांच्या टोळीत सामील झाले"; मनसे नेते राजू पाटलांना संताप अनावर

दुष्काळ अन् कर्जमाफीकडे लोकप्रतिनिधींचा कानाडोळा

By admin | Updated: January 15, 2016 02:05 IST

अकोला जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतक-यांना केव्हा मिळणार सरकारी मदतीचा 'दिलासा'?

संतोष येलकर/अकोला : खरीप पिकांची पैसेवारी ५0 पैशांपेक्षा कमी असल्याने जिल्ह्यातील सर्वच गावांमध्ये दुष्काळी परिस्थिती असताना सरकारमार्फत अद्यापही जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात आलेला नाही, तसेच परवानाधारक सावकारांकडून कर्ज घेतलेल्या जिल्ह्यातील ५६ हजारांवर कर्जदार शेतकर्‍यांना कर्जमाफी योजनेचा अद्यापही लाभ मिळाला नाही. दुष्काळी परिस्थितीत शेतकरी हवालदिल झाला असला तरी जिल्ह्यातील सर्व गावे दुष्काळग्रस्त जाहीर करण्यासाठी आणि कर्जदार शेतकर्‍यांचे सावकारी कर्ज माफ करण्याच्या मुद्दय़ावर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींकडून कानाडोळा केला जात आहे. त्यामुळे जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना सरकारी मदतीचा ह्यदिलासाह्ण केव्हा मिळणार, असा प्रश्न निर्माण होत आहे. जिल्ह्यात यावर्षीही अत्यल्प पाऊस झाल्याने, दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली. जिल्ह्यातील लागवडीयोग्य सर्व ९९७ गावांची खरीप पिकांची सुधारित व अंतिम पैसेवारी ५0 पैशांपेक्षा कमी असल्याचे जिल्हाधिकार्‍यांकडून जाहीर करण्यात आल्याने, जिल्ह्यातील सर्व गावांमधील दुष्काळी परिस्थितीवर शिक्कामोर्तब झाले. असे असले तरी शासनामार्फत जाहीर करण्यात आलेल्या दुष्काळी गावांच्या यादीत नजरअंदाज पैसेवारीत ५0 पैशांपेक्षा कमी पैसेवारी असलेल्या जिल्ह्यातील केवळ ५५ गावांचा समावेश करण्यात आला आहे. जिल्ह्यातील उर्वरित ९४२ गावे सरकारमार्फत अद्यापही दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात आली नाहीत. शेतकर्‍यांच्या सावकारी कर्जमाफीचा मुद्दाही फसवा ठरत आहे. दुष्काळी परिस्थितीत परवानाधारक सावकारांकडून कर्ज घेतलेल्या शेतकर्‍यांचे कर्ज माफ करण्याचा निर्णय शासनामार्फत गतवर्षी घेण्यात आला; मात्र शासननिर्णयातील कार्यक्षेत्राच्या अटीमुळे जिल्ह्यातील कर्जदार ५६ हजार ३५२ शेतकर्‍यांपैकी वर्षभरात केवळ ५२ शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरले असून, उर्वरित कर्जदार शेतकर्‍यांना सरकारच्या सावकारी कर्जमाफी योजनेचा लाभ अद्याप मिळाला नाही. दुष्काळी परिस्थितीत जिल्ह्यातील शेतकरी संकटात सापडला असतानाच, ९४२ गावांमध्ये दुष्काळी परिस्थिती जाहीर करण्यासाठी आणि सावकारी कर्जमाफी योजनेचा शेतकर्‍यांना लाभ देण्याच्या मुद्दय़ावर जिल्ह्यातील आमदार-खासदार व लोकप्रतिनिधींकडून शासनदरबारी पाहिजे तसा पाठपुरावा करण्यात आला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना सरकारी मदतीचा 'दिलासा' केव्हा मिळणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.