शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

अकोला जिल्ह्यात अडीच महिन्यांत केवळ १९ हजार शेतकऱ्यांना कर्ज वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2018 15:13 IST

अकोला : खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटपाचे काम गत १ एप्रिलपासून बँकांमार्फत सुरू करण्यात आले; मात्र १४ जूनपर्यंत अडीच महिन्यांच्या जिल्ह्यातील केवळ १९ हजार ६५१ शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप करण्यात आले.

ठळक मुद्देजिल्ह्यातील शेतकऱ्यांना १ हजार ३३ कोटी ४८३ रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट जिल्हा प्रशासनामार्फत निश्चित करण्यात आले आहे.जिल्ह्यातील एकूण खातेदार तीन लाख शेतकऱ्यांपैकी केवळ १९ हजार ६५१ शेतकºयांना १७९ कोटी ५५ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले. आदेश-निर्देश दिल्यानंतरही १४ जूनपर्यंत जिल्ह्यातील पीक कर्ज वाटपाचे प्रमाण केवळ १३ टक्क्यांवरच असल्याची स्थिती आहे.

- संतोष येलकरअकोला : खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटपाचे काम गत १ एप्रिलपासून बँकांमार्फत सुरू करण्यात आले; मात्र १४ जूनपर्यंत अडीच महिन्यांच्या जिल्ह्यातील केवळ १९ हजार ६५१ शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप करण्यात आले. खरीप पेरण्या तोंडावर असल्या तरी जिल्ह्यात पीक कर्ज वाटपाचे प्रमाण पुढे सरकत नसल्याची बाब समोर येत आहे.यावर्षीच्या खरीप हंगामात अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना १ हजार ३३ कोटी ४८३ रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट जिल्हा प्रशासनामार्फत निश्चित करण्यात आले आहे. गत १ एप्रिलपासून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकसह राष्ट्रीयीकृत बँका व व्यापारी बँकांमार्फत पीक कर्ज वाटपाची प्रक्रिया सुरू करण्यात आली. पावसाळा सुरू झाला असून, खरीप पेरण्या तोंडावर आल्या; मात्र बँकांमार्फत पीक कर्जाचे वाटप संथ गतीने सुरू असल्याने गत अडीच महिन्यांच्या कालावधीत अकोला जिल्ह्यातील एकूण खातेदार तीन लाख शेतकऱ्यांपैकी केवळ १९ हजार ६५१ शेतकऱ्यांना १७९ कोटी ५५ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले. पीक कर्ज वाटपाचे प्रमाण जलद गतीने पुढे सरकत नसल्याने खरीप पेरण्यांपूर्वी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक कर्जाचा लाभ मिळणार की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

आदेश-निर्देशानंतरही पीक कर्ज वाटप १३ टक्क्यावरच!जिल्ह्यात पीक कर्ज वाटपाचे प्रमाण अत्यल्प असल्याच्या पृष्ठभूमीवर कर्जमाफीचा लाभ मिळालेल्या शेतकºयांसह सर्व पात्र शेतकºयांना तातडीने पीक कर्जाचे वाटप करून, कर्ज वाटपाचे देण्यात आलेले उद्दिष्ट पूर्ण करण्याचा आदेश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी जिल्ह्यातील बँकांना दिला. कर्ज वाटपात टाळाटाळ करणाऱ्या बँकांच्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही जिल्हाधिकाºयांनी दिला; परंतु वारंवार आदेश-निर्देश दिल्यानंतरही १४ जूनपर्यंत जिल्ह्यातील पीक कर्ज वाटपाचे प्रमाण केवळ १३ टक्क्यांवरच असल्याची स्थिती आहे.

पीक कर्ज वाटपाचे असे आहे वास्तव!-कर्ज वाटपाचे उद्दिष्ट :        १ हजार ३३ कोटी ४८३ रुपये-१४ जूनपर्यत कर्ज वाटप :       १७९ कोटी ५५ लाख रुपये-कर्ज वाटपाची टक्केवारी :       १३ टक्के-कर्ज वाटप केलेले शेतकरी :         १९ हजार ६५१पीक कर्ज वाटपाच्या उद्दिष्टपूर्तीवर प्रश्नचिन्ह!खरीप हंगामासाठी पेरणी सुरू होण्यापूर्वी शेतकºयांना पीक कर्ज मिळणे आवश्यक आहे; परंतु पावसाळा सुरू झाला असून, पावसाने दमदार हजेरी लावल्यानंतर जिल्ह्यात खरीप पेरण्या सुरू होणार आहेत.खरीप पेरण्या तोंडावर असताना आतापर्यंत केवळ १३ टक्के पीक कर्जाचे वाटप करण्यात आल्याने, यावर्षी जिल्ह्यात खरीप पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण होणार की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाFarmerशेतकरीbankबँकagricultureशेती