शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
3
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
4
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
5
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
6
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
7
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
8
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
9
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
10
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
11
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
12
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
13
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
14
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
15
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
16
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
17
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!
18
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
19
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : उद्धव ठाकरेंकडूनच कोल्हापूरच्या गादीचा अपमान, उदय सामंत यांचा आरोप
20
सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; जिवंत करण्यासाठी मृतदेह दोन दिवस गंगेच्या पाण्यात लटकवला...

रस्त्यावर भिक मागणाऱ्या मुलांना पैसे देवून शिक्षणापासून वंचित ठेवू नका! - विनोद राठोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2019 3:41 PM

शिक्षणापासून वंचित ठेवण्याला प्रोत्साहन देण्यासारखे असल्याचे मत शाळाबाह्य मुलांसाठी कार्य करणाºया सेव्ह बचपन चळवळीचे राज्य पदाधिकारी विनोद राठोड यांनी व्यक्त केले.

अकोला : रेल्वे स्थानक, बस स्थानक परिसरात अनेक मुले भिक मागतात. त्या मुलांना भिक देणे म्हणजे त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याला प्रोत्साहन देण्यासारखे असल्याचे मत शाळाबाह्य मुलांसाठी कार्य करणाºया सेव्ह बचपन चळवळीचे राज्य पदाधिकारी विनोद राठोड यांनी व्यक्त केले आहे. अकोला जिल्ह्यातील शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात सामील करून घेण्याकरिता सेव्ह बचपनच्यावतीने एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याकरिता राठोड अकोल्यात आले होते.  

तुमच्या जिल्हा परिषद शाळेत काय बदल घडविले? - मी अमरावती जिल्ह्यातील सालनापूर येथील जिल्हा परिषद शाळेत लक्षवेधी परसबाग विकसित केली आहे. या बागेत २१० प्रकारच्या भाज्यांचे उत्पादन घेतले जाते. संपूर्ण पिक सेंद्रिय पद्धतीने घेतल्या जाते. तसेच शाळेतील विद्यार्थ्यांना आठवड्यातील सहा दिवसांकरिता सहा वेगळे गणवेश देण्यात आले आहेत. यासोबतच दर्जेदार शिक्षण देण्यावर आमचा प्रमुख भर असतो. युनेस्कोने आमच्या शाळेची दखल घेतली आहे.  

 तुम्ही शाळाबाह्य मुलांना शिक्षण देण्याकरिता काय प्रयत्न केले? - आम्ही आतापर्यंत दीड हजारांपेक्षा जास्त शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले आहे. त्याकरिता आदिवासी भाग, विविध समाजाचे तांडे, पाडे, रेल्वे स्थानक, बस स्थानक परिसरात जाऊन पालकांना भेटून त्यांना शिक्षणाचे महत्व समजावून सांगितले. त्यानंतर मुलांना विविध शाळांमध्ये प्रवेश दिला. 

 सेव्ह बचपन चळवळ वाढविण्याकरिता काय प्रयत्न करीत आहात?- सेव्ह बचपन ही प्रामाणिक आणि निरंतर काम करणारी चळवळ आहे. या चळवळीत राज्यभरात अनेक शिक्षकांचा सहभाग आहे. मात्र, शिक्षकांसोबत यामध्ये समाजातील प्रत्येक घटकाचा सहभाग वाढावा, हा आमचा उद्देश आहे. शाळाबाह्य मुलांना शाळेत प्रवेश देण्यात येतो. मात्र, त्यांना मुलांना शिक्षण मिळत नाही. काही दिवस शाळेत गेल्यानंतर मुले नियमित शाळेत जात नाहीत. त्यांना चांगले शिक्षण मिळण्याची गरज आहे. सामान्य नागरिकांनी शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याची आपली जबाबदारी समजून कार्य करायला हवे.  

त्याकरिता सामान्य माणसाने काय करायला हवे?- सामान्य माणसाला कार्यालयात जाताना, बाजारात खरेदीसाठी जाताना भिक मागताना मुले दिसली किंवा कचरा - प्लॅस्टीक पन्नी वेचताना मुले दिसली तर त्यांच्याशी बोलून ते वास्तव्यास असलेल्या ठिकाणापासून जवळ असलेल्या शाळेत प्रवेश द्यायला हवा. या मुलांना शाळेत प्रवेश देण्याकरिता कोणतीही अडचण येत नाही. 

हे कार्य करताना तुम्हाला कोणत्या अडचणींचा सामना करावा लागला? - अनेक अडचणींचा सामना करावा लागला. ते राहत असलेल्या परिसरात किंवा गावात जावून त्यांना शाळा शिकण्याची विनंती केल्यावर त्यांच्या पालकांच्या रागाचा सामना करावा लागला. एकदा तर मुलांच्या पालकांनी मला चाकू दाखवून हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. दारू काढणाºया भागात जावूनही आम्ही मुलांच्या पालकांना समजावून शाळेत सहभागी करून घेतले आहे.  

टॅग्स :Akolaअकोलाinterviewमुलाखत