शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

निवडणुकीच्या धामधुमीत अडकले दुष्काळी मदतीचे वाटप!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2019 12:17 IST

दुष्काळी मदतीची रक्कम शेतकºयांच्या बँक खात्यात जमा होणार तरी केव्हा, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

- संतोष येलकरअकोला : गतवर्षी दुष्काळ जाहीर करण्यात आलेल्या जिल्ह्यातील पाच तालुक्यांतील शेतकऱ्यांना चौथ्या टप्प्यातील दुष्काळी मदत वाटप करण्यासाठी ६१ कोटी ४९ लाख ७५ हजार रुपयांचा मदत निधी महिनाभरापूर्वी जिल्ह्यातील पाच तहसील कार्यालयांना वितरित करण्यात आला असला तरी, विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत दुष्काळी मदतीचे वाटप अडकले आहेत. त्यामुळे दुष्काळी मदतीची रक्कम शेतकºयांच्या बँक खात्यात जमा होणार तरी केव्हा, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.गतवर्षी शासनामार्फत जाहीर करण्यात आलेल्या दुष्काळी तालुक्यांच्या पहिल्या यादीत अकोला जिल्ह्यातील अकोला, बार्शीटाकळी, तेल्हारा, बाळापूर व मूर्तिजापूर या पाच तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला होता. दुष्काळग्रस्त पाच तालुक्यांतील शेतकºयांना मदत वाटप करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत १९९ कोटी रुपये मदत निधीची मागणी शासनाकडे करण्यात आली होती. त्यानुसार शासनामार्फत तीन टप्प्यांत १३७ कोटी ६१ लाख २ हजार ४५६ रुपयांचा मदत निधी प्राप्त झाला होता. उपलब्ध दुष्काळी मदत दुष्काळग्रस्त शेतकºयांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली. उर्वरित चौथ्या टप्प्यातील ६१ कोटी ४९ लाख ७५ हजार रुपयांची दुष्काळी मदत १० सप्टेंबर रोजी शासनामार्फत जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाली. उपलब्ध मदत १३ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत जिल्ह्यातील अकोला, बार्शीटाकळी, तेल्हारा, बाळापूर व मूर्तिजापूर या पाचही तहसील कार्यालयांना वितरित करण्यात आली. मदत निधी वितरित करण्यात आला असला तरी, विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत प्रशासन निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याने, दुष्काळी मदतीची रक्कम पाचही तालुक्यांतील शेतकºयांच्या बँक खात्यात अद्याप जमा झाली नाही. त्यामुळे दुष्काळी मदतीची रक्कम शेतकºयांच्या बँक खात्यात जमा होणार तरी केव्हा, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.तालुकानिहाय अशी वितरित करण्यात आली मदत!जिल्ह्यातील पाच तालुक्यांतील शेतकºयांसाठी ६१ कोटी ४९ लाख ७५ हजार रुपयांची दुष्काळी मदत संबंधित तहसील कार्यालयांना वितरित करण्यात आली. त्यामध्ये अकोला तालुका-१६ कोटी २५ लाख ७ हजार ५१७ रुपये, बार्शीटाकळी तालुका-१० कोटी १३ लाख ३१ हजार २७४ रुपये, तेल्हारा तालुका-९ कोटी ५९ लाख १२ हजार ७९७ रुपये, बाळापूर तालुका-१२ कोटी ५१ लाख ९१ हजार २४५ रुपये व मूर्तिजापूर तालुक्यातील शेतकºयांसाठी १२ कोटी ९९ लाख ६४ हजार ५१४ रुपयांची मदत वितरित करण्यात आली आहे.

 

दुष्काळी मदतीची रक्कम शेतकºयांच्या खात्यात जमा करण्यासाठी शेतकºयांच्या याद्या आणि मदत निधीचे धनादेश संबंधित बँकांमध्ये जमा करण्यात आले आहेत. मदतीची रक्कम शेतकºयांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे.-विजय लोखंडे,तहसीलदार, अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाagricultureशेतीFarmerशेतकरीMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019