शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

१० हजार हेक्टरवर कोरड्यातच पेरणी; दुबार पेरणीचे संकट

By रवी दामोदर | Updated: June 28, 2023 18:00 IST

दमदार पावसाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा : सार्वाधिक पेरा कापसाचा!

अकोला: मृग, रोहिणी नक्षत्रात पावसाने हुलकावणी दिल्याने शेतकऱ्यांची आशा ‘आर्दा’वर होती. आर्दा नक्षत्राला सुरुवात होताच जिल्ह्यात मान्सूनची सर कोसळली. त्यात जून महिना संपत आल्याने काही शेतकऱ्यांनी मान्सून येणार या आशाने कोरड्यातच कपाशीची लागवड सुरू केली. सद्य:स्थितीत जिल्ह्यात ९ हजार ६११ हेक्टरवर क्षेत्रावर खरिपाची पेरणी उरकली असून, त्यात सार्वाधिक कपाशीची लागवड झाली आहे. आगामी दिवसात पाऊस न आल्यास पेरण्या उलटण्याची भीती असून, शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट घोंगावत आहे. पुरेसी ओल झाल्याशिवाय, तसेच ८० ते १०० मिमी पाऊस झाल्याशिवाय खरिपाची पेरणी करू नये, असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे.

कपाशीची ९ हजार ४६९ हेक्टरमध्ये लागवड

जिल्ह्यात आतापर्यंत ९ हजार ६११ हेक्टरमध्ये पेरणी आटोपली आहे. यामध्ये सर्वाधिक ९,४६९ हेक्टरमध्ये कपाशी, १३५ हेक्टरमध्ये सोयाबीन व ७ हेक्टरमध्ये तूरीची पेरणी झालेली आहे. त्यामध्ये सार्वाधिक पेरणी तेल्हारा व बार्शीटाकळी तालुक्यात झाली आहे.

९८ टक्के क्षेत्रावरील पेरण्या खोळंबल्या

मान्सून सक्रीय झाल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वार्तविला होता.  मात्र मंगळवार, बुधवार दिवस पावसाविना गेल्याने शेतकरी चिंतित सापडला आहे. आगामी दिवसात पाऊस न आल्यास पेरण्या उलटण्याची भीती निर्माण झाली आहे. आतापर्यंत सरासरी क्षेत्र ४ लाख ५६ हजार १५५ हेक्टरपैकी केवळ २ टक्के म्हणजे ९ हजार ६११ हेक्टरवर पेरणी आटोपली आहे. पावसाने खंड दिल्याने ९८ टक्के क्षेत्रावरील पेरण्या रखडल्या आहेत.

अशी झाली पीक निहाय पेरणी

पीक             पेरणी क्षेत्र (हेक्टर)ज्वारी             ००

तूर             ०७मूग             ००

उडीद             ००सोयाबीन             १३५

कापूस             ९,४६९----------------------------

एकूण             ९,६११

टॅग्स :FarmerशेतकरीRainपाऊस