शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थानात पाकिस्तान सीमेपासून १५ किमी दूर कोसळलेला ड्रोन सापडला; बीएसएफकडून चौकशी सुरु
2
तुर्कीनं फक्त मैत्रीसाठी केली नाही भारताविरोधात पाकिस्तानची मदत; खरा हेतू तर भलताच...
3
Rajnath Singh : "पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारुन मारलं, आम्ही त्यांचं कर्म पाहून त्यांना अद्दल घडवली"
4
ना गिल, ना पंत... सुनील गावसकर म्हणतात- 'हा' अनुभवी खेळाडू टीम इंडियाचा कसोटी कर्णधार हवा!
5
"आमचा पुरुषांवरचा विश्वास उडाला"; नवऱ्यांनी फसवलं, दोन मैत्रिणींनी एकमेकींशी लग्न केलं
6
दिल्ली कॅपिटल्सनं ६ कोटींचा डाव लावला त्यानं दुबईचं फ्लाइट पकडलं! PSL कनेक्शनमुळे तो IPL ला मुकणार?
7
५० हजार पगार, घराचे स्वप्न पूर्ण होईल का? की भाड्यानेच राहणे परवडेल...; असं आहे सोपं गणित
8
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सुप्रीम कोर्टाला विचारले १४ प्रश्न; नेमकं काय घडलं?
9
लष्करी जवानाकडे हेरॉईन सापडले; श्रीनगरहून पंजाबला करत होता तस्करी, अटकेमुळे खळबळ
10
हृदयद्रावक! डोक्यावरती अक्षता पडल्या अन् दुसऱ्याच दिवशी सकाळी नववधूला मृत्यूने गाठलं
11
पाकिस्तानी गर्लफ्रेंडला भेटणं भारतीय बॉयफ्रेंडच्या अंगाशी आलं! तुरुंगात कैद होऊन आता म्हणतोय...
12
शिखर धवनची कर्नल सोफिया कुरेशी यांच्यासाठी खास पोस्ट, म्हणाला- 'भारतीय मुस्लिमांना...'
13
तुम्ही भारतातूनही ऑनलाइन स्विस बँकेत खाते उघडू शकता; कशी असते प्रक्रिया? कोणते कागदपत्रे हवीत?
14
"आंबेडकर मालिकेच्या वेळेस साताऱ्यातून एक माणूस भेटायला आला अन्.." अभिनेत्याने सांगितला अंगावर काटा आणणारा किस्सा
15
Maharashtra Politics : डोनाल्ड ट्रम्प यांनाच कुलदैवत माना, गावागावात डोनाल्ड जत्रा भरवा; संजय राऊतांचा भाजपाला टोला
16
Mumbai: मेट्रो-३ च्या प्रवासात मोबाइलला 'नो नेटवर्क', प्रवाशांची उडते तारांबळ, तिकीट काढण्यासाठी मार्गदर्शक सूचना...
17
वेळ काय, तुम्ही बोलता काय...; कर्नल सोफिया यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या विजय शाहंना कोर्टाने फटकारलं
18
४० हजारांचं पॅकेज, ५ तासांची सर्जरी... हेअर ट्रान्सप्लांट करणाऱ्या अनुष्काबद्दल धक्कादायक खुलासे
19
तुर्कीच्या सफरचंदावर घातलेली बंदी पाकिस्तानींना झोंबली; पुण्याच्या सुयोग झेंडेंना धमक्यांचे फोनवर फोन
20
हेअर ट्रांसप्लांटमुळे दोघांचा मृत्यू; ही सर्जरी खरंच सुरक्षित आहे का? जाणून घ्या सविस्तर माहिती...

दुष्काळ अन् कर्जमाफीकडे लोकप्रतिनिधींचा कानाडोळा

By admin | Updated: January 15, 2016 02:05 IST

अकोला जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतक-यांना केव्हा मिळणार सरकारी मदतीचा 'दिलासा'?

संतोष येलकर/अकोला : खरीप पिकांची पैसेवारी ५0 पैशांपेक्षा कमी असल्याने जिल्ह्यातील सर्वच गावांमध्ये दुष्काळी परिस्थिती असताना सरकारमार्फत अद्यापही जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात आलेला नाही, तसेच परवानाधारक सावकारांकडून कर्ज घेतलेल्या जिल्ह्यातील ५६ हजारांवर कर्जदार शेतकर्‍यांना कर्जमाफी योजनेचा अद्यापही लाभ मिळाला नाही. दुष्काळी परिस्थितीत शेतकरी हवालदिल झाला असला तरी जिल्ह्यातील सर्व गावे दुष्काळग्रस्त जाहीर करण्यासाठी आणि कर्जदार शेतकर्‍यांचे सावकारी कर्ज माफ करण्याच्या मुद्दय़ावर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींकडून कानाडोळा केला जात आहे. त्यामुळे जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना सरकारी मदतीचा ह्यदिलासाह्ण केव्हा मिळणार, असा प्रश्न निर्माण होत आहे. जिल्ह्यात यावर्षीही अत्यल्प पाऊस झाल्याने, दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली. जिल्ह्यातील लागवडीयोग्य सर्व ९९७ गावांची खरीप पिकांची सुधारित व अंतिम पैसेवारी ५0 पैशांपेक्षा कमी असल्याचे जिल्हाधिकार्‍यांकडून जाहीर करण्यात आल्याने, जिल्ह्यातील सर्व गावांमधील दुष्काळी परिस्थितीवर शिक्कामोर्तब झाले. असे असले तरी शासनामार्फत जाहीर करण्यात आलेल्या दुष्काळी गावांच्या यादीत नजरअंदाज पैसेवारीत ५0 पैशांपेक्षा कमी पैसेवारी असलेल्या जिल्ह्यातील केवळ ५५ गावांचा समावेश करण्यात आला आहे. जिल्ह्यातील उर्वरित ९४२ गावे सरकारमार्फत अद्यापही दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात आली नाहीत. शेतकर्‍यांच्या सावकारी कर्जमाफीचा मुद्दाही फसवा ठरत आहे. दुष्काळी परिस्थितीत परवानाधारक सावकारांकडून कर्ज घेतलेल्या शेतकर्‍यांचे कर्ज माफ करण्याचा निर्णय शासनामार्फत गतवर्षी घेण्यात आला; मात्र शासननिर्णयातील कार्यक्षेत्राच्या अटीमुळे जिल्ह्यातील कर्जदार ५६ हजार ३५२ शेतकर्‍यांपैकी वर्षभरात केवळ ५२ शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरले असून, उर्वरित कर्जदार शेतकर्‍यांना सरकारच्या सावकारी कर्जमाफी योजनेचा लाभ अद्याप मिळाला नाही. दुष्काळी परिस्थितीत जिल्ह्यातील शेतकरी संकटात सापडला असतानाच, ९४२ गावांमध्ये दुष्काळी परिस्थिती जाहीर करण्यासाठी आणि सावकारी कर्जमाफी योजनेचा शेतकर्‍यांना लाभ देण्याच्या मुद्दय़ावर जिल्ह्यातील आमदार-खासदार व लोकप्रतिनिधींकडून शासनदरबारी पाहिजे तसा पाठपुरावा करण्यात आला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना सरकारी मदतीचा 'दिलासा' केव्हा मिळणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.