शहरं
Join us  
Trending Stories
1
काय म्हणावे याला...! कोलकातामध्ये SIR विरोधात मोर्चा काढला, दुसऱ्याच दिवशी ममता बॅनर्जींनी BLOकडून 'फॉर्म' स्वीकारला...
2
राहुल गांधींनी जिला 'ब्राझिलियन मॉडेल' म्हटलं, ती निघाली 'पिंकी'? काँग्रेसच्या मत चोरीच्या दाव्यानंतर, चकित करणारा खुलास!
3
इंदुरीकर यांच्या मुलीचा शाही साखरपुडा चर्चेत; एवढा खर्च कशासाठी?, महाराज म्हणाले...
4
"मी तीच रहस्यमयी महिला आहे..."; ब्राझीलच्या मॉडेलने केला भारतासाठी व्हिडिओ प्रसिद्ध 
5
"रस्ते चांगले असतील तर जास्त अपघात होतील"; बस अपघातावर भाजपा खासदाराचं वादग्रस्त विधान
6
“अजित पवार कायम उप असतात, त्यांना ‘अखंड उप भव’ हा आशीर्वाद”; उद्धव ठाकरेंचा खोचक टोला
7
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
8
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
9
Sensex Will Go Above 1 Lakh: वाईट काळ सरला..! पुढील वर्षी सेन्सेक्स गाठणार १ लाखांचा टप्पा, कोण म्हणालं असं?
10
यूएईकडून भारताला धोका? ६००० कोटींच्या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार दुबईतून गायब; सुप्रीम कोर्ट संतापले
11
प्रियकराने केली शिवीगाळ, वडिलांचा अपमान सहन न झालेल्या २० वर्षीय मुलीने उचललं टोकाचं पाऊल
12
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
13
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
14
प्रणित मोरे आज परत येतोय? 'बिग बॉस १९' मध्ये मोठा ट्विस्ट; सोशल मीडियावर चर्चांना उधाण
15
लर्निंग लायसन्सचे ऑडिट कधी होणार? 'फेसलेस' प्रणालीमध्ये गंभीर त्रुटी उघड तरीही विभाग गप्प
16
अखेर सूरज चव्हाणने दाखवला होणाऱ्या बायकोचा चेहरा! अंकिता वालावलकरच्या घरी झालं केळवण, पाहा व्हिडीओ
17
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
18
११ मेडिकल कॉलेजांत ‘कार्डियाक कॅथलॅब’; हृदयविकारावरील उपचार होणार सुलभ
19
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
20
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल

रक्तदान करण्यास घाबरू नका; गरजूंचे प्राण वाचवा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2020 16:56 IST

रक्तदात्यांनी न घाबरता गरजूंचे प्राण वाचविण्याची गरज आहे, असे आवाहन राज्य रक्तसंक्रमण परिषद व शासकीय रक्तपेढीतर्फे जागतिक रक्तदान दिनानिमित्त करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्ह्यातील कोरोनाचे संक्रमण दिवसेंदिवस वाढत असून, रक्तसंकलनावर त्याचा परिणाम होत आहे. परिणामी मार्च ते मे या तीन महिन्यात रक्तसाठ्यात मोठ्या प्रमाणात घट झाल्याने अनेक गंभीर रुग्णांना ऐनवेळी रक्त मिळणे अशक्य झाले आहे. अशा परिस्थितीत रक्तदात्यांनी न घाबरता गरजूंचे प्राण वाचविण्याची गरज आहे, असे आवाहन राज्य रक्तसंक्रमण परिषद व शासकीय रक्तपेढीतर्फे जागतिक रक्तदान दिनानिमित्त करण्यात आले.दरवर्षी एप्रिल व मे महिन्यामध्ये शाळा- महाविद्यालयांना सुटी असल्यामुळे तसेच नियमित रक्तदाते बाहेरगावी गेल्यामुळे रक्ताचा राज्यात तुटवडा भासतो. असे असले तरी रक्ताची मागणी मात्र कायम असते. त्यात भर म्हणजे यंदा सर्वत्र कोरोनाचे संक्रमण वाढत असल्याने शिबिरांच्या आयोजनावर मर्यादा आल्या आहेत; मात्र सुरक्षा व स्वच्छतेचे पालन करून तसेच रक्तदानाच्या ठिकाणी गर्दीचे व्यवस्थित नियमन करून रक्तदान शिबिरे आयोजित करण्याविषयी राज्य रक्त संक्रमण परिषदेने सूचना जारी केलेल्या आहेत. तथापि, रक्तदात्यांमध्ये रक्तदान करण्याविषयी भीती अथवा संभ्रम निर्माण झालेला आहे. प्रतिबंधक उपाय म्हणून गरजेशिवाय घराच्या बाहेर पडू नये व गर्दी करू नये हे खरे असले तरी रक्तदान हे गरजू रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी अत्यंत गरजेचे आहे.रक्तदान केल्यामुळे अथवा रक्त संक्रमणामुळे कोरोना विषाणूची लागण होत नाही, असे तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे सर्व सामाजिक, धार्मिक संस्थांनी रक्तदात्यांसाठी पुढे यावे. शिबिरे आयोजित करून गरजू रुग्णांसाठी रक्त संकलन करावे. इच्छुक रक्तदात्यांनी नजीकच्या रक्तपेढीत जाऊन रक्तदान करावे, असे आवाहन राज्य रक्त संक्रमण परिषदेने एका पत्राद्वारे केले आहे.

 

५ हजार रुग्णांना रक्ताची गरजपरिषदेच्या माहितीनुसार राज्यभरात दर दिवशी सुमारे ४,५०० ते ५ हजार गंभीर रुग्णांना रक्ताची गरज भासते. यामध्ये प्रामुख्याने तातडीच्या शस्त्रक्रियेसाठी, अपघातग्रस्तांसाठी व थॅलेसिमिया, हिमोफिलिया या रक्ताच्या आजाराने ग्रस्त रुग्णाचे प्राण वाचविण्यासाठी रक्ताची निकड भासते. अकोला शहरात येणाऱ्या अशा रुग्णांचे प्रमाणही अधिक आहे.

अकोल्यात शस्त्रक्रिया आणि अपघातग्रस्त रुग्णांसह रक्तासंबंधित आजाराचे रुग्ण मोठ्या संख्येने उपचारासाठी येतात. या रुग्णांना रक्ताची गरज भासते. त्यामुळे गरजू रुग्णांना नियमित रक्तपुरवठा करण्यासाठी ग्रामीण स्तरावर रक्तदान शिबिराच्या आयोजनासाठी रक्तदात्यांनी पुढाकार घ्यावा. यासाठी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आवश्यक उपाययोजना केल्या जात आहेत.- डॉ. श्रीराम चोपडे,रक्तपेढी प्रमुख, जीएमसी, अकोलाराज्यात दिवसाला

 

 

टॅग्स :AkolaअकोलाBlood Bankरक्तपेढी