शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
2
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
3
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
4
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
5
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
6
"पु.ल. देशपांडेंनी मला बघून विचारलं...", आठ वर्षांच्या सचिन पिळगावकरांचा आणखी एक किस्सा
7
एकनाथ खडसेंचा जावई रेव्ह पार्टीत रंगेहाथ सापडला, तरी सुषमा अंधारे म्हणतात...
8
पुण्यातील रेव्ह पार्टीत सापडलेले खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर नेमका काय व्यवसाय करतात?
9
Girish Mahajan : रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंच्या पतीला अटक; गिरीश महाजन म्हणतात, "नाथाभाऊंनी जावईबापुंना..."
10
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
11
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
12
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
13
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
14
"निलेश साबळे आणि भाऊ कदम हवे होते...", नवीन 'चला हवा येऊ द्या'च्या पहिल्या एपिसोडनंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया
15
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर
16
सोने ₹३२,००० वरून थेट १ लाखांवर! गेल्या ६ वर्षात २००% वाढ, पुढील ५ वर्षात 'इतकं' महाग होणार!
17
रात्री १२ वाजता सलमान खानची पोस्ट, म्हणाला, "बाबांचं आधीच ऐकलं असतं तर..."
18
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
19
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
20
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा

आंबेडकरी राजकारण अन् फूट ठरलेलीच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2020 23:35 IST

दोन माजी आमदारांसह ४५ पदाधिकाºयांची भर पडली असून, आंबेडकरी चळवळ अन् फूट हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले.

ठळक मुद्देअ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी जवळपास प्रत्येक निवडणुकीत नवा प्रयोग केला.प्रत्येक प्रयोगातून त्यांनी चळवळीची व्याप्ती वाढवित नव्या चेहऱ्यांना संधी दिली. पुढे यापैकी अनेक चेहºयांनी आंबेडकरांना सोडून देत नवा राजकीय मार्ग चोखाळला.

- राजेश शेगोकारअकोला : सोशल इंजिनिअरिंगच्या माध्यमातून राजकारणात ‘अकोला पॅटर्न’ निर्माण करून प्रस्थापित राजकीय पक्षांना पर्याय देणाऱ्या अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी जवळपास प्रत्येक निवडणुकीत नवा प्रयोग केला. या प्रत्येक प्रयोगातून त्यांनी चळवळीची व्याप्ती वाढवित नव्या चेहऱ्यांना संधी दिली. हे चेहरे मोठे झाले अन् पुढे यापैकी अनेक चेहºयांनी आंबेडकरांना सोडून देत नवा राजकीय मार्ग चोखाळला. याच शृखंलेत परवा दोन माजी आमदारांसह ४५ पदाधिकाºयांची भर पडली असून, आंबेडकरी चळवळ अन् फूट हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले.२०१९ च्या लोकसभा निवडणुकांसाठी अ‍ॅड. आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडीची स्थापना अन् ‘एमआयएम’सोबत आघाडी केली. त्यावेळी अनेकांना अ‍ॅड. आंबेडकरांचा हा प्रयोग पटला नव्हता. लोकसभेत औरंगाबादची एक जागा एमआयएमने या प्रयोगाच्या भरवशावर जिंकली; मात्र राज्यात पाडापाडी करण्यातच हा प्रयोग यशस्वी झाला अन् खुद्द आंबेडकरांचा अकोला व सोलापुरातील पराभवही झाला. या पृष्ठभूमीवर विधानसभा निवडणुकीत एमआयएमला बाजूला झाल्यानंतर अ‍ॅड.आंबेडकरांनी नव्या दमाने निवडणुक लढविली. एकमेव विद्यमान आमदाराची उमेदवारी कापून अनेक ठिकाणी वंचितांना उमेदवारी देत नव्या राजकारणाची नांदी सुरू केलीमात्र त्यांचा हा प्रयोग सपशेल चुकला अन् त्यांच्या विचारांचा एकही आमदार निवडून आला नाही. हा सर्व मागोवा येथे उद्धृत करण्याचे कारण म्हणजे याच निवडणुकीनंतर नाराजीचे प्रमाण वाढत गेले अन् दहा-दहा वर्ष आमदार राहिलेल्या माजी आमदार हरिदास भदे आणि बळीराम सिरस्कार, वंचितच्या देखरेख समितीचे प्रमुख अर्जून सलगर, राज्याचे महासचिव नवनाथ पडळकर, सदानंद माळी, बापूसाहेब हटकर यांच्यासह राज्यभरातील ४५ पदाधिकाºयांनी पक्ष सोडला.खरं तर अशी फुट अ‍ॅड.आंबेडकरांसाठी नवीन नाही मखराम पवार, डॉ. दशरथ भांडे, रामदास बोडखे, भिमराव केराम, डॉ.सुभाष पटनायक, सुनिल मेश्राम, सुर्यभान ढोमणे, श्रावण इंगळे अशा अनेक नेत्यांनी त्यांची साथ सोडून नवे राजकारण केले.मात्र ज्यांनी ज्यांनी साथ सोडली त्यांच्या विरोधात अ‍ॅड.आंबेडकर कधीही बोलले नाहीत. त्यांना अनुल्लेखानेच मारले त्यामुळे यावेळीही त्यांनी भूमिका स्पष्ट केली नाही. दलित, बहूजन समाजासह अठरापगड जातींना वंचितच्या छताखाली एकत्र आणण्याचा त्यांचा प्रयत्न असतानाच पक्षातील काही नेते प्रस्थापित झाले होते. त्यामुळे नव्या चेहºयांनाही संधी देण्याच्या प्रयत्नात प्रस्थापितांनी बंडाचे बिजारोपण केले त्याचे झाडं राजीनाम्याच्या रूपाने उगविले. पक्षातील विश्वासहर्ता संपली असा आरोप राजीनाम्याकर्त्यांनी एकमुखाने केला आहे मात्र याच नेत्यांनी विधानसभा व अकोला जिल्हा परिषद निवडणुकीत पक्षाच्या विरोधात काम करून विश्वास गमावल्याचा आरोपही निकालानंतर जाहिरपणे झाला होता. त्यामुळे हे राजीमाने पक्षाने गांभिर्याने घेतल्याचे दिसत नाही उलट विश्वार्हता संपली होती की प्रस्थापित होऊ पाहत असलेल्यांची सद्दी संपली होती अशी नवी चर्चा या निमित्ताने सुरू झाली आहे. दूसरीकडे आपणच मोठी केलेली माणसं आपणास सोडून तरी का जातात? याचेही चिंतन या चळवळीने केले पाहिजे. अन्यथा प्रत्येक प्रयोगातून असे अनेक मोती गळत राहतील.

 

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीHaridas Bhadeहरीदास भदेBaliram Siraskarबळीराम सिरस्कारPoliticsराजकारण