शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
4
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
5
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
6
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
7
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
8
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
9
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
10
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
11
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
12
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
13
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
14
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
15
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
16
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
17
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
18
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
19
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
20
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने घडविले १३ उद्योजक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 11:19 IST

Dr. Punjabrao Deshmukh Agricultural University : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथे ‘ॲग्री बिझनेस इंक्युबेशन सेंटर (राबी)’ची स्थापना करण्यात आली आहे.

ठळक मुद्देॲग्री बिझनेस इंक्युबेशन सेंटरच्या माध्यमातून १३ प्रशिक्षणार्थींना अर्थसाह्यऔरंगाबाद, नागपूर, अकोला, यवतमाळ, बुलडाणा या जिल्ह्यांतील लाभार्थींचा समावेश आहे.

- सागर कुटे

अकोला : शेतीपूरक उद्योगाला चालना देणे, कृषी क्षेत्रात तरुणांना स्वयंरोजगाराची संधी निर्माण करणे व कृषी आधारित नावीन्यपूर्ण कल्पनांना वाव देऊन त्यांचे उद्योगात रूपांतर करून व्यवसाय निर्मितीला चालना देण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात राज्यातील एकमेव ॲग्री बिझनेस इंक्युबेशन सेंटर सुरू करण्यात आले. या सेंटरच्या माध्यमातून निवड करून प्रशिक्षण दिले जात असून प्रशिक्षणार्थींना केंद्र सरकारद्वारे २५ लाख रुपयांपर्यंतचे अर्थसाह्य मिळत आहे. आतापर्यंत राज्यातील १३ जणांना अर्थसाह्य प्राप्त झाले आहे. कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय, राष्ट्रीय कृषी विकास योजना भारत सरकार नवी दिल्ली अंतर्गत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठअकोला येथे ‘ॲग्री बिझनेस इंक्युबेशन सेंटर (राबी)’ची स्थापना करण्यात आली आहे. हे इंक्युबेशन सेंटर (राबी) महाराष्ट्रातील युवा वर्गासाठी एक सुवर्णसंधी ठरत आहे. या योजनेंतर्गत नवउद्योजक व युवकांसाठी विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. यामध्ये नव्याने कृषी व कृषी आधारित उद्योग सुरुवात करण्यासाठी प्री-सीड स्टेज फंडिंग प्रोग्राम व असलेल्या ऊत्पादन/सेवा या उद्योगात रूपांतरित करण्यासाठी सीड स्टेज फंडिंग प्रोग्रामचे आयोजन केले जाते. कृषी व कृषी आधारित नावीन्यपूर्ण कल्पनांना उद्योगात रूपांतरित करण्यासाठी प्रशिक्षण देऊन पाच लाख रुपयांपर्यंतचे तसेच कृषी क्षेत्रातील अस्तित्वात असलेल्या उत्पादनांसाठी २५ लाख रुपयांपर्यंतचे आर्थिक साह्य पुरविणे या कार्यक्रमाचे मुख्य उद्दिष्ट आहे. या सेंटरमार्फत १३ जणांची निवड झाली आहे. यामध्ये औरंगाबाद, नागपूर, अकोला, यवतमाळ, बुलडाणा या जिल्ह्यांतील लाभार्थींचा समावेश आहे.

 

इंक्युबेशन सेंटरतर्फे मिळतात या सुविधा

 

या योजनेअंतर्गत निवड झालेल्या नवउद्योजकांना ॲग्री बिझनेस इंक्युबेशन सेंटरतर्फे आठ आठवड्यांचे प्रशिक्षण, विशेष तज्ज्ञांचे सविस्तर मार्गदर्शन, औद्योगिक आधार, उत्कृष्ट तांत्रिक मार्गदर्शन, इंक्युबेशन सुविधा, पायाभूत सुविधा, कृषी व व्यवसाय क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन या सुविधा पुरवण्यात येत आहेत.

 

तीन टप्प्यांत अर्थसाह्य

या सेंटरमार्फत निवड झालेल्या व्यक्तीला तीन टप्प्यांत अर्थसाह्य मिळते. पहिल्या टप्प्यात ४०, दुसऱ्या टप्प्यात ४० व तिसऱ्या टप्प्यात २० टक्के निधी मिळतो. त्यावेळी त्या व्यक्तीला पुढील वर्षभरात काय काम करणार असल्याची विचारणा केली जाते. यामध्ये काही अडचण आल्यास सेंटरमार्फत वेळोवेळी मार्गदर्शन केल्या जाते.

 

दुसऱ्या तुकडीत ३४ जणांचा समावेश

कृषी आधारित उद्योग उभा करण्यासाठी तीन सादरीकरण आवश्यक आहेत. पहिल्या तुकडीत १३ जणांची निवड झाल्यानंतर आता दुसऱ्या तुकडीत ३४ जणांची तिसऱ्या टप्प्यातील सादरीकरणासाठी निवड झाली आहे.

 

...अन्यथा मशनरी जप्तीची कारवाई

उद्योग उभा करताना प्रशिक्षणार्थी व्यक्तीने सांगितल्याप्रमाणे न केल्यास पुढील अर्थसाह्य थांबविता येते. याबाबत त्या व्यक्तीसोबत करार केला जातो. तसेच मशनरी जप्तीची कारवाईसुद्धा करण्यात येऊ शकते. ही कारवाई करण्याची वेळ येऊ नये, याकरिता सेंटरमार्फत वेळोवेळी मार्गदर्शन करण्यात येते.

 

आतापर्यंतच्या योजनांमध्ये ही योजना संजीवनी आहे. ग्रामीण भागातील शेतकरी व नवउद्योजक तरुणांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, याकरिता सेंटरमार्फत योग्य मार्गदर्शन केल्या जाईल.

डॉ. संतोष गहूकर, सीईओ व हेड, ॲग्री बिझनेस इंक्युबेशन सेंटर, डॉ. पंदेकृवि.

टॅग्स :Dr. Punjabrao Deshmukh Krushi Vidhyapithडॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठAkolaअकोला