शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

पालकमंत्र्यांसह जिल्हा प्रशासन शेतात; करपलेल्या पिकांची पाहणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2019 13:34 IST

पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्यासह जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी आयुष प्रसाद यांनी थेट शेतात भेट देऊन पीक परिस्थिती जाणून घेतली.

अकोला: जिल्ह्यात तुरळक पाऊस झाल्यामुळे अनेक भागातील पिके करपली आहेत. अपुऱ्या पावसामुळे जमिनीत चार ते पाच इंचापर्यंत ओलावा असून, चार-पाच दिवसात पाऊस न आल्यास पिके जास्त दिवस तग धरू शकणार नाही, अशी स्थिती आहे. अकोला तालुक्यातील कौलखेड जहागीर, जांभा, पळसो व दहीगाव गावंडे गावांच्या शिवारात मंगळवारी पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्यासह जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी आयुष प्रसाद यांनी थेट शेतात भेट देऊन पीक परिस्थिती जाणून घेतली.सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या जनता तक्रार निवारण दिनामध्ये अकोला तालुक्यातील कौलखेड जहागीर येथील सरपंच, उपसरपंच यांच्या नेतृत्वाखालील गावकऱ्यांनी चालू हंगामामध्ये शेतकºयांनी पेरणी केली असून, पावसाअभावी पिके करपली असल्याचे निवेदन देऊन प्रत्यक्ष पाहणी करण्याची विनंती केली होती. त्या विनंतीनुसार २३ जुलै रोजी पालकमंत्र्यांसह अधिकाºयांनी अकोला तालुक्यातील कौलखेड जहागीर, जांभा, पळसो व दहीगाव गावंडे या गावातील शेत शिवाराला भेट दिली.

कौलखेड जहागीर येथील विजय गावंडे, पूर्णाजी तायडे यांच्या शेतात प्रत्यक्ष भेट देऊन कपाशी व सोयाबीन पिकाची पाहणी केली. या भागात तुरळक पाऊस झाल्यामुळे या भागातील पिके अपुºया पावसामुळे काही ठिकाणी करपली असल्याचे निदर्शनास आले आहे. यावेळी त्यांच्या समवेत उपसरपंच विनायकराव तायडे, डॉ. पुरुषोत्तम तायडे, प्रदीप तायडे, अनिल तायडे, निर्मला गावंडे, आशा गावंडे, मनोज तायडेसह इतर ग्रामस्थ होते.जांभा येथील गणेश ठोकळ यांच्या शेतात कपाशी पिकाची प्रत्यक्ष भेट देऊन पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी पाहणी केली. या भागातही थोड्या अधिक प्रमाणात तशीच परिस्थिती आहे. यावेळी पालकमंत्री यांच्या समवेत जांभा येथील विनोद ठोकळ, संतोष मानकर, श्रीकांत चिटके यांची उपस्थिती होती. त्यानंतर पालकमंत्री यांनी पळसो येथील अकुंश बढे यांच्या शेतात भेट दिली तसेच पळसो येथील महिला बचत गटाच्या महिलांशी पालकमंत्री यांनी चर्चा केली. दहीगाव गावंडे येथील विजय गावंडे यांच्या शेताला भेट दिली. यावेळी पळसो येथील दत्ता बोर्ड, महेंद्र काळे, अरुण चौधरी, नंदा लाडे आदीसह ग्रामस्थांची व दहीगाव गावंडे येथील पांडुरंग गावंडेसह इतर ग्रामस्थांची उपस्थिती होती. 

 

टॅग्स :Dr. Ranjit patilडॉ. रणजित पाटीलAkolaअकोलाagricultureशेतीFarmerशेतकरी