शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
3
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
4
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
5
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
6
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
7
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
8
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
9
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
10
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
11
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
12
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
13
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
14
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
15
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
16
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
17
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
18
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
19
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
20
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या

बेइमानांचे सरकार जास्त काळ टिकणार नाही - देवेंद्र फडणवीस  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2020 18:09 IST

भाजप आणि मतदारांसोबत विश्वासघात करून तयार झालेले ते सरकार आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले

अकोला : विधानसभा निवडणुकीनंतर सत्ता स्थापनेसाठी राज्यात आक्रीत घडल आहे. महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेने जनतेचा कौल नाकारून पराभूत झालेल्या दोन पक्षांच्या सोबतीने सरकार स्थापन केले. हा प्रकार बेइमानीचा आहे. सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ हा प्रकार चालणार नाही, असे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी दगडपारवा येथील प्रचार सभेत सांगितले. यावेळी त्यांनी विविध मुद्यावर त्यांनी महाआघाडी सरकारचा समाचार घेतला.जिल्हा परिषद, पंचायत समित्या निवडणूकीसाठी शनिवारी पहिली सभा अकोला जिल्ह्यातील दगडपारवा येथे पार पडली. यावेळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात, माजी मंत्री डॉ. रणजित पाटील यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी मंचावर उपस्थित होते.पुढे बोलताना फडणवीस यांनी विधानसभा निवडणूकीनंतर जनतेच्या कौलानुसार भाजप-सेनेचे सरकार स्थापन होणे क्रमप्राप्त होते. मात्र, शिवसेनेने वेगळाच इतिहास घडवला. स्वार्थासाठी कोणी काहीही करू शकते. हेच त्यातून दाखवून दिले. जनतेने हरवलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेऊन सत्ता स्थापन केली. त्याचं सरकार जनतेच्या मनातल नाही. भाजप आणि मतदारांसोबत विश्वासघात करून तयार झालेले ते सरकार आहे, असेही ते म्हणाले. भारताचा इतिहासात बेइमानीने मिळवलेले राज्य कधीच दिर्घकाळ चालले नाही. ते सहा महिन्यातच लयास गेल्याची उदाहरणे आहेत. त्यामुळेच आधी सत्ता स्थापन करणे, त्यानंतर मंत्रीपद वाटप, मंत्र्यांना खातेवाटप करण्यात कमालीचा विलंब लागत आहे. त्याचवेळी कॅबिनेटची मागणी असताना राज्यमंत्री पद दिल्याने नाराज असलेल्या अब्दुल सत्तार यांनी आजच राजीनामा दिला. ही बाब सरकार अधिक चालणार नसल्याचे संकेत आहेत, असेही ते म्हणाले. प्रास्ताविक आमदार हरिष पिंपळे यांनी केले.- कर्जमाफी, दुष्काळी मदत, शिवभोजनातून सरकार तोंडघशीसात-बारा कोरा करण्याचे आश्वासन देणाऱ्या सरकारने कर्जमाफी करताना शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. शासन निर्णयातील अटी व शर्तींमुळे शेतकºयांना प्रत्यक्ष लाभ मिळणारच नसल्याचेही फडणवीस म्हणाले. बांधावर जाऊन २५ हजार रुपये मदत देण्याची घोषणा केल्यानंतर त्याची पूर्तताही केली नाही. तर शिवभोजनातून किती लोकांची भूक शमवली जाणार, त्यातूनही गरिबांची थट्टाच होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाAkolaअकोला