शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
5
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
6
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
7
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
8
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
9
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
10
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
11
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
12
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
13
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
14
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
15
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
16
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
17
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
18
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
19
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे
20
डिंपल यादव यांच्याबद्दल वादग्रस्त विधान; मौलाना साजिद रशीदींना न्यूज चॅनेलच्या स्टुडिओमध्ये मारहाण

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने घडविले १३ उद्योजक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 11:19 IST

Dr. Punjabrao Deshmukh Agricultural University : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथे ‘ॲग्री बिझनेस इंक्युबेशन सेंटर (राबी)’ची स्थापना करण्यात आली आहे.

ठळक मुद्देॲग्री बिझनेस इंक्युबेशन सेंटरच्या माध्यमातून १३ प्रशिक्षणार्थींना अर्थसाह्यऔरंगाबाद, नागपूर, अकोला, यवतमाळ, बुलडाणा या जिल्ह्यांतील लाभार्थींचा समावेश आहे.

- सागर कुटे

अकोला : शेतीपूरक उद्योगाला चालना देणे, कृषी क्षेत्रात तरुणांना स्वयंरोजगाराची संधी निर्माण करणे व कृषी आधारित नावीन्यपूर्ण कल्पनांना वाव देऊन त्यांचे उद्योगात रूपांतर करून व्यवसाय निर्मितीला चालना देण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात राज्यातील एकमेव ॲग्री बिझनेस इंक्युबेशन सेंटर सुरू करण्यात आले. या सेंटरच्या माध्यमातून निवड करून प्रशिक्षण दिले जात असून प्रशिक्षणार्थींना केंद्र सरकारद्वारे २५ लाख रुपयांपर्यंतचे अर्थसाह्य मिळत आहे. आतापर्यंत राज्यातील १३ जणांना अर्थसाह्य प्राप्त झाले आहे. कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय, राष्ट्रीय कृषी विकास योजना भारत सरकार नवी दिल्ली अंतर्गत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठअकोला येथे ‘ॲग्री बिझनेस इंक्युबेशन सेंटर (राबी)’ची स्थापना करण्यात आली आहे. हे इंक्युबेशन सेंटर (राबी) महाराष्ट्रातील युवा वर्गासाठी एक सुवर्णसंधी ठरत आहे. या योजनेंतर्गत नवउद्योजक व युवकांसाठी विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. यामध्ये नव्याने कृषी व कृषी आधारित उद्योग सुरुवात करण्यासाठी प्री-सीड स्टेज फंडिंग प्रोग्राम व असलेल्या ऊत्पादन/सेवा या उद्योगात रूपांतरित करण्यासाठी सीड स्टेज फंडिंग प्रोग्रामचे आयोजन केले जाते. कृषी व कृषी आधारित नावीन्यपूर्ण कल्पनांना उद्योगात रूपांतरित करण्यासाठी प्रशिक्षण देऊन पाच लाख रुपयांपर्यंतचे तसेच कृषी क्षेत्रातील अस्तित्वात असलेल्या उत्पादनांसाठी २५ लाख रुपयांपर्यंतचे आर्थिक साह्य पुरविणे या कार्यक्रमाचे मुख्य उद्दिष्ट आहे. या सेंटरमार्फत १३ जणांची निवड झाली आहे. यामध्ये औरंगाबाद, नागपूर, अकोला, यवतमाळ, बुलडाणा या जिल्ह्यांतील लाभार्थींचा समावेश आहे.

 

इंक्युबेशन सेंटरतर्फे मिळतात या सुविधा

 

या योजनेअंतर्गत निवड झालेल्या नवउद्योजकांना ॲग्री बिझनेस इंक्युबेशन सेंटरतर्फे आठ आठवड्यांचे प्रशिक्षण, विशेष तज्ज्ञांचे सविस्तर मार्गदर्शन, औद्योगिक आधार, उत्कृष्ट तांत्रिक मार्गदर्शन, इंक्युबेशन सुविधा, पायाभूत सुविधा, कृषी व व्यवसाय क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन या सुविधा पुरवण्यात येत आहेत.

 

तीन टप्प्यांत अर्थसाह्य

या सेंटरमार्फत निवड झालेल्या व्यक्तीला तीन टप्प्यांत अर्थसाह्य मिळते. पहिल्या टप्प्यात ४०, दुसऱ्या टप्प्यात ४० व तिसऱ्या टप्प्यात २० टक्के निधी मिळतो. त्यावेळी त्या व्यक्तीला पुढील वर्षभरात काय काम करणार असल्याची विचारणा केली जाते. यामध्ये काही अडचण आल्यास सेंटरमार्फत वेळोवेळी मार्गदर्शन केल्या जाते.

 

दुसऱ्या तुकडीत ३४ जणांचा समावेश

कृषी आधारित उद्योग उभा करण्यासाठी तीन सादरीकरण आवश्यक आहेत. पहिल्या तुकडीत १३ जणांची निवड झाल्यानंतर आता दुसऱ्या तुकडीत ३४ जणांची तिसऱ्या टप्प्यातील सादरीकरणासाठी निवड झाली आहे.

 

...अन्यथा मशनरी जप्तीची कारवाई

उद्योग उभा करताना प्रशिक्षणार्थी व्यक्तीने सांगितल्याप्रमाणे न केल्यास पुढील अर्थसाह्य थांबविता येते. याबाबत त्या व्यक्तीसोबत करार केला जातो. तसेच मशनरी जप्तीची कारवाईसुद्धा करण्यात येऊ शकते. ही कारवाई करण्याची वेळ येऊ नये, याकरिता सेंटरमार्फत वेळोवेळी मार्गदर्शन करण्यात येते.

 

आतापर्यंतच्या योजनांमध्ये ही योजना संजीवनी आहे. ग्रामीण भागातील शेतकरी व नवउद्योजक तरुणांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, याकरिता सेंटरमार्फत योग्य मार्गदर्शन केल्या जाईल.

डॉ. संतोष गहूकर, सीईओ व हेड, ॲग्री बिझनेस इंक्युबेशन सेंटर, डॉ. पंदेकृवि.

टॅग्स :Dr. Punjabrao Deshmukh Krushi Vidhyapithडॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठAkolaअकोला