शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

कंपन्यांचे दुकान भरण्यासाठी पीक विमा काढायचा काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:19 IST

अकोला : यंदा खरीप हंगामात पीक विम्यासाठी मुदत वाढवून दिल्यानंतरही जिल्ह्यात शेतकऱ्यांकडून म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. पीक ...

अकोला : यंदा खरीप हंगामात पीक विम्यासाठी मुदत वाढवून दिल्यानंतरही जिल्ह्यात शेतकऱ्यांकडून म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. पीक विमा भरल्यानंतर मदत मिळण्यासाठी लावण्यात येणारे विविध निकष आडकाठी बनत असल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी यंदा पीकविम्याकडे पाठ फिरविली आहे. मदत मिळत नसेल तर कंपन्यांचे दुकान भरण्यासाठी पीकविमा काढायचा काय, असा प्रश्न शेतकऱ्यांकडून विचारला जात आहे. दरवर्षी अतिवृष्टी, अवेळी पाऊस, किडींच्या हल्ल्यामुळे जिल्ह्यात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. गतवर्षीही सोयाबीन व कपाशीचे मोठे नुकसान झाले. या शेतकऱ्यांना पीकविम्याच्या माध्यमातून आर्थिक मदत देण्याची आवश्यकता होती; परंतु बहुतांश जणांना मदत मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी आहे. यावर्षीही केवळ १ लाख ३ हजार शेतकऱ्यांना पीकविमा देण्यात आला आहे. तर १ लाख ६० हजार शेतकऱ्यांना कुठलाही लाभ देण्यात आला नाही.

क्लेम सादर न झालेल्या शेतकऱ्यांनी तालुक्याचे कृषी कार्यालय किंवा जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयात अर्ज करावा. नुकसान झालेले शेतकरी विम्यापासून वंचित राहणार नाहीत. यंदाही शेतकऱ्यांनी पीकविम्यासाठी अर्ज केले आहेत.

- डॉ. कांताप्पा खोत, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, अकोला.

जिल्ह्यातील एकूण शेतकरी

२८०९८७

पीकविमा काढलेले शेतकरी

गतवर्षी २६३९९३

यावर्षी १९०५२४

एकूण खरीप क्षेत्र ४८३२९१

कापूस १५५६८६

सोयाबीन २१३६३७

तूर ५३१५८

मूग २१३३०

उडीद १४०४५

ज्वारी ७००३

यंदा ७० टक्के पीक विमा

गतवर्षी अतिवृष्टीने सोयाबीन व बोंडअळीने कपाशीचे नुकसान झाले. तरी भरपाई मिळाली नाही.

सतत हीच स्थिती असूनही मदत मिळत नाही. त्यामुळे यंदा बहुतांश शेतकऱ्यांनी पीकविमा भरला नाही.

मागीलवर्षीच्या तुलनेत यंदा ७० टक्के शेतकऱ्यांनी पीकविमा भरला. शेतकरीही पीकविम्याबाबत उदासीन आहेत.

गतवर्षीचा अनुभव वाईट

दरवर्षी ११ हजार रुपयांचा पीकविमा भरत असतो. मात्र, अद्यापही अपेक्षित लाभ मिळाला नाही. पिकांचे नुकसान झाल्यावरही निकषात बसत नसल्याचे सांगत मदतीपासून वंचित ठेवल्या जात आहे. यंदातरी नुकसान झाल्यास लाभ मिळेल या अपेक्षेने पीकविमा भरला आहे.

- संतोष टाले, शेतकरी, माझोड

पीकविम्याचे निकष न उमजणारे आहेत. मागीलवर्षी अतिवृष्टीने सोयाबीन व बोंडअळीने कपाशीचे नुकसान झाले; परंतु शासनाकडून कुठलीही मदत मिळाली नाही. दरवर्षी पीकविमा भरूनही मदत मिळण्याची श्वाश्वती नाही. त्यामुळे आता पीकविमा भरावा की नाही असा विचार सुरू आहे.

- सचिन दिवनाले, शेतकरी, गाजीपूर

शेती तज्ज्ञ म्हणतात...

पीकविमा म्हणजे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट काळात मदत मिळणे अपेक्षित आहे. परंतु मदत मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची नाराजी होत आहे. पीकविम्याचे निकष बदलणे गरजेचे आहे. कागदोपत्री पाहणी प्लॉट टाकल्या जातात. त्यामुळे मनमानी कारभार सुरू आहे.

- डाॅ.प्रकाश मानकर, चेअरमन, भारत कृषक समाज

- डाॅ.निलेश पाटील, युवा आघाडी विदर्भ प्रमुख, शेतकरी संघटना