शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

बेइमानांचे सरकार जास्त काळ टिकणार नाही - देवेंद्र फडणवीस  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2020 18:09 IST

भाजप आणि मतदारांसोबत विश्वासघात करून तयार झालेले ते सरकार आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले

अकोला : विधानसभा निवडणुकीनंतर सत्ता स्थापनेसाठी राज्यात आक्रीत घडल आहे. महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेने जनतेचा कौल नाकारून पराभूत झालेल्या दोन पक्षांच्या सोबतीने सरकार स्थापन केले. हा प्रकार बेइमानीचा आहे. सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ हा प्रकार चालणार नाही, असे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी दगडपारवा येथील प्रचार सभेत सांगितले. यावेळी त्यांनी विविध मुद्यावर त्यांनी महाआघाडी सरकारचा समाचार घेतला.जिल्हा परिषद, पंचायत समित्या निवडणूकीसाठी शनिवारी पहिली सभा अकोला जिल्ह्यातील दगडपारवा येथे पार पडली. यावेळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात, माजी मंत्री डॉ. रणजित पाटील यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी मंचावर उपस्थित होते.पुढे बोलताना फडणवीस यांनी विधानसभा निवडणूकीनंतर जनतेच्या कौलानुसार भाजप-सेनेचे सरकार स्थापन होणे क्रमप्राप्त होते. मात्र, शिवसेनेने वेगळाच इतिहास घडवला. स्वार्थासाठी कोणी काहीही करू शकते. हेच त्यातून दाखवून दिले. जनतेने हरवलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेऊन सत्ता स्थापन केली. त्याचं सरकार जनतेच्या मनातल नाही. भाजप आणि मतदारांसोबत विश्वासघात करून तयार झालेले ते सरकार आहे, असेही ते म्हणाले. भारताचा इतिहासात बेइमानीने मिळवलेले राज्य कधीच दिर्घकाळ चालले नाही. ते सहा महिन्यातच लयास गेल्याची उदाहरणे आहेत. त्यामुळेच आधी सत्ता स्थापन करणे, त्यानंतर मंत्रीपद वाटप, मंत्र्यांना खातेवाटप करण्यात कमालीचा विलंब लागत आहे. त्याचवेळी कॅबिनेटची मागणी असताना राज्यमंत्री पद दिल्याने नाराज असलेल्या अब्दुल सत्तार यांनी आजच राजीनामा दिला. ही बाब सरकार अधिक चालणार नसल्याचे संकेत आहेत, असेही ते म्हणाले. प्रास्ताविक आमदार हरिष पिंपळे यांनी केले.- कर्जमाफी, दुष्काळी मदत, शिवभोजनातून सरकार तोंडघशीसात-बारा कोरा करण्याचे आश्वासन देणाऱ्या सरकारने कर्जमाफी करताना शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. शासन निर्णयातील अटी व शर्तींमुळे शेतकºयांना प्रत्यक्ष लाभ मिळणारच नसल्याचेही फडणवीस म्हणाले. बांधावर जाऊन २५ हजार रुपये मदत देण्याची घोषणा केल्यानंतर त्याची पूर्तताही केली नाही. तर शिवभोजनातून किती लोकांची भूक शमवली जाणार, त्यातूनही गरिबांची थट्टाच होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाAkolaअकोला