शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
4
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
5
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
6
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
7
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
8
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
9
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
10
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
11
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
12
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
13
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
14
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
15
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
16
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
17
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
18
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
19
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
20
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?

मुख्य रस्त्यालगत खाेदला खड्डा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:45 IST

अकाेला : जुने शहरातील श्रीवास्तव चाैकात विद्युत वाहिनीच्या कामासाठी महिनाभरापूर्वी मुख्य रस्त्यालगत खड्डा खाेदण्यात आला. आजपर्यंतही हा खड्डा बुजविण्यात ...

अकाेला : जुने शहरातील श्रीवास्तव चाैकात विद्युत वाहिनीच्या कामासाठी महिनाभरापूर्वी मुख्य रस्त्यालगत खड्डा खाेदण्यात आला. आजपर्यंतही हा खड्डा बुजविण्यात आला नसून यामुळे वाहनचालकांच्या जिवाला धाेका निर्माण झाला आहे. याप्रकाराची मनपाच्या पश्चिम झाेन कार्यालयाने दखल घेऊन हा खड्डा तातडीने बुजविण्याची मागणी स्थानिक रहिवाशांकडून केली जात आहे.

काेराेनामुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण

अकाेला : केंद्र शासनाच्या निर्देशानुसार राज्य शासनाने इयत्ता ९वी ते १२वी पर्यंतचे वर्ग सुरू केले. परंतु काेराेनाचा वाढत चाललेला प्रादुर्भाव पाहता पालकांमध्ये भीती व धास्तीचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसत आहे. पाल्यांकडून फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करणे शक्य नसल्यामुळे काेराेनाची शक्यता बळावली आहे.

वन्यप्राण्यांमुळे तुरीचे नुकसान

अकाेला : तालुक्यातील भाैरद, डाबकी, अहमदपूर ताकाेडा, खडकी आदी भागात शेतांमध्ये वन्यप्राण्यांनी हैदाेस घातला आहे. यंदा हरभरा, तुरीचे उत्पादन अपेक्षेनुसार हाेइल, असा शेतकऱ्यांचा अंदाज असतानाच रात्रीच्या सुमारास वन्यप्राणी शेतात घुसून पिकांची नासाडी करीत आहेत. वनविभागाने बंदाेबस्त करण्याची मागणी हाेत आहे.

दिवसा सलग वीजपुरवठा द्या !

अकाेला : खरीप हंगामातील नुकसान रब्बी हंगामात भरून निघेल, या आशेतून शेतकऱ्यांनी गहू, हरभरा, कांदा आदी पिकांची माेठ्या प्रमाणात पेरणी केली. परंतु महावितरण कंपनीकडून रात्री विद्युत पुरवठा केला जात असून, रात्री शेतकऱ्यांच्या जिवाला धाेका आहे. त्यामुळे वीज कंपनीने दिवसा सलग वीजपुरवठा देण्याची मागणी हाेत आहे.

परराज्यातून मेंढपाळ दाखल

अकाेला : हिवाळ्यात हाेताच परराज्यांतील मेंढपाळ जिल्ह्यात दाखल झाले आहेत. विविध शेतांमध्ये मेंढपाळांनी कुटुंबासहित बस्तान मांडल्याचे पहावयास मिळते. किमान महिना दाेन महिना मुक्काम करणाऱ्या मेंढ्यांमुळे जमिनीची सुपिकता वाढते, असा शेतकऱ्यांकडून दावा केला जाताे.

वाशिम बायपास चाैकात अंधार

अकाेला : शहरातील वाशिम बायपास चाैक ते थेट बाळापूर नाक्यापर्यंत रस्त्याच्या दुभाजकामधील एलइडी पथदिवे मागील चार महिन्यांपासून बंद पडले आहेत. राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम टप्प्याटप्प्याने पूर्ण हाेत असले तरी बांधकाम झालेल्या रस्त्यावर पथदिवे लावण्यात आले नाहीत. त्यामुळे वाशिम बायपास चाैकात अंधाराचे साम्राज्य आहे.

मुख्य नाल्यांची साफसफाईच नाही

अकाेला : शहरातील मुख्य नाल्यांच्या साफसफाईकडे महापालिकेच्या आराेग्य व स्वच्छता विभागाने दुर्लक्ष केल्यामुळे नाले घाण व कचऱ्याने तुडुंब भरली आहेत. यामुळे सांडपाणी वाहून जात नसल्याने त्यामध्ये डासांची पैदास झाली असून, दुर्गंधी पसरली आहे. याप्रकाराकडे नगरसेवकांकडूनही कानाडाेळा केला जात आहे.

व्हॉल्व्ह नादुरुस्त; पाण्याचा अपव्यय

अकाेला : रेल्वे स्टेशन चाैकात महापालिकेचे दाेन जलकुंभ आहेत. यापैकी एका जलकुंभातून अकाेटफैल परिसराला पाणीपुरवठा केला जाताे. अकाेटफैल भागातील उड्डाणपुलालगतच्या भागात व्हाॅल्व्ह नादुरुस्त झाल्याने याठिकाणी पाण्याचा माेठ्या प्रमाणात अपव्यय हाेत आहे. याकडे मनपाच्या जलप्रदाय विभागाने लक्ष देण्याची मागणी हाेत आहे.

जलकुंभाचा परिसर जलमय

अकाेला : जुने शहरातील हरिहरपेठमध्ये मनपाच्या जलकुंभातून सातत्याने पाण्याचा विसर्ग हाेताे. पाण्याच्या आउटलेटमधून माेठ्या प्रमाणात पाणी वाया जात असल्याने जलकुंभाचा परिसर जलमय झाला आहे. पाण्याचा अपव्यय थांबवण्यासाठी प्रभागातील शिवसेनेचे नगरसेवक व जलप्रदाय विभाग पुढाकार घेईल का? असा सवाल उपस्थित झाला आहे.

सिमेंट रस्त्यांची चाळण

अकाेला : शहरातील सर्वाधिक वर्दळीचा असलेल्या मुख्य पाेस्ट ऑफिस ते सिव्हिल लाइन चाैकापर्यंतच्या सिमेंट रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. रस्त्याच्या मधाेमध भलेमाेठे खड्डे पडल्याने खड्डा चुकविताना वाहनचालकांची कसरत हाेत आहे. अवघ्या तीन वर्षांत या रस्त्याची दुरवस्था झाली आहे.