शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

अकोला जिल्ह्यातील पाच तालुके दुष्काळाच्या छायेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2018 13:12 IST

- संतोष येलकर अकोला : पाऊस, आर्द्रता, भूजल पातळी व पेरणी क्षेत्रासंदर्भात संबंधित यंत्रणांकडून जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झालेल्या अहवालानुसार ...

- संतोष येलकरअकोला : पाऊस, आर्द्रता, भूजल पातळी व पेरणी क्षेत्रासंदर्भात संबंधित यंत्रणांकडून जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यातील पाच तालुक्यांत दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पाच तालुके दुष्काळाच्या छायेत असल्याचे वास्तव समोर आले आहे.यावर्षीच्या पावसाळ्यात गत १ जून ते ३० सप्टेंबर या कालावधीत जिल्ह्यात ७०१.६ मिलीमीटर पाऊस पडला असून, एकूण खरीप पेरणीच्या क्षेत्रापैकी ८९ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. जिल्ह्यातील सातही तालुक्यांत पडलेला पाऊस, जमिनीतील आर्द्रता, भूजल पातळी व एकूण पेरणीच्या क्षेत्रापैकी पेरणीचे प्रत्यक्ष क्षेत्र यासंदर्भात कृषी, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा आणि महसूल विभाग इत्यादी यंत्रणांमार्फत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे ११ सप्टेंबर रोजी अहवाल प्राप्त झाला. त्यानुसार जिल्ह्यातील सातही तालुक्यांत पडलेला पाऊस, आर्द्रता, भूजल पातळी आणि पेरणी क्षेत्राचे प्रमाण विचारात घेता, जिल्ह्यातील अकोट आणि पातूर हे दोन तालुके वगळता इतर पाच तालुक्यांत दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या पाचही तालुक्यांवर दुष्काळाची छाया असल्याचे वास्तव समोर येत आहे.दुष्काळाच्या छायेत असे आहेत पाच तालुके!पडलेला पाऊस, आर्द्रता, भूजल पातळी व खरीप पेरणी क्षेत्राचे प्रत्यक्ष प्रमाण लक्षात घेता, जिल्ह्यातील अकोला, बाळापूर, बार्शीटाकळी, तेल्हारा व मूर्तिजापूर इत्यादी पाच तालुक्यांत दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.पडलेला पाऊस, आर्द्रता, भूजल पातळी आणि एकूण खरीप पेरणीच्या क्षेत्रापैकी प्रत्यक्ष पेरणी क्षेत्राचे प्रमाण लक्षात घेता, जिल्ह्यातील अकोट व पातूर हे दोन तालुके वगळता इतर पाच तालुक्यांत दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.- राजेश खवले,निवासी उपजिल्हाधिकारी.

 

टॅग्स :Akolaअकोलाdroughtदुष्काळ