शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
2
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
3
शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात
4
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
5
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?
6
ट्रम्प बनले व्हिलन! केली नवी घोषणा; चित्रपटांवरही लावला १००% टॅरिफ
7
‘स्थानिक’ निवडणुकीत दोस्त दोस्त ना रहा! महायुती अन् महाविकास आघाडी फुटणार
8
चांदी दीड लाखांवर, ९ महिन्यांत ७५% लाभ! का वाढतेय चांदीची किंमत?
9
संपादकीय : संवेदनशीलतेचा पंचनामा! आता केवळ आर्थिक नव्हे, सरकारी मनाची कसोटी लागणार
10
आता विद्यार्थी ऑनलाइनही शाळेमध्ये दिसणार हजर; यू-डायस प्रणालीत प्रवेश नोंदीसाठी १७ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
11
राजेंद्र लोढांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; फॉरेन्सिक ऑडिट सुरू
12
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
13
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
14
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
15
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
16
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
17
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
18
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
19
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
20
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट

बेइमानांचे सरकार जास्त काळ टिकणार नाही - देवेंद्र फडणवीस  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2020 18:09 IST

भाजप आणि मतदारांसोबत विश्वासघात करून तयार झालेले ते सरकार आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले

अकोला : विधानसभा निवडणुकीनंतर सत्ता स्थापनेसाठी राज्यात आक्रीत घडल आहे. महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेने जनतेचा कौल नाकारून पराभूत झालेल्या दोन पक्षांच्या सोबतीने सरकार स्थापन केले. हा प्रकार बेइमानीचा आहे. सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ हा प्रकार चालणार नाही, असे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी दगडपारवा येथील प्रचार सभेत सांगितले. यावेळी त्यांनी विविध मुद्यावर त्यांनी महाआघाडी सरकारचा समाचार घेतला.जिल्हा परिषद, पंचायत समित्या निवडणूकीसाठी शनिवारी पहिली सभा अकोला जिल्ह्यातील दगडपारवा येथे पार पडली. यावेळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात, माजी मंत्री डॉ. रणजित पाटील यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी मंचावर उपस्थित होते.पुढे बोलताना फडणवीस यांनी विधानसभा निवडणूकीनंतर जनतेच्या कौलानुसार भाजप-सेनेचे सरकार स्थापन होणे क्रमप्राप्त होते. मात्र, शिवसेनेने वेगळाच इतिहास घडवला. स्वार्थासाठी कोणी काहीही करू शकते. हेच त्यातून दाखवून दिले. जनतेने हरवलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेऊन सत्ता स्थापन केली. त्याचं सरकार जनतेच्या मनातल नाही. भाजप आणि मतदारांसोबत विश्वासघात करून तयार झालेले ते सरकार आहे, असेही ते म्हणाले. भारताचा इतिहासात बेइमानीने मिळवलेले राज्य कधीच दिर्घकाळ चालले नाही. ते सहा महिन्यातच लयास गेल्याची उदाहरणे आहेत. त्यामुळेच आधी सत्ता स्थापन करणे, त्यानंतर मंत्रीपद वाटप, मंत्र्यांना खातेवाटप करण्यात कमालीचा विलंब लागत आहे. त्याचवेळी कॅबिनेटची मागणी असताना राज्यमंत्री पद दिल्याने नाराज असलेल्या अब्दुल सत्तार यांनी आजच राजीनामा दिला. ही बाब सरकार अधिक चालणार नसल्याचे संकेत आहेत, असेही ते म्हणाले. प्रास्ताविक आमदार हरिष पिंपळे यांनी केले.- कर्जमाफी, दुष्काळी मदत, शिवभोजनातून सरकार तोंडघशीसात-बारा कोरा करण्याचे आश्वासन देणाऱ्या सरकारने कर्जमाफी करताना शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. शासन निर्णयातील अटी व शर्तींमुळे शेतकºयांना प्रत्यक्ष लाभ मिळणारच नसल्याचेही फडणवीस म्हणाले. बांधावर जाऊन २५ हजार रुपये मदत देण्याची घोषणा केल्यानंतर त्याची पूर्तताही केली नाही. तर शिवभोजनातून किती लोकांची भूक शमवली जाणार, त्यातूनही गरिबांची थट्टाच होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाAkolaअकोला