शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
3
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
4
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
5
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
6
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
7
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
8
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
9
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
10
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
11
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
12
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
13
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
14
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
15
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
16
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
17
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
18
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
19
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
20
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  

आंबेडकरी राजकारण अन् फूट ठरलेलीच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2020 23:35 IST

दोन माजी आमदारांसह ४५ पदाधिकाºयांची भर पडली असून, आंबेडकरी चळवळ अन् फूट हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले.

ठळक मुद्देअ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी जवळपास प्रत्येक निवडणुकीत नवा प्रयोग केला.प्रत्येक प्रयोगातून त्यांनी चळवळीची व्याप्ती वाढवित नव्या चेहऱ्यांना संधी दिली. पुढे यापैकी अनेक चेहºयांनी आंबेडकरांना सोडून देत नवा राजकीय मार्ग चोखाळला.

- राजेश शेगोकारअकोला : सोशल इंजिनिअरिंगच्या माध्यमातून राजकारणात ‘अकोला पॅटर्न’ निर्माण करून प्रस्थापित राजकीय पक्षांना पर्याय देणाऱ्या अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी जवळपास प्रत्येक निवडणुकीत नवा प्रयोग केला. या प्रत्येक प्रयोगातून त्यांनी चळवळीची व्याप्ती वाढवित नव्या चेहऱ्यांना संधी दिली. हे चेहरे मोठे झाले अन् पुढे यापैकी अनेक चेहºयांनी आंबेडकरांना सोडून देत नवा राजकीय मार्ग चोखाळला. याच शृखंलेत परवा दोन माजी आमदारांसह ४५ पदाधिकाºयांची भर पडली असून, आंबेडकरी चळवळ अन् फूट हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले.२०१९ च्या लोकसभा निवडणुकांसाठी अ‍ॅड. आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडीची स्थापना अन् ‘एमआयएम’सोबत आघाडी केली. त्यावेळी अनेकांना अ‍ॅड. आंबेडकरांचा हा प्रयोग पटला नव्हता. लोकसभेत औरंगाबादची एक जागा एमआयएमने या प्रयोगाच्या भरवशावर जिंकली; मात्र राज्यात पाडापाडी करण्यातच हा प्रयोग यशस्वी झाला अन् खुद्द आंबेडकरांचा अकोला व सोलापुरातील पराभवही झाला. या पृष्ठभूमीवर विधानसभा निवडणुकीत एमआयएमला बाजूला झाल्यानंतर अ‍ॅड.आंबेडकरांनी नव्या दमाने निवडणुक लढविली. एकमेव विद्यमान आमदाराची उमेदवारी कापून अनेक ठिकाणी वंचितांना उमेदवारी देत नव्या राजकारणाची नांदी सुरू केलीमात्र त्यांचा हा प्रयोग सपशेल चुकला अन् त्यांच्या विचारांचा एकही आमदार निवडून आला नाही. हा सर्व मागोवा येथे उद्धृत करण्याचे कारण म्हणजे याच निवडणुकीनंतर नाराजीचे प्रमाण वाढत गेले अन् दहा-दहा वर्ष आमदार राहिलेल्या माजी आमदार हरिदास भदे आणि बळीराम सिरस्कार, वंचितच्या देखरेख समितीचे प्रमुख अर्जून सलगर, राज्याचे महासचिव नवनाथ पडळकर, सदानंद माळी, बापूसाहेब हटकर यांच्यासह राज्यभरातील ४५ पदाधिकाºयांनी पक्ष सोडला.खरं तर अशी फुट अ‍ॅड.आंबेडकरांसाठी नवीन नाही मखराम पवार, डॉ. दशरथ भांडे, रामदास बोडखे, भिमराव केराम, डॉ.सुभाष पटनायक, सुनिल मेश्राम, सुर्यभान ढोमणे, श्रावण इंगळे अशा अनेक नेत्यांनी त्यांची साथ सोडून नवे राजकारण केले.मात्र ज्यांनी ज्यांनी साथ सोडली त्यांच्या विरोधात अ‍ॅड.आंबेडकर कधीही बोलले नाहीत. त्यांना अनुल्लेखानेच मारले त्यामुळे यावेळीही त्यांनी भूमिका स्पष्ट केली नाही. दलित, बहूजन समाजासह अठरापगड जातींना वंचितच्या छताखाली एकत्र आणण्याचा त्यांचा प्रयत्न असतानाच पक्षातील काही नेते प्रस्थापित झाले होते. त्यामुळे नव्या चेहºयांनाही संधी देण्याच्या प्रयत्नात प्रस्थापितांनी बंडाचे बिजारोपण केले त्याचे झाडं राजीनाम्याच्या रूपाने उगविले. पक्षातील विश्वासहर्ता संपली असा आरोप राजीनाम्याकर्त्यांनी एकमुखाने केला आहे मात्र याच नेत्यांनी विधानसभा व अकोला जिल्हा परिषद निवडणुकीत पक्षाच्या विरोधात काम करून विश्वास गमावल्याचा आरोपही निकालानंतर जाहिरपणे झाला होता. त्यामुळे हे राजीमाने पक्षाने गांभिर्याने घेतल्याचे दिसत नाही उलट विश्वार्हता संपली होती की प्रस्थापित होऊ पाहत असलेल्यांची सद्दी संपली होती अशी नवी चर्चा या निमित्ताने सुरू झाली आहे. दूसरीकडे आपणच मोठी केलेली माणसं आपणास सोडून तरी का जातात? याचेही चिंतन या चळवळीने केले पाहिजे. अन्यथा प्रत्येक प्रयोगातून असे अनेक मोती गळत राहतील.

 

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीHaridas Bhadeहरीदास भदेBaliram Siraskarबळीराम सिरस्कारPoliticsराजकारण